शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडातील अवजड वाहतूक जीवघेणी

By admin | Updated: January 22, 2017 02:54 IST

या शहरातून गेल्या पाच वर्षापासून अवजड वाहतूक सुरूच आहे. अनेकवेळा तक्रारी करुनही ती थांबलेली नाही. त्यामुळे या शहरापासून १ किंमी अंतरावर गडदे ते विक्रमगड

विक्रमगड: या शहरातून गेल्या पाच वर्षापासून अवजड वाहतूक सुरूच आहे. अनेकवेळा तक्रारी करुनही ती थांबलेली नाही. त्यामुळे या शहरापासून १ किंमी अंतरावर गडदे ते विक्रमगड असा तांबानदीवरील कमकुवत पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याचा व सगळी वाहतूकच ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा पूल कमकुवत असल्याने त्यावरुन धावणारी अवजड वाहतूक बंद करावी म्हणजे त्याचे आयुष्य वाढेल व किमान हलक्या वाहनांची वाहतूक तरी सुरू राहील अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत़ त्यानुसार सा़ बां़ विभागाने या पुलावरुन अवजड वाहतुकीस बंदी असल्याचा फलक लावला. मात्र हा बंदी आदेश अमलात आणणारी यंत्रणाच नसल्याने अवजड वाहनांचे चालक तो जुमानत नाही. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एका महिन्यामध्ये मोटरसायकल व अवजड ट्रक यांचा अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे़ त्यामध्ये अवघ्या १८ ते २० वयोगटातील आदिवासी तरुणांचा समावेश आहे तरीही याबाबत कुणलाही जाग आलेली नाही.गेल्या काही वर्षांपासून मनोर व चारोटी अहमदाबाद हायवे वरुन वाहतूक करणारी अवजड वाहने विक्रमगड शहरातून वळविली जात असल्याने तांबाडी नदीवरील कमकुवत पुलाला धोका निर्माण झाला आहे़ त्याचप्रमाणे विक्रमगडच्या मुख्यबाजारपेठेत सकाळी व सायंकाळी वाहतूककोेंडी होऊन प्रदूषणाने नागरिक हैराण झाले आहेत़ त्यामुळे आरोग्याचा पश्नही निर्माण झाला आहे़ ट्रक, टेम्पो, ट्ेलर,सहा-बारा चाकी ट्रक अशा अवजड वाहनांचा यात प्रामुख्याने समावेश आहे़ (वार्ताहर)हे चालक टोलची रक्कम वाचविण्यासाठी विक्रमगडमार्गे वाहने नेतात. परंतु ग्रामीण भागातील सर्वच रस्ते एकेरी असल्याने सहा व त्यापेक्षा जास्त चाके असणाऱ्या अवजड वाहनांना बंदी आहे. असे असतांनाही हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे़. यामुळे नागरिकांना वॉकींग करण्यास भीती वाटते आहे. -अलका भानुशाली, जेष्ठ नागरिकसकाळी व सायंकाळी या अवजड वाहतुकीमुळे भर नाक्यावर वाहतूककोंडी होत आहे तर अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे ही वाहतूक बंद होणे गरजेचे आहे़ - रविंद्र आयरे, विक्रमगड