शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनासाठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी जातो आहे फुकट, जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 00:26 IST

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सुंदर केलेले समुद्र किनारे स्थानिक लोकांच्या समुद्रकिनाºयावर शौचाला बसण्याने अस्वच्छ होत आहेत.

- हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सुंदर केलेले समुद्र किनारे स्थानिक लोकांच्या समुद्रकिनाºयावर शौचाला बसण्याने अस्वच्छ होत आहेत. शासनाचा पर्यटन वाढीच्या उद्देशाना यामुळे खीळ बसते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या या असल्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी जिल्हा योजना ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाच्या मंजूर कामासाठी २०१६-१७ व १७-१८ सालासाठी एकूण १ हजार ६८९ कोटी ६७ लाख रु पयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यातील निव्वळ २२० कोटी ६८ लाखांचा निधी हा किनारपट्टीवरील निर्मळ-कळंब, झाई, केळवे, डहाणू, एडवन, आशापुरा, पाणजू बेट आदी किनारपट्टीवरील गावांतील पर्यटनाच्या विकासासाठी देण्यात आला असून त्या दृष्टीने कामेही सुरू करण्यात आली आहेत.पर्यटन स्थळाची सुधारणा करणे, संरक्षक भिंत बांधणे, रस्ते तयार करणे, स्वच्छतागृहांची उभारणी करणे, पर्यटन स्थळाचे सुशोभीकरण करणे, पेव्हरब्लॉक बसविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, पथदिवे बसविणे, सौर दिवे बसविणे, पार्किंग व्यवस्था, वाहन तळ उभारणे, बहुउद्देशीय हॉल उभारणे, चेंजिंग रूम तयार करणे, बाग विकसित करणे अशाप्रकारच्या सोयीसुविधा पर्यटकांसाठी उभारल्यास जिल्ह्यातील पर्यटन वाढेल. त्या अनुषंगाने जिल्ह्यात रोजगाराची संधी निर्माण होऊन स्थानिकांना गावातच रोजगार निर्माण व्हावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे प्रयत्नशील आहेत.जिल्ह्याला ११० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून अत्यंत सुंदर, स्वच्छ, विविध जैवविविधता असलेला भूभाग लाभल्याने मुंबई, गुजरात आदी भागातील पर्यटक कळंब, अर्नाळा, शिरगाव, सातपाटी, डहाणू भागातील समुद्र किनाºयांना पसंती देऊ लागला आहे. शिरगाव-सातपाटी-वडराई हा १०-१२ किमी.चा समुद्रकिनारा आणि नारळी-पोफळीने बहरलेला असा निसर्गसंपन्न असलेला हा भाग आता पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे. त्यामुळे सातपाटीमधील सुप्रसिद्ध ताजे पापलेट, दाढा, सुरमई, रावस तर वडराईमधील बोंबील, कोळंबी तर शिरगावमधील सकस ताडी, केळी, शुद्ध भाजीपाला यांमुळे एक दिवसाच्या पिकनिकसाठी पर्यटकांची पावले आता येथे वळू लागली आहेत. त्यातच चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकलेला समुद्र किनाºयावरील किल्लाही मुलांचे, विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.शिरगाव-वडराईच्या मध्यभागी पश्चिमेकडील समुद्र किनारी असलेला भूभाग हा स्कूबा डायव्हिंगसाठी योग्य असून येथे स्टार फिश, आॅक्टोपस, लहान - मोठे रंगी बेरंगी मासे, विविध शंख-शिंपले, सिगल पक्षी यांची चांगली संख्या दिसते. त्यामुळे मुंबईमधील अनेक कुटुंबीय, पर्यावरण प्रेमी, विद्यार्थी या भागाला भेटी देत निसर्गाचा पुरेपूर आस्वाद घेत आहेत.अशा निसर्ग संपन्न भागाचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करून स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि त्यांची टीम सातत्याने झटत असताना शिरगाव, सातपाटीसह किनारपट्टीवरील अनेक गावातील काही स्थानिक समुद्रावरच शौचाला बसत असल्याने जिल्हाधिकाºयांनी नुकतीच एका कार्यक्रमादरम्यान जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या भागात निसर्गाची लयलूट असल्याने हा भाग स्वच्छ तसेच सुंदर असताना काही विघ्नसंतोषी लोक उघड्यावर शौचाला बसून असंवेदनशीलतेचे दर्शन घडवीत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रवृत्तीमुळे समुद्र किनाºयावर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते आहे.गावे केवळ कागदोपत्रीच हागणदारीमुक्तपालघर जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील ४७२ ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी सर्व गावे ही हागणदारीमुक्त असल्याचे घोषित केली असले तरी हे फक्त कागदोपत्री झाल्याचे दिसून येत आहे. ही गावे हागणदारीमुक्त झाल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर करीत आपली पाठ थोपवून घेण्याचे काम केले आहे.मात्र प्रत्यक्षात ही गावे हागणदारी मुक्त झालीच नसल्याचे दिसून येत आहे. हे रोखण्याचे काम संबंधित ग्रामपंचायतीचे, ग्रामसेवकांचे असतानाही त्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या स्वच्छतेच्या व हागणदारीमुक्त योजनेचे बारा वाजल्याचे निदर्शनास येत आहे.इतके सुंदर व स्वच्छ समुद्र किनारे इथे असल्याने आम्ही पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील असताना काही स्थानिक नागरिक समुद्रावर उघड्यावर शौचाला बसतात, हे योग्य नाही. लोकांनी संवेदनशीलपणे याचा विचार करून तत्काळ या गोष्टी बंद करायला हव्यात.- डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी

टॅग्स :palgharपालघरtourismपर्यटन