शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिकेचे शवविच्छेदनगृह, शवागार नाही

By admin | Updated: June 10, 2017 01:02 IST

वीस लाख लोकसंख्या असलेल्या वसई विरार महापालिकेकडे स्वत:चे शवविच्छेदन गृह आणि शवागर नाही. शहरात दिवसाला

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वीस लाख लोकसंख्या असलेल्या वसई विरार महापालिकेकडे स्वत:चे शवविच्छेदन गृह आणि शवागर नाही. शहरात दिवसाला किमान पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदन केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक आणि पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शवविच्छेदनाची व्यवस्था महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेली आहे. शवविच्छेदनाची सरासरी आकडेवारी पाहता वसई विरार महापालिका हद्दीत दिवसाला किमान पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. नवघर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विरार येथील ग्रामीण रुग्णालयात मिळून वर्षाला आठशेच्या आसपास शवविच्छेदन केले जातात. त्याखालोखाल नालासोपारा प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला साधारण तीनशे, आगाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला साधारण ७०, कामण प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला सरासरी १०० आणि भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला साधारण ७० मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. असे असतानाही निर्मिती होऊन सात वर्षे उलटली तरी महापालिकेला स्वत:चे शवविच्छेदन केंद्र सुरु करता आलेले नाही. काही प्राथमिक केंद्रात महापालिकेने निधी खर्च करून शवविच्छेदनाची सोय केली आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात शवविच्छेदन होत असल्याने ही सुविधा अपुरी पडत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदन असले तरी अनेक ठिकाणी शवविच्छेदक नाहीत. नवघर आणि नालासोपारा येथे तर तीन महिला स्विपर आहेत. त्यांच्याकडून शवविच्छेदन करता येत नाही. दुसरीकडे, महापालिका स्वत:चे शवागरही अद्याप बांधू शकलेले नाही. नातेवाईक अथवा इतर अडचणींमुळे तसेच बेबारस मृतदेहांना शवागृहात ठेवावे लागते. महापालिकेने नवघर येथे चार मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच सोपारा आणि वसई रुग्णालयात काही मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केली आहे. पण, ती अपुरी पडत असल्याने नागरीकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. महापालिकेने अत्याधुनिक शवविच्छेदनगृ आणि शवागर बांधण्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी पाचूबंदर येथील जागाही निवडण्यात आलेली आहे. मात्र, सदर जागा सीआरझेडच्या कचाट्यात सापडल्याने शवागर आणि शवविच्छेदन गृह बांधण्याचे काम रखडून पडले आहे. शवविच्छेदन गृह आणि शवागर शहरापासून दूर असणे गरजेचे आहे. मात्र, तशी जागा मिळत नसल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे.