शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरची पाणीटंचाई संपणार!; सहा इंचांची नवीन पाइपलाईन व नियोजन ठरणार वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 23:52 IST

ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीवसाहती बरोबर लोकसंख्या दिवसे दिवस प्रचंड लोकवस्त्या वाढत असून तिला मुबलक व पुरेशा दाबाने सर्वत्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- पंकज राऊतबोईसर : ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीवसाहती बरोबर लोकसंख्या दिवसे दिवस प्रचंड लोकवस्त्या वाढत असून तिला मुबलक व पुरेशा दाबाने सर्वत्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. या करीता नवीन पाइपलाईन टाकण्यात येत असल्याने या वर्षात बोईसरचे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष संपणार आहे. पूर्वी मधुर हॉटेल पासून ब्ल्यू डायमंड हॉटेल मार्गे मार्केट मधून येणाऱ्या पाईप लाईन द्वारे भंडारा वाडा टाकीमध्ये पाणी साठवण होत होती. या मुख्य लाईनमधूनच सर्व मोठमोठ्या संकुलांना घरगुती पाणी कनेक्शन दिल्याने भंडारवाडयाची पाण्याची टाकी भरत नसल्याने पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करता येत नव्हता यातून मार्ग काढण्यासाठी १० किलो एचडीपीची सहा इंचाची नवीन पाईप लाईन मधुर हॉटेल जवळून बिग बाजार मार्गे एस टी बस स्टँड पासून एक्स्ट्रा लाईन टाकण्यात आली असून तिच्यावरून कुणालाही नवीन कनेक्शन दिले जाणार नसल्याने भंडारवाडा टाकीमध्ये पुरेशा दाबाने वेळेवर पाणी साठवणूक होईल त्यातून इतर भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होईल तसेच नवापूर नाका ते भंडारवाडा या लाईनला सुद्धा संकुलधारक व व्यावसायिक गाळे यांना मुख्य लाईन वरून कनेक्शन दिल्याने भंडार वाड्यात पाणी येत नव्हते या ठिकाणी जुनी लाईन बंद करून दहा किलो एचडीपीची नवीन एक्स्ट्रा लाईन टाकण्यात आली आहे. यामुळे पुरेशा दाबाने भंडारवाडा टाकीमध्ये पाण्याचा साठा मुबलक होणार आहे तर पूर्व भागातून दांडी पाडा टाकीवर योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध असतांनाही त्याचा वापर पश्चिम भागात करता येत नव्हता ते पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणण्यासाठी रेल्वे रुळाखालून तीन लाईनी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामुळे बोईसरच्या पश्चिम भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर होणार आहे. भंडारवाडा संममध्ये पाणी साठवणूक होणार असल्याने केशवनगरच्या टाकीत पाणी पोहोचून त्या भागातील पाण्याचा प्रश्न प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे तर भविष्यामध्ये ओसवाल किंवा खोदाराम भागात जागा उपलब्ध झाल्यास तीन ते चार लाख लिटर क्षमतेची ओव्हरहेड पाण्याची टाकी बांधल्यास अजून पाण्याचा प्रश्न सुटून सुखकर होईल.संकुलातील वैयक्तिक कनेक्शन बंद करून सोसायटीला मुबलक प्रमाणात पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असून वैयक्तिक बोअरिंगला परवानगी देणे बंद केले आहे.जुन्या लाईन वर चोरी व अनधिकृत कनेक्शन कळत नव्हते. परंतु आता नवीन लाईन मुळे ती कनेक्शन आपो आप बंद होतील अशा पद्धतिचे नियोजन केले असल्याचे बोईसरचे ग्राम विकास अधिकारी कमलेश संखे यांनी सांगून नागरिकांना येत्या वर्षात मुबलक पाणी मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.नव्या पाइपलाइन्स होणार अनेक व्हॉल्व्हमुळे दाबाची समस्या सुटणारभंडारवाडा ते भीमनगर ही जुनी ४ इंच व्यासाची लाईन असून या मुख्य लाइनीवरून संकुलधारक व्यवसायिक घरगुती व इतर ठिकाणी पाणी दिले जात आहे या मुख्य लाईनला नियंत्रणासाठी कुठेही वॉल नसल्याने नागरिकांना पुरेसा व वेळेवर योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता यासाठी भंडारवाडा ते भीमनगर च्या दिशेने ६ इंचाची नवीन पाण्याची पाईपलाईन प्रस्तावित असून त्या लाईनवर प्रत्येक भागात वॉल बसवून पुरेशा दाबाने पाणी देण्याचे नियोजन वेळेनुसार आखण्यात आले आहे हे वॉल गोविंद आर्केड, गोसालिया पार्क, खोदाराम बाग, साईबाबा नगर, दिजय नगर, इंद्रप्रस्थ, दलाल टॉवर, भीमनगर येथे बसविण्यात येणार आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार