शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

‘त्या’ गावांतील भूमिपुत्र तहानलेले; समस्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:21 IST

पर्यावरण संवर्धन समितीचे साेमवारपासून उपाेषण

वसई : बारा वर्षांपासून रखडलेली ६९ गावांतील पिण्याच्या पाण्याची योजना त्वरित चालू करून भूमिपुत्रांची तहान भागवावी, तसेच परिवहनसेवा व बुडणारी वसई या प्रमुख समस्यांवर वसई-विरार शहर महापालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरारतर्फे समन्वयक समीर वर्तक आणि सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे हे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.मागील १४ वर्षांपासून पिण्याचे पाण्याचा प्रश्न सातत्याने मांडत आहाेत. मात्र, दरवेळी आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. अखेर काेविडचे संकट असतानाही नाइलाजाने आम्हाला हा बेमुदत उपाेषणाचा मार्ग निवडावा लागल्याचे वर्तक यांनी सांगितले. २१ डिसेंबरला सकाळी १० वाजता वाघोली, मांडलय व सोजआळीच्या वेशीवर असलेल्या रिकाम्या पाण्याच्या टाक्यांखाली आणि बाजूच्या बंद असलेल्या परिवहनसेवेच्या बसस्टॉपजवळ हे उपाेषण करण्यात येणार आहे. वसई ग्रामीण भागातील ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना डिसेंबर, २००८ मध्ये मंजूर होऊन आणि फेब्रुवारी, २००९ मध्ये भूमिपूजन झाले हाेते. मात्र, ही योजना राजकीय हेतूने अद्याप राबविलेली नाही. त्यास प्रशासनाचाही छुपा पाठिंबा आहे, तर ४ जून, २०१९ रोजी या संदर्भात आंदोलनही केले हाेते. तेव्हा पालिकेने ६९ गावांत पाणी योजनेची आवश्यक नळजोडणी केलेली असून, मुबलक पाणी देण्यात आल्याचे पत्र दिले हाेते. मात्र, त्यानंतर दीड वर्षे उलटूनही अद्याप पाण्याचा ठणाणा कायम आहे. किमान चार ते पाच वर्षांपासून जनवाहिन्या व इतर काम झाले असून, लवकरच लवकरच पाणी मिळणार या आश्वासनापलीकडे काहीच हाती लागलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.परिवहनचा खेळखंडोबावसईतील एसटीसेवा पालिका परिवहनसेवा देणार म्हणून बंद करण्यात आली. मात्र, काेराेना काळात नागरिकांना गरज असताना, पालिकेची परिवहनसेवा बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कामगार वर्गाला तुजपुंज्या उत्पन्नातून राेज १०० ते १२० रुपये खासगी प्रवासावर खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे एसटी बस पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात येणार आहे.