शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

सहा तरुणांनी सार्थ ठरवला संरक्षण यंत्रणांचा विश्वास; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने समुद्रात बंद पडली ‘अग्निमाता’ बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 02:06 IST

या बोटीला सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले आहे. सातपाटीतील ज्ञानेश्वर तांडेल हे आपल्या मालकीची ‘अग्निमाता’ ही बोट घेऊन गुरुवारी सकाळी ६ वाजता समुद्रात मासेमारीला गेले होते.

हितेन नाईकपालघर : समुद्री मार्गाने दहशतवादी हल्ले अथवा संशयित हालचालीवर लक्ष पुरविण्यासाठी आम्ही सक्षम असलो तरी आमचे खरे डोळे हे समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमारच असल्याचा पुनरुच्चार संरक्षण यंत्रणांनी अनेक वेळा केला आहे. या देशाच्या संरक्षण यंत्रणांचा विश्वास सार्थ करून दाखविला तो सातपाटीमधील सहा धाडसी मच्छीमार तरुणांनी. सातपाटी बंदरातून गुरुवारी सकाळी समुद्रात मासेमारीला गेलेली ‘अग्निमाता’ ही बोट इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बंद पडली होती.

या बोटीला सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले आहे. सातपाटीतील ज्ञानेश्वर तांडेल हे आपल्या मालकीची ‘अग्निमाता’ ही बोट घेऊन गुरुवारी सकाळी ६ वाजता समुद्रात मासेमारीला गेले होते. त्यांच्या बोटीत दिलीप माणिक तांडेल, जगन्नाथ लक्ष्मण तांडेल आणि प्रवीण पांडुरंग धनू हे मच्छीमार होते. सकाळी मासेमारीला जाऊन संध्याकाळी पुन्हा किनाऱ्यावर येणारी बोट शुक्रवारीही आली नसल्याने त्या सर्वांचे कुटुंबीय काळजीत पडले होते. याबाबत सातपाटी सागरी पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर दहाळकर यांनी या बेपत्ता बोटीबाबत कोस्टगार्ड, नेव्ही, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आदींसह जिल्ह्यातील ११२ किमीवरील सर्व सागरी पोलीस ठाण्यांना कळवीत स्वतः या घटनेकडे लक्ष पुरवत होते.

तीन दिवस झाले तरी त्या बोटीचा आणि मच्छीमारांचा शोध लागत नव्हता. शनिवारी सकाळी सातपाटी येथील चार बोटी त्यांच्या शोधार्थ समुद्रात गेल्यानंतर महालक्ष्मी प्रसादमधील मच्छीमारांना एडवन भागात ‘अग्निमाता’ बोट उभी असल्याचे दिसले. बोटीच्या इंजिनमधील क्रांक शॉप तुटल्याने ते अडकून पडल्याचे त्या बोटीतील मच्छीमारांनी सांगितले.

आम्हाला घराची ओढ लागल्याने किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी बोटीला शीड लावून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु विरुद्ध बाजूने वाऱ्याचा वेग असल्याने आम्ही अपयशी ठरत होतो, असे बोटीचे मालक ज्ञानेश्वर तांडेल यांनी सांगितले. आम्ही मदतीसाठी देवाचा धावा करीत असताना आमचे मच्छीमार बांधव मदतीला धावून आले. त्यांनी शनिवारी दुपारी किनारा गाठल्यानंतर उपस्थित कुटुंबीयांनी त्यांना गच्च मिठ्या मारून आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. या वेळी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. सपोनि दहाळकर यांनी सर्व सुखरूप आलेल्या मच्छीमारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

प्यायला पाणी नाहीआजूबाजूने जाणाऱ्या अनेक बोटींना मदतीसाठी हाका मारूनही कोणी मदतीसाठी धावून आले नाही. तीन दिवसांपासून अडकलो असताना साधे पिण्याचे पाणीही मिळाले नसल्याचे सांगून काही माणसांतल्या संवेदना इतक्या बोथट झाल्याचे पाहून रडायला आल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.