शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

खानिवडेतील अभिषेकचा मृतदेह तानसात सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:14 IST

खानिवडे गावातून दोन किशोरवयीन मुले १० आॅगस्ट पासून घरातून कोणासही काही एक न सांगता अचानक गायब झाली होती . त्यापैकी अभिषेक पंडित पाटील (१५) याचा मृतदेह

पारोळ : खानिवडे गावातून दोन किशोरवयीन मुले १० आॅगस्ट पासून घरातून कोणासही काही एक न सांगता अचानक गायब झाली होती . त्यापैकी अभिषेक पंडित पाटील (१५) याचा मृतदेह गावच्याच हद्दीतील तानसा नदीच्या किनारी १२ आॅगस्ट रोजी सापडला. मात्र १३ वी मध्ये शिकणाºया दीपक दिलीप कोळी (१८) याचा ठाव ठिकाण अजूनही लागला नसून त्याचा शोध पोलिसांसह त्याचे नातेवाईक घेत आहेत .दरम्यान जिथे हा मृतदेह आढळला त्या ठिकाणापासूनच्या वरील दो किलोमीटरच्या किनारी परीसरात त्यांचे कपडे, दीपकचा मोबाईल व चपला आढळून आल्याने दोघेही नदीत उतरल्याचे दिसत असून अभिषेकचे प्रेत सापडल्याने दोघेही बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एकमेकांच्या घराजवळच राहणारी व नात्याने मावसभाऊ असलेली ही दोन्ही मुले शांत व अतिशय मनमिळावू होती.मात्र त्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अभिषेकचा मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील गोसावी करत आहेत.मात्र हे दोघे नदीकिनारी कशासाठी गेले? नदीचा प्रवाह आणि खोली याची माहिती असताना ते पाण्यात उतरले कसे? या प्रश्नांची चर्चा सध्या या परीसरात होते आहे. त्यांचा मृत्यू अपघात की घात या बाबतही असंख्य तर्क-वितर्क लढविले जात आहेत.