शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडात यंदा झाली आंब्याची प्रचंड आवक

By admin | Updated: June 3, 2016 01:43 IST

प्रसिध्द असलेला गावठी हापूस व केसर सध्या विक्रमगडच्या बाजारात मोठया प्रमाणात दाखल होत असून हापूस ५० रुपये किलो तर केसर ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

विक्रमगड/तलवाडा : प्रसिध्द असलेला गावठी हापूस व केसर सध्या विक्रमगडच्या बाजारात मोठया प्रमाणात दाखल होत असून हापूस ५० रुपये किलो तर केसर ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सध्या आंब्याचा सीझन असल्याने गावठी केसर हापूसचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली असून काही लोक बाजारात बसलेल्या विक्रेत्याकडून एकदम टोपलीमध्ये असलेल्या सर्व आंब्याचा भाव करुन खरेदी करतांना दिसत आहेत. काही आंबा विक्रेत्या महिला डोक्यावर टोपले घेऊन घरोघरी फिरुन आंब्यांची विक्री करतांना दिसत आहे.दरवर्र्षी हा आंबा बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते.दरम्यानच्या काळात सध्या विक्रमगड व परिसरात मोठया प्रमाणावर गावठी आंबा दाखल होत असल्याने रोजच्या जेवणात त्याचा आस्वाद हा घेतला जातो. स्वस्त व चविष्ट गावठी आंबे मूबलक मिळत असल्याने सर्वच त्यावर ताव मारतांना दिसत आहेत.काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्याने एकदा का पाऊस आला की आंब्याचे भाव एकदम कोसळून आंबा खरेदीमध्येही घट होते व तो फेकून द्यावा लागतो.त्यामुळे पाउस पडण्यापूर्वीच सर्व आंबा विकला जाईल अशीे बागायतदारांची धडपड असते.यंदा आंब्यांचे उत्पादन कमी झाल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे हा हंगाम लांबत चालेला आहे. त्यामुळे पिकण्याचा कालवधी लांबत जाउन जून उजाडला आहे. पाऊस लगेच सुरू झाला तर लाखो रुपयांचे आंबे खराब होऊन बागायतदारांना फटका बसणार आहे. त्यामुळे काहीही करून आहे तो आंबा त्यापूर्वी विकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.विक्रमगड या आदिवासी ग्रामीण तालुक्यांत मोठया प्रमाणांत सन-१९९० पासुन शासनाच्या शंभर टक्के अनुदान तत्वावर फलोत्पादन योजनेचे अंतर्गत आंबा लागवड करण्यांत आली आहे.गेल्या १०/१५ वर्षापासुन विक्रमगड तालुक्यात मोठया प्रमाणात आंब्यांचे उत्पादन या भागातील छोटे-मोठे बागायदार वर्ग घेत आहे.विक्रमगडच्या स्थानिक मातीत तयार झालेला हापूस, केसर, लंगडा, पायरी या आंब्यांना मोठी स्थानिक मागणी असल्याने तो विक्रमगड बाजारपेठेतच संपतो.तसेच बाहेर गावाचा ग्राहक देखील विक्रमगड येथील याच आंब्यांना पसंती देतो.त्यातूनच शेतकरी वर्गास चांगले उत्पन्न मिळते. यंदा मात्र निसर्गाच्या लहरीपणाने हवामानात मोठे बदल होऊन आंब्यांच्या झाडांचा मोहर करपला. वेळेवर आंबा तयार झाला नाही, व जूनमध्ये आंब्यांची आवक वाढली व भाव पडले. (वार्ताहर)