शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

वसई खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:06 IST

१५३ वर्षे जुना : विरार व त्या वेळच्या बॉम्बे बॅकबे रेल्वेस्थानकादरम्यानची पहिली रेल्वे १२ एप्रिल १८६७ रोजी धावली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभाईंदर  : नायगाव आणि भाईंदर दरम्यानच्या वसई खाडीवर रेल्वे सेवेसाठी ब्रिटिशांनी स्वातंत्र्यापूर्वी बांधलेला १५३ वर्षे जुना पूल रेल्वे प्रशासनाने तोडण्यास घेतला आहे. मंगळवारपासून पुलाच्या तोडकामास सुरुवात झाली आहे.

विरार व त्या वेळच्या बॉम्बे बॅकबे रेल्वेस्थानकादरम्यानची पहिली रेल्वे १२ एप्रिल १८६७ रोजी धावली होती. त्यासाठी नायगाव ते भाईंदर स्थानकादरम्यान असलेल्या वसई खाडीवर ब्रिटिशांनी खोल खाडीत हा पूल उभारला होता. पण हा पूल जुना झाल्याने रेल्वे प्रशासनाने १९८९ च्या दरम्यान काँक्रिटचा नवा पूल खाडीवर बांधला. तेव्हापासून जुन्या पुलावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. हा पूल हलक्या वाहनांसाठी सुरू करावा, अशी मागणीही अनेक वर्षांपासून होत होती. रेल्वे बंद झाली तरी पाणजू बेटावरील ग्रामस्थ ये-जा करण्यासाठी या जुन्या पुलाचा वापर काही वर्षे करीत होते. पण रेल्वे प्रशासनाने आता पूल तोडण्याचे कंत्राट देऊन कामही सुरू केले आहे.

विरार ते बॉम्बे बॅकबे या दरम्यानच्या रेल्वे स्थानकाची नावेही नाला, बेसिन, पंजे, बोरवला, पहाडी, अंडारू, सांताक्रुज, बंडोरा, माहिम, दादुर, ग्रांट रोड अशा प्रकारची होती. नंतर या स्थानकांची नावे बदलण्यात आली. १८ व्या शतकातील हा पूल रेल्वे चालवण्यास बंद केल्यानंतरही ताठ मानेने उभा होता. काही भागात त्याची पडझड झाली होती. पण खाऱ्या पाण्यात व खाडीच्या लाटांना अंगावर झेलत १५३ वर्षे या पुलाने काढली. रेल्वेने पूल तोडण्यासाठी लिलाव केला. सध्या नायगाव आणि पाणजू दरम्यानच्या पुलाचा लिलाव झाल्याने कंत्राटदाराने हा पूल तोडण्यास सुरुवात केली आहे. खांबाला हात न लावता गॅस कटरच्या मदतीने तोडण्याचे काम सुरू आहे. भाईंदरकडच्या पुलाचा लिलाव बाकी आहे.

शिसे, तांब्याचा मोठ्या प्रमाणात वापरnजाणकार सांगतात की, या पुलाच्या पाण्यात उभ्या असलेल्या खांबात काम करताना शिसे, तांबे मोठ्या प्रमाणात ओतण्यात आले होते.nआज त्या काळातील या शुद्ध धातूंची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात जाणार आहे. काही पिढ्यांचा साक्षीदार व आधारवड असा हा पूल तुटताना पाहून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.