शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

वसई-विरार महापालिकेचे शवविच्छेदनगृह, शवागार नाही

By admin | Updated: June 10, 2017 01:02 IST

वीस लाख लोकसंख्या असलेल्या वसई विरार महापालिकेकडे स्वत:चे शवविच्छेदन गृह आणि शवागर नाही. शहरात दिवसाला

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वीस लाख लोकसंख्या असलेल्या वसई विरार महापालिकेकडे स्वत:चे शवविच्छेदन गृह आणि शवागर नाही. शहरात दिवसाला किमान पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदन केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक आणि पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शवविच्छेदनाची व्यवस्था महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेली आहे. शवविच्छेदनाची सरासरी आकडेवारी पाहता वसई विरार महापालिका हद्दीत दिवसाला किमान पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. नवघर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विरार येथील ग्रामीण रुग्णालयात मिळून वर्षाला आठशेच्या आसपास शवविच्छेदन केले जातात. त्याखालोखाल नालासोपारा प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला साधारण तीनशे, आगाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला साधारण ७०, कामण प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला सरासरी १०० आणि भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला साधारण ७० मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. असे असतानाही निर्मिती होऊन सात वर्षे उलटली तरी महापालिकेला स्वत:चे शवविच्छेदन केंद्र सुरु करता आलेले नाही. काही प्राथमिक केंद्रात महापालिकेने निधी खर्च करून शवविच्छेदनाची सोय केली आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात शवविच्छेदन होत असल्याने ही सुविधा अपुरी पडत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदन असले तरी अनेक ठिकाणी शवविच्छेदक नाहीत. नवघर आणि नालासोपारा येथे तर तीन महिला स्विपर आहेत. त्यांच्याकडून शवविच्छेदन करता येत नाही. दुसरीकडे, महापालिका स्वत:चे शवागरही अद्याप बांधू शकलेले नाही. नातेवाईक अथवा इतर अडचणींमुळे तसेच बेबारस मृतदेहांना शवागृहात ठेवावे लागते. महापालिकेने नवघर येथे चार मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच सोपारा आणि वसई रुग्णालयात काही मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केली आहे. पण, ती अपुरी पडत असल्याने नागरीकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. महापालिकेने अत्याधुनिक शवविच्छेदनगृ आणि शवागर बांधण्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी पाचूबंदर येथील जागाही निवडण्यात आलेली आहे. मात्र, सदर जागा सीआरझेडच्या कचाट्यात सापडल्याने शवागर आणि शवविच्छेदन गृह बांधण्याचे काम रखडून पडले आहे. शवविच्छेदन गृह आणि शवागर शहरापासून दूर असणे गरजेचे आहे. मात्र, तशी जागा मिळत नसल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे.