शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शहर एसटी बचाव आंदोलनातून भाजपा बाहेर

By admin | Updated: January 26, 2017 02:52 IST

१ जानेवारीपासून एसटीने शहरी बस वाहतूक बंद केल्यानंतर एसटी बचावचा नारा देत आंदोलनाला सुुुरुवात केलेल्या भाजपाने गुरुवारच्या मोर्च्यातून माघार

शशी करपे / वसई१ जानेवारीपासून एसटीने शहरी बस वाहतूक बंद केल्यानंतर एसटी बचावचा नारा देत आंदोलनाला सुुुरुवात केलेल्या भाजपाने गुरुवारच्या मोर्च्यातून माघार घेतली आहे. तो सरकारविरोधात असल्याचे कारण भाजपाने दिले आहे. दरम्यान १ एप्रिलपासून महापालिका परिवहन पर्यायी सेवा सुरु करणार आहे. राज्य सरकारने १ जानेवारीपासून एसटीची वसईतील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घेऊन वसईत एसटीची सेवा कायम ठेवावी, यामागणी एसटी बचाव आंदोलन समितीने गुुरुवारी वसईच्या तहसिल कचेरीवर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बचावसोबतच २९ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, वसईतील कायदा-सुव्यवस्था आणि एमएमआरडीएच्या आराखड्याला विरोध अशाही मागण्या मोर्च्याच्या वतीने करण्यात येणार आहेत. मागण्या पाहता हा मोर्चा सरकारविरोधात असल्याने भाजपाने मोर्चा सामील न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपाचे वसई विरार जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांनी दिली.एसटीची ग्रामीण भागात सेवा अविरतपणे सुरु रहावी, यासाठी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या दालनात एक बैठक संपन्न झाली. बैठकीला वसई विरार महापालिका आयुक्त सतीश लोखंडे, उपायुक्त किशोर गवस, एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील, परिवहन आयुक्त, भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक, उपाध्यक्ष मनोज पाटील, महापालिका परिवहनचे ठेकेदार मनोहर सकपाळ उपस्थित होते. बैठकीत महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी डेपो आणि स्टँड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने अनेक अडचणी येत असल्याची व्यथा मांडली. एसटीने विरार, नालासोपारा आणि नवघर एसटी स्टँडची जागा भाडेतत्वावर दिल्यास परिवहनची अतिशय चांगली सेवा देता येईल, अशी माहिती दिली. त्यावर नागपूर आणि नांदेडच्या धर्तीवर वसई-विरार महापालिकेला एसटी भाडेतत्वावर जागा देण्यास तयार असल्याची माहिती एसटीचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील यांनी दिली. त्यावेळी येत्या दोन महिन्यात महापालिकेच्या ताफ्यात नव्या ७० बसेस दाखल होत आहेत. त्यानंतर महापालिका एसटीपेक्षा चांगली आणि अविरत सेवा ग्रामीण भागात देईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त लोखंडे यांनी दिली. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून एसटी बंद होऊन महापालिकेची परिवहन सेवा सुुरु होणार आहे.बैठकीत भाजपाचे राजन नाईक यांनी चोवीस तास अविरत सेवा देणारी एसटी सुरु ठेवावी. सध्याची बससेवा ग्रामीण भागातच असल्याने शहरी बस वाहतूक हा शब्द काढून टाकावा अशी मागणी केली. मात्र, राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन महापालिका हद्दीतील बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला वसई विरार अपवाद होऊ शकत नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान, एसटीचा विषय निकाली निघाला आहे. मोर्चेकरांनी वसईतील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवून पोलीस खात्यावर आरोप केले आहेत. त्याचबरोबर २९ गावे आणि एमएमआरडीएचा आराखडाविषयीही मागण्या केल्या आहेत. त्यामुळे मोर्चा सरकारविरोधी असेच चित्र आहे. वसईतील कायदा-सुव्यवस्था ढासळलेली नाही. वसईत पोलीस बळ कमी आहे. सरकारकडून पोलीस ठाणी वाढवण्याचा प्रस्ताव मान्य झाला आहे. त्यामुळे पोलीस बळ वाढणार असल्याने पोलीस यंत्रणा अधिक कार्यक्षम होणार आहे. २९ गावे महापालिकेत ठेवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता गुरुवारच्या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.