शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

शहर एसटी बचाव आंदोलनातून भाजपा बाहेर

By admin | Updated: January 26, 2017 02:52 IST

१ जानेवारीपासून एसटीने शहरी बस वाहतूक बंद केल्यानंतर एसटी बचावचा नारा देत आंदोलनाला सुुुरुवात केलेल्या भाजपाने गुरुवारच्या मोर्च्यातून माघार

शशी करपे / वसई१ जानेवारीपासून एसटीने शहरी बस वाहतूक बंद केल्यानंतर एसटी बचावचा नारा देत आंदोलनाला सुुुरुवात केलेल्या भाजपाने गुरुवारच्या मोर्च्यातून माघार घेतली आहे. तो सरकारविरोधात असल्याचे कारण भाजपाने दिले आहे. दरम्यान १ एप्रिलपासून महापालिका परिवहन पर्यायी सेवा सुरु करणार आहे. राज्य सरकारने १ जानेवारीपासून एसटीची वसईतील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घेऊन वसईत एसटीची सेवा कायम ठेवावी, यामागणी एसटी बचाव आंदोलन समितीने गुुरुवारी वसईच्या तहसिल कचेरीवर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बचावसोबतच २९ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, वसईतील कायदा-सुव्यवस्था आणि एमएमआरडीएच्या आराखड्याला विरोध अशाही मागण्या मोर्च्याच्या वतीने करण्यात येणार आहेत. मागण्या पाहता हा मोर्चा सरकारविरोधात असल्याने भाजपाने मोर्चा सामील न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपाचे वसई विरार जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांनी दिली.एसटीची ग्रामीण भागात सेवा अविरतपणे सुरु रहावी, यासाठी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या दालनात एक बैठक संपन्न झाली. बैठकीला वसई विरार महापालिका आयुक्त सतीश लोखंडे, उपायुक्त किशोर गवस, एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील, परिवहन आयुक्त, भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक, उपाध्यक्ष मनोज पाटील, महापालिका परिवहनचे ठेकेदार मनोहर सकपाळ उपस्थित होते. बैठकीत महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी डेपो आणि स्टँड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने अनेक अडचणी येत असल्याची व्यथा मांडली. एसटीने विरार, नालासोपारा आणि नवघर एसटी स्टँडची जागा भाडेतत्वावर दिल्यास परिवहनची अतिशय चांगली सेवा देता येईल, अशी माहिती दिली. त्यावर नागपूर आणि नांदेडच्या धर्तीवर वसई-विरार महापालिकेला एसटी भाडेतत्वावर जागा देण्यास तयार असल्याची माहिती एसटीचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील यांनी दिली. त्यावेळी येत्या दोन महिन्यात महापालिकेच्या ताफ्यात नव्या ७० बसेस दाखल होत आहेत. त्यानंतर महापालिका एसटीपेक्षा चांगली आणि अविरत सेवा ग्रामीण भागात देईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त लोखंडे यांनी दिली. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून एसटी बंद होऊन महापालिकेची परिवहन सेवा सुुरु होणार आहे.बैठकीत भाजपाचे राजन नाईक यांनी चोवीस तास अविरत सेवा देणारी एसटी सुरु ठेवावी. सध्याची बससेवा ग्रामीण भागातच असल्याने शहरी बस वाहतूक हा शब्द काढून टाकावा अशी मागणी केली. मात्र, राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन महापालिका हद्दीतील बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला वसई विरार अपवाद होऊ शकत नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान, एसटीचा विषय निकाली निघाला आहे. मोर्चेकरांनी वसईतील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवून पोलीस खात्यावर आरोप केले आहेत. त्याचबरोबर २९ गावे आणि एमएमआरडीएचा आराखडाविषयीही मागण्या केल्या आहेत. त्यामुळे मोर्चा सरकारविरोधी असेच चित्र आहे. वसईतील कायदा-सुव्यवस्था ढासळलेली नाही. वसईत पोलीस बळ कमी आहे. सरकारकडून पोलीस ठाणी वाढवण्याचा प्रस्ताव मान्य झाला आहे. त्यामुळे पोलीस बळ वाढणार असल्याने पोलीस यंत्रणा अधिक कार्यक्षम होणार आहे. २९ गावे महापालिकेत ठेवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता गुरुवारच्या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.