शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

काळू नदीवरील पुलाचे काम संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:42 IST

ग्रामस्थ संतप्त : शहापूर, मुरबाड तालुक्यांचा संपर्क तुटणार

किन्हवली/ मुरबाड : शहापूर-मुरबाड रस्त्यावरील काळू नदीचा धोकादायक पूल दोन वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यावरील नवीन पुलाचे बांधकाम नव्याने सुरू आहे. मात्र, संथगतीने सुरू असणाऱ्या या पुलाचे बांधकाम पावसाळ्याआधी होण्याची शक्यता नसल्याने शहापूर तसेच मुरबाड तालुक्यांचा संपर्क चार महिने तुटणार असल्याने येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.

नाशिकवरून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ला जोडण्यासाठी शहापूर-मुरबाड-म्हसा-कर्जत-चौकफाटा असा नवीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. याआधी शहापूर तालुक्यातून मुरबाडला जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे यांच्या ताब्यात होता. या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाल्याने, या रस्त्याची मालकी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे गेली. सा.बां. विभाग आणि एमएसआरडीसीच्या वादात काळू नदीवरील हा पूल दोन वर्षांपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलावरून फक्त चारचाकी, दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती.

यावर्षी जानेवारी महिन्यात या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळेस काळू नदीवरील संपूर्ण पूल स्फोटकाच्या साहाय्याने उडवून लावत येथील वाहतूक थांबवली. पुलापासून दोन किमी अंतरावरील काळू नदीच्या पात्रामधून दगड टाकत वाहतुकीची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, काळू नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम होणे शक्य नाही. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या शेकडो ग्रामस्थांना मुरबाड-शहापूर प्रवासासाठी सरळगावमार्गे लांबचा रस्ता अवलंबावा लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.काळू नदीवरील पुलाचे काम माझ्याकडे १५ दिवसांपूर्वीच आले असून आता दिवसरात्र काम सुरू आहे. या कामाची मुदत डिसेंबरपर्यंत असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून रहदारीसाठी पूल खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसाळ्यात रस्त्यासाठी आणखी काही पर्याय देता येईल का, याबाबत आमचा विचार सुरू आहे - एस.के. गोसावी, उपअभियंता, एमएसआरडीसी

टॅग्स :palgharपालघर