शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

बांधावरील तूरलागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

By admin | Updated: February 5, 2017 02:13 IST

येथील शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतकऱ्यांकडून तुरीची मोठयÞा प्रमाणात लागवड करण्यात आली होती.

- राहुल वाडेकर, विक्रमगडयेथील शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतकऱ्यांकडून तुरीची मोठयÞा प्रमाणात लागवड करण्यात आली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात काही दिवसा पासून तुरीच्या दरांनी उसळी घेतली असली तरी शेतकऱ्यांना तसेच काही वस्त्यांना स्वस्त तूरडाळ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दर वर्षी खरीप हंगामात मोठयÞा प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करण्यास कृषी विभागा कडून प्रोत्साहन देण्यात येते. तुरीतील पोषक घटकांमुळे कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते. त्यामुळे आदिवासी तालुका असलेल्या विक्रमगडमध्ये अतिरिक्त डाळीची विक्री करून त्याचा आर्थिक फायदा घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.तालुक्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित स्वरूपात असते. काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करीत असले तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. त्यात भात शेतीमध्ये उत्पादन खर्च जास्त तर पैसे कमी मिळतात. त्यामुळे शेतकरी तूर लावतात. कृषी विभागाच्या विशेष प्रयत्नांंद्वारे गेल्या पाच सहा वर्षा पासून शेतकऱ्यांना तूर, कडवे वाल, हरभरा व उडीद लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांना त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहेत. बांधावरील खाचरातील लागवड फायद्याचीतूर लागवडीसाठी मोठी विस्तृत जागा लागत नाही. शेताच्या बांधावर, माळरानावर या पिकाची लागवड करून भातशेती करणारे शेतकरी तुरीचे आंतरपीक घेऊ शकतात. हे पीक ओसाड माळरान, बांधावर, खाचरावर घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात जागेची बचत होते. त्याच प्रमाणे या पिकावर जास्त प्रमाणात किड-रोग येत नाहीत. खताची जास्त आवश्यकता नसते. त्यामुळे आंतरपीक म्हणून याची लागवड केल्यामुळे भातपिकाच्या बांधावर वाढणारी तण, गवत यांच्यावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे भाताचे पिकाचे उत्पन्न बरोबर दुबार पिक घेण्यास मदत होत.तालुक्यात तूर, मूग, उडीद आदी कडधान्याच्या एकूण क्षेत्रात वाढ होत आहे. तालुक्यात भरडधान्याच्या लागवड क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी तूर, मूग, उडीद या पिकांचे उत्पन्न घेण्यास शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येते. कडधान्यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करणे, जमिनीची सुपिकता व उत्पादकता राखणे, शेतीची अर्थव्यवस्था सुधारून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे हा मुख्य उद्देश आहे. - दिलीप ढेंबरे, तालुका कृषी अधिकारी (विक्र मगड)दर वर्षी आम्ही खाचरात किवा बांधावर खरीपात तूरीची लागवड करतो. या पिकाला कमी खत लागते त्याच प्रमाणे इतर पिकांच्या मानाने रोगांचा परिणाम होत नाही. त्यामुळे भात पिका बरोबर तुरीचेही दुबार पिक घेता येते तुरडाळीचा भाव वाढीच्या काळात आम्हाला घरच्या घरी तूर डाळ उपलब्ध होते. - बबन सांबरे, शेतकरी (ओंदे, विक्र मगड)