शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

वरसावे पूल हलक्या वाहनांसाठी सुरूच

By admin | Updated: September 15, 2016 02:07 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या गर्डरला तडा गेल्याप्रकरणी अद्याप विविध तपासणी अहवाल प्रलंबित आहे.

मीरा रोड : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या गर्डरला तडा गेल्याप्रकरणी अद्याप विविध तपासणी अहवाल प्रलंबित आहे. यामुळे पुलाची कशा पद्धतीने व कधीपासून दुरुस्ती करायची, याचा निर्णयच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास घेता आलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीही हलक्या वाहनांसाठी पूल खुला ठेवण्याचे सूचित केल्याने नागरिकांना तूर्तास दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पुलाचे मूळ नकाशे प्राधिकरणाला मिळाल्याने प्राधिकरणाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. वसई खाडीवर असलेल्या जुन्या पुलाच्या बांधकामास सुमारे ५० वर्षे झाली आहेत. १९६४ मध्ये भूमिपूजन होऊन काम सुरूझाले, तर १९७३ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. नवीन पूल बांधल्यानंतर वसई-विरार ते थेट गुजरात व मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने नव्या पुलावरून येतात. वसई-विरार, गुजरातकडे जाणारी वाहने जुन्या पुलावरून जातात. दरम्यान, एका गर्डरला तडा गेल्याने डिसेंबर २०१३ ते जून २०१४ दरम्यान जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. त्यानंतर, या पुलावरून १५ टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना प्रवेश बंद करावा, असे प्राधिकरणाने सांगितले होते. पण, प्रत्यक्षात त्याचे पालन झाले नाही. पूल बंद असताना अवजड वाहनांची वाहतूक भिवंडी, वाडामार्गे वळवण्यात आली. पण, नवीन पुलावरून दोन्ही बाजंूनी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवली होती. तरीदेखील कोंडी होऊन तास, दोन तास लागत असल्याने आता पुन्हा पूल बंद होणार, हे ऐकून नागरिकांसह वाहनचालक व पोलीस यंत्रणाही धास्तावली. जुन्या पुलाच्या गर्डरला तडा गेल्याचे कळताच प्राधिकरणाने तातडीने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना पत्र देऊन पुलाचा वापर त्वरित बंद करण्यास कळवले होते. महाड पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच वरसावे पुलाची धास्ती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी जुना पूल १५ सप्टेंबरपासून बंद करण्याची व अवजड वाहने भिवंडीमार्गे वळवण्याची अधिसूचना काढली. शिवाय, हलक्या वाहनांना २० किलोमीटरपेक्षा कमी वेगाची मर्यादा घालण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना जुन्या पुलावरून प्रवेश आधीच बंद केला आहे. ७५ पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन अवजड वाहने वळवण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता तैनात केले आहेत. जुन्या पुलाच्या मूळ बांधकामाचे महत्त्वाचे नकाशे सापडत नसल्याने बांधकामाची माहिती व दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यास अडचण होत होती. आता ते नकाशे उपलब्ध झाल्याचे प्राधिकरणाने सांगितले. पुलाच्या गर्डरला मोठा एकच तडा गेलेला आहे. त्याची पाहणी दिल्ली व गुजरातहून आलेल्या तज्ज्ञांंच्या पथकाने केली आहे. आणखी एक पथक १६ सप्टेंबरला येणार आहे. पुलासाठी वापरलेले काँक्रिट व आत वापरलेल्या लोखंडाची सध्याची क्षमता तपासण्याचा सल्लाही तज्ज्ञांंनी दिला आहे. परंतु, त्यासाठी लागणारी यंत्रणा फारच मर्यादित आहे. महाड दुर्घटनेनंतर देशभरातील जुन्या पुलांची तपासणी सुरू झाल्याने वरसावे पुलाच्या तपासणीसाठी आवश्यक यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)