शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तानंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

बांधावरील तूरलागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

By admin | Updated: February 5, 2017 02:13 IST

येथील शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतकऱ्यांकडून तुरीची मोठयÞा प्रमाणात लागवड करण्यात आली होती.

- राहुल वाडेकर, विक्रमगडयेथील शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतकऱ्यांकडून तुरीची मोठयÞा प्रमाणात लागवड करण्यात आली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात काही दिवसा पासून तुरीच्या दरांनी उसळी घेतली असली तरी शेतकऱ्यांना तसेच काही वस्त्यांना स्वस्त तूरडाळ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दर वर्षी खरीप हंगामात मोठयÞा प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करण्यास कृषी विभागा कडून प्रोत्साहन देण्यात येते. तुरीतील पोषक घटकांमुळे कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते. त्यामुळे आदिवासी तालुका असलेल्या विक्रमगडमध्ये अतिरिक्त डाळीची विक्री करून त्याचा आर्थिक फायदा घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.तालुक्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित स्वरूपात असते. काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करीत असले तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. त्यात भात शेतीमध्ये उत्पादन खर्च जास्त तर पैसे कमी मिळतात. त्यामुळे शेतकरी तूर लावतात. कृषी विभागाच्या विशेष प्रयत्नांंद्वारे गेल्या पाच सहा वर्षा पासून शेतकऱ्यांना तूर, कडवे वाल, हरभरा व उडीद लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांना त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहेत. बांधावरील खाचरातील लागवड फायद्याचीतूर लागवडीसाठी मोठी विस्तृत जागा लागत नाही. शेताच्या बांधावर, माळरानावर या पिकाची लागवड करून भातशेती करणारे शेतकरी तुरीचे आंतरपीक घेऊ शकतात. हे पीक ओसाड माळरान, बांधावर, खाचरावर घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात जागेची बचत होते. त्याच प्रमाणे या पिकावर जास्त प्रमाणात किड-रोग येत नाहीत. खताची जास्त आवश्यकता नसते. त्यामुळे आंतरपीक म्हणून याची लागवड केल्यामुळे भातपिकाच्या बांधावर वाढणारी तण, गवत यांच्यावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे भाताचे पिकाचे उत्पन्न बरोबर दुबार पिक घेण्यास मदत होत.तालुक्यात तूर, मूग, उडीद आदी कडधान्याच्या एकूण क्षेत्रात वाढ होत आहे. तालुक्यात भरडधान्याच्या लागवड क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी तूर, मूग, उडीद या पिकांचे उत्पन्न घेण्यास शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येते. कडधान्यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करणे, जमिनीची सुपिकता व उत्पादकता राखणे, शेतीची अर्थव्यवस्था सुधारून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे हा मुख्य उद्देश आहे. - दिलीप ढेंबरे, तालुका कृषी अधिकारी (विक्र मगड)दर वर्षी आम्ही खाचरात किवा बांधावर खरीपात तूरीची लागवड करतो. या पिकाला कमी खत लागते त्याच प्रमाणे इतर पिकांच्या मानाने रोगांचा परिणाम होत नाही. त्यामुळे भात पिका बरोबर तुरीचेही दुबार पिक घेता येते तुरडाळीचा भाव वाढीच्या काळात आम्हाला घरच्या घरी तूर डाळ उपलब्ध होते. - बबन सांबरे, शेतकरी (ओंदे, विक्र मगड)