शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बोईसरची पाणीटंचाई संपणार!; सहा इंचांची नवीन पाइपलाईन व नियोजन ठरणार वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 23:52 IST

ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीवसाहती बरोबर लोकसंख्या दिवसे दिवस प्रचंड लोकवस्त्या वाढत असून तिला मुबलक व पुरेशा दाबाने सर्वत्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- पंकज राऊतबोईसर : ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीवसाहती बरोबर लोकसंख्या दिवसे दिवस प्रचंड लोकवस्त्या वाढत असून तिला मुबलक व पुरेशा दाबाने सर्वत्र पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. या करीता नवीन पाइपलाईन टाकण्यात येत असल्याने या वर्षात बोईसरचे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष संपणार आहे. पूर्वी मधुर हॉटेल पासून ब्ल्यू डायमंड हॉटेल मार्गे मार्केट मधून येणाऱ्या पाईप लाईन द्वारे भंडारा वाडा टाकीमध्ये पाणी साठवण होत होती. या मुख्य लाईनमधूनच सर्व मोठमोठ्या संकुलांना घरगुती पाणी कनेक्शन दिल्याने भंडारवाडयाची पाण्याची टाकी भरत नसल्याने पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करता येत नव्हता यातून मार्ग काढण्यासाठी १० किलो एचडीपीची सहा इंचाची नवीन पाईप लाईन मधुर हॉटेल जवळून बिग बाजार मार्गे एस टी बस स्टँड पासून एक्स्ट्रा लाईन टाकण्यात आली असून तिच्यावरून कुणालाही नवीन कनेक्शन दिले जाणार नसल्याने भंडारवाडा टाकीमध्ये पुरेशा दाबाने वेळेवर पाणी साठवणूक होईल त्यातून इतर भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होईल तसेच नवापूर नाका ते भंडारवाडा या लाईनला सुद्धा संकुलधारक व व्यावसायिक गाळे यांना मुख्य लाईन वरून कनेक्शन दिल्याने भंडार वाड्यात पाणी येत नव्हते या ठिकाणी जुनी लाईन बंद करून दहा किलो एचडीपीची नवीन एक्स्ट्रा लाईन टाकण्यात आली आहे. यामुळे पुरेशा दाबाने भंडारवाडा टाकीमध्ये पाण्याचा साठा मुबलक होणार आहे तर पूर्व भागातून दांडी पाडा टाकीवर योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध असतांनाही त्याचा वापर पश्चिम भागात करता येत नव्हता ते पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणण्यासाठी रेल्वे रुळाखालून तीन लाईनी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामुळे बोईसरच्या पश्चिम भागातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर होणार आहे. भंडारवाडा संममध्ये पाणी साठवणूक होणार असल्याने केशवनगरच्या टाकीत पाणी पोहोचून त्या भागातील पाण्याचा प्रश्न प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे तर भविष्यामध्ये ओसवाल किंवा खोदाराम भागात जागा उपलब्ध झाल्यास तीन ते चार लाख लिटर क्षमतेची ओव्हरहेड पाण्याची टाकी बांधल्यास अजून पाण्याचा प्रश्न सुटून सुखकर होईल.संकुलातील वैयक्तिक कनेक्शन बंद करून सोसायटीला मुबलक प्रमाणात पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असून वैयक्तिक बोअरिंगला परवानगी देणे बंद केले आहे.जुन्या लाईन वर चोरी व अनधिकृत कनेक्शन कळत नव्हते. परंतु आता नवीन लाईन मुळे ती कनेक्शन आपो आप बंद होतील अशा पद्धतिचे नियोजन केले असल्याचे बोईसरचे ग्राम विकास अधिकारी कमलेश संखे यांनी सांगून नागरिकांना येत्या वर्षात मुबलक पाणी मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे.नव्या पाइपलाइन्स होणार अनेक व्हॉल्व्हमुळे दाबाची समस्या सुटणारभंडारवाडा ते भीमनगर ही जुनी ४ इंच व्यासाची लाईन असून या मुख्य लाइनीवरून संकुलधारक व्यवसायिक घरगुती व इतर ठिकाणी पाणी दिले जात आहे या मुख्य लाईनला नियंत्रणासाठी कुठेही वॉल नसल्याने नागरिकांना पुरेसा व वेळेवर योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता यासाठी भंडारवाडा ते भीमनगर च्या दिशेने ६ इंचाची नवीन पाण्याची पाईपलाईन प्रस्तावित असून त्या लाईनवर प्रत्येक भागात वॉल बसवून पुरेशा दाबाने पाणी देण्याचे नियोजन वेळेनुसार आखण्यात आले आहे हे वॉल गोविंद आर्केड, गोसालिया पार्क, खोदाराम बाग, साईबाबा नगर, दिजय नगर, इंद्रप्रस्थ, दलाल टॉवर, भीमनगर येथे बसविण्यात येणार आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार