शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

मुंबई-वडोदरा रस्त्याच्या बैठकीवर बहिष्कार

By admin | Updated: May 20, 2017 04:56 IST

मुंबई वडोदरा व्हाया पनवेल या रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता सक्षम अधिकारी तथा वाड्याचे उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर

- लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : मुंबई वडोदरा व्हाया पनवेल या रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता सक्षम अधिकारी तथा वाड्याचे उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी आपल्या कार्यालयात विविध खात्याचे प्रमुख व बाधित शेतकरी यांची बैठक बोलावली होती. मात्र खुद्द सक्षम अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने शेतकऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. ठाणे व पालघर जिल्हयÞातील आठ तालुक्यातून मुंबई- वडोदरा व्हाया पनवेल हा राष्ट्रीय महामार्ग जात असून यात शेकडो शेतकरी बाधित होणार आहेत. वाडा तालुक्यातील केळठण, गोराड व निंबवली या तीन गावाच्या हद्दीतून हा महामार्ग जात असून यात अनेक शेतकरी बाधित होणार आहेत. तसेच निंबवली येथील ३० घरे, गोराड चार व केळठण ६ अशी घरेही महामार्गात जात असून अनेक जण त्यात बेघर होणार आहेत. याशिवाय बाजारहाट, दवाखाना, शाळा व कामधंद्यानिमित्त जाणाऱ्या येणाऱ्यांचा मार्गही बंद होणार आहे. निंबवली येथे दोन विहिरी, पाच कूपनलिका दोन तलाव व पाणी पुरवठा योजनाही या मार्गाने बाधित होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांची सुपिक जमीन जाणार असल्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहे. गरम पाण्याचे झरे या महामार्गात जात असून पाण्याचे प्रवाह बंद होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. या महामार्गा संदर्भात चर्चा करण्यासाठी व जमीन मोजणीचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी प्रकल्पाचे सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी आपल्या कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांसह तालुक्यातील विविध खात्याच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा मार्ग आम्हाला नको आहे अशी स्पष्ट भूमिका शेतकरी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा भोईर यांनी यावेळी मांडली. शेतकऱ्यांची भूमिका ठामसक्षम अधिकारी आज भिवंडी निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्याचे टाळले. मुंबई वडोदरा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी शिवाजीराव पवार यांनी अनौपचारिक चर्चा करण्याचे सांगितल. शेतकऱ्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करून बहिष्कार घालण्याबाबत ठाम राहिले. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.