शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

विक्रमगडातील अवजड वाहतूक जीवघेणी

By admin | Updated: January 22, 2017 02:54 IST

या शहरातून गेल्या पाच वर्षापासून अवजड वाहतूक सुरूच आहे. अनेकवेळा तक्रारी करुनही ती थांबलेली नाही. त्यामुळे या शहरापासून १ किंमी अंतरावर गडदे ते विक्रमगड

विक्रमगड: या शहरातून गेल्या पाच वर्षापासून अवजड वाहतूक सुरूच आहे. अनेकवेळा तक्रारी करुनही ती थांबलेली नाही. त्यामुळे या शहरापासून १ किंमी अंतरावर गडदे ते विक्रमगड असा तांबानदीवरील कमकुवत पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याचा व सगळी वाहतूकच ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा पूल कमकुवत असल्याने त्यावरुन धावणारी अवजड वाहतूक बंद करावी म्हणजे त्याचे आयुष्य वाढेल व किमान हलक्या वाहनांची वाहतूक तरी सुरू राहील अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत़ त्यानुसार सा़ बां़ विभागाने या पुलावरुन अवजड वाहतुकीस बंदी असल्याचा फलक लावला. मात्र हा बंदी आदेश अमलात आणणारी यंत्रणाच नसल्याने अवजड वाहनांचे चालक तो जुमानत नाही. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एका महिन्यामध्ये मोटरसायकल व अवजड ट्रक यांचा अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे़ त्यामध्ये अवघ्या १८ ते २० वयोगटातील आदिवासी तरुणांचा समावेश आहे तरीही याबाबत कुणलाही जाग आलेली नाही.गेल्या काही वर्षांपासून मनोर व चारोटी अहमदाबाद हायवे वरुन वाहतूक करणारी अवजड वाहने विक्रमगड शहरातून वळविली जात असल्याने तांबाडी नदीवरील कमकुवत पुलाला धोका निर्माण झाला आहे़ त्याचप्रमाणे विक्रमगडच्या मुख्यबाजारपेठेत सकाळी व सायंकाळी वाहतूककोेंडी होऊन प्रदूषणाने नागरिक हैराण झाले आहेत़ त्यामुळे आरोग्याचा पश्नही निर्माण झाला आहे़ ट्रक, टेम्पो, ट्ेलर,सहा-बारा चाकी ट्रक अशा अवजड वाहनांचा यात प्रामुख्याने समावेश आहे़ (वार्ताहर)हे चालक टोलची रक्कम वाचविण्यासाठी विक्रमगडमार्गे वाहने नेतात. परंतु ग्रामीण भागातील सर्वच रस्ते एकेरी असल्याने सहा व त्यापेक्षा जास्त चाके असणाऱ्या अवजड वाहनांना बंदी आहे. असे असतांनाही हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे़. यामुळे नागरिकांना वॉकींग करण्यास भीती वाटते आहे. -अलका भानुशाली, जेष्ठ नागरिकसकाळी व सायंकाळी या अवजड वाहतुकीमुळे भर नाक्यावर वाहतूककोंडी होत आहे तर अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे ही वाहतूक बंद होणे गरजेचे आहे़ - रविंद्र आयरे, विक्रमगड