शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मोखाड्यात टँकरच्या नावाखाली होतो कोट्यवधींचा खर्च; पाणीसमस्या कायमची मिटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:06 IST

पाणीसमस्या कायमची मिटवा

रवींद्र साळवेमोखाडा : तालुक्यातील पाणीटंचाई ही वर्षानुवर्षे आदिवासींच्या पाचवीलाच पुजलेली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा टँकरमुक्तीचा नारा दिला.  अनेक सत्तांतरे झाली; परंतु प्रत्यक्षात ‘टँकरमुक्त मोखाडा’ ही संकल्पना राबलीच नाही. दिलेली आश्वासने ही फक्त हवेत विरली आहेत. गेल्या पाच वर्षांत टँकरच्या नावाखाली कोट्यवधींचा  खर्च झाला आहे. 

सन २०१५-१६ मध्ये  ८९ लाख ७१ हजार ६४० रुपये, २०१६-१७ मध्ये १ कोटी २१ लाख २५८ रुपये, २०१७-१८ मध्ये १ कोटी ६१ लाख ११ हजार ७४ रुपये, २०१८-१९ मध्ये १२ लाख ९२ हजार १५६ एवढा खर्च झाला असून, गेल्या पाच वर्षांत ३ कोटी ३७ लाख १४ हजार १२८ रुपये एवढा खर्च झाला आहे, तर सन २०१९-२० च्या खर्चाची आकडेवारी मोखाडा पाणीपुरवठा विभागाला अद्याप प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे तालुक्यात दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीतच पाणीटंचाईला सुरुवात होते. गतसाली फेब्रुवारीच्या १७ तारखेलाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी झाली. गतसाली ११६  गावपाड्यांना २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाही उन्हाची तीव्रता वाढू लागताच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.  दापटी गावपाड्यांनी १५ दिवसांपूर्वी  टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली; परंतु अद्यापपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.

दरवर्षी लाखो-कोट्यवधींचा खर्च टँकरच्या नावाखाली होतोय; परंतु येथील पाणीटंचाईचा प्रश्न काही सुटत नाही. १५७ पाडे व ५९ महसुली गावे असलेल्या मोखाड्यात निम्म्यापेक्षा अधिक  गावपाड्यांना दरवर्षीच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या गेल्या. जलस्वराज्य योजना,  शिवकालीन टाक्यांची योजना, रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरी बांधणे, अशा अनेक योजना राबविण्यात आल्या; परंतु या योजना वांझोट्या ठरल्याने  घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट कायम आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार