शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

बोईसरची पाणीटंचाई संपणार!; सहा इंचांची नवीन पाइपलाईन व नियोजन ठरणार वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 23:52 IST

ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीवसाहती बरोबर लोकसंख्या दिवसे दिवस प्रचंड लोकवस्त्या वाढत असून तिला मुबलक व पुरेशा दाबाने सर्वत्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- पंकज राऊतबोईसर : ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीवसाहती बरोबर लोकसंख्या दिवसे दिवस प्रचंड लोकवस्त्या वाढत असून तिला मुबलक व पुरेशा दाबाने सर्वत्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. या करीता नवीन पाइपलाईन टाकण्यात येत असल्याने या वर्षात बोईसरचे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष संपणार आहे. पूर्वी मधुर हॉटेल पासून ब्ल्यू डायमंड हॉटेल मार्गे मार्केट मधून येणाऱ्या पाईप लाईन द्वारे भंडारा वाडा टाकीमध्ये पाणी साठवण होत होती. या मुख्य लाईनमधूनच सर्व मोठमोठ्या संकुलांना घरगुती पाणी कनेक्शन दिल्याने भंडारवाडयाची पाण्याची टाकी भरत नसल्याने पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करता येत नव्हता यातून मार्ग काढण्यासाठी १० किलो एचडीपीची सहा इंचाची नवीन पाईप लाईन मधुर हॉटेल जवळून बिग बाजार मार्गे एस टी बस स्टँड पासून एक्स्ट्रा लाईन टाकण्यात आली असून तिच्यावरून कुणालाही नवीन कनेक्शन दिले जाणार नसल्याने भंडारवाडा टाकीमध्ये पुरेशा दाबाने वेळेवर पाणी साठवणूक होईल त्यातून इतर भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होईल तसेच नवापूर नाका ते भंडारवाडा या लाईनला सुद्धा संकुलधारक व व्यावसायिक गाळे यांना मुख्य लाईन वरून कनेक्शन दिल्याने भंडार वाड्यात पाणी येत नव्हते या ठिकाणी जुनी लाईन बंद करून दहा किलो एचडीपीची नवीन एक्स्ट्रा लाईन टाकण्यात आली आहे. यामुळे पुरेशा दाबाने भंडारवाडा टाकीमध्ये पाण्याचा साठा मुबलक होणार आहे तर पूर्व भागातून दांडी पाडा टाकीवर योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध असतांनाही त्याचा वापर पश्चिम भागात करता येत नव्हता ते पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणण्यासाठी रेल्वे रुळाखालून तीन लाईनी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामुळे बोईसरच्या पश्चिम भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर होणार आहे. भंडारवाडा संममध्ये पाणी साठवणूक होणार असल्याने केशवनगरच्या टाकीत पाणी पोहोचून त्या भागातील पाण्याचा प्रश्न प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे तर भविष्यामध्ये ओसवाल किंवा खोदाराम भागात जागा उपलब्ध झाल्यास तीन ते चार लाख लिटर क्षमतेची ओव्हरहेड पाण्याची टाकी बांधल्यास अजून पाण्याचा प्रश्न सुटून सुखकर होईल.संकुलातील वैयक्तिक कनेक्शन बंद करून सोसायटीला मुबलक प्रमाणात पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असून वैयक्तिक बोअरिंगला परवानगी देणे बंद केले आहे.जुन्या लाईन वर चोरी व अनधिकृत कनेक्शन कळत नव्हते. परंतु आता नवीन लाईन मुळे ती कनेक्शन आपो आप बंद होतील अशा पद्धतिचे नियोजन केले असल्याचे बोईसरचे ग्राम विकास अधिकारी कमलेश संखे यांनी सांगून नागरिकांना येत्या वर्षात मुबलक पाणी मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.नव्या पाइपलाइन्स होणार अनेक व्हॉल्व्हमुळे दाबाची समस्या सुटणारभंडारवाडा ते भीमनगर ही जुनी ४ इंच व्यासाची लाईन असून या मुख्य लाइनीवरून संकुलधारक व्यवसायिक घरगुती व इतर ठिकाणी पाणी दिले जात आहे या मुख्य लाईनला नियंत्रणासाठी कुठेही वॉल नसल्याने नागरिकांना पुरेसा व वेळेवर योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता यासाठी भंडारवाडा ते भीमनगर च्या दिशेने ६ इंचाची नवीन पाण्याची पाईपलाईन प्रस्तावित असून त्या लाईनवर प्रत्येक भागात वॉल बसवून पुरेशा दाबाने पाणी देण्याचे नियोजन वेळेनुसार आखण्यात आले आहे हे वॉल गोविंद आर्केड, गोसालिया पार्क, खोदाराम बाग, साईबाबा नगर, दिजय नगर, इंद्रप्रस्थ, दलाल टॉवर, भीमनगर येथे बसविण्यात येणार आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार