शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भाटेबंदरला उद्यापासून वेलंकनी यात्रा

By admin | Updated: August 28, 2016 03:54 IST

येथील उत्तनच्या भाटेबंदर समुदकिनारी वसलेल्या ख्रिस्तींच्या वेलंकनीमातेच्या यात्रेला सोमवार, २९ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही यात्रा १२ दिवस चालणार असल्याची

भार्इंदर : येथील उत्तनच्या भाटेबंदर समुदकिनारी वसलेल्या ख्रिस्तींच्या वेलंकनीमातेच्या यात्रेला सोमवार, २९ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही यात्रा १२ दिवस चालणार असल्याची माहिती तीर्थमंदिर सुकाणू समितीचे अध्यक्ष रेनॉल्ड बेचरी यांनी दिली.यात्रेचा प्रारंभ मुंबई सरधर्मप्रांताचे बिशप अ‍ॅग्नेलो ग्रेशियस यांच्या उपस्थितीत होईल. या वेळी परंपरेनुसार वेलंकनीमातेची पालखी परिसरातील दर्यामाता चर्चमधून निघून ती तीर्थमंदिरात आणली जाणार आहे. त्यानंतर, मंदिरात विधिवत वेलकंनीमातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिर आवारात २० फूट उंचीचे धार्मिक ध्वजारोहण केले जाईल. पुढील नऊ दिवस ध्वज सायंकाळी ५ वाजता दररोज फडकावला जाईल. यात्रेदरम्यान दररोज सकाळी ६ ते रात्री ८ वाजेदरम्यान मराठी, इंग्रजी, हिंदी, कोकणी, तामीळ अशा पाच भाषांत प्रार्थना (मिस्सा) होईल. त्यासाठी दोन बिशप व २६ प्रवचनकार धर्मगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रार्थनेदरम्यान १, ४ व ७ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता समितीमार्फत मातेच्या पालखीची परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येईल. ४ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता ईस्ट इंडियन ख्रिस्तींची मराठी बोलीभाषेत विशेष प्रार्थना होईल. ८ सप्टेंबरला शेवटच्या दिवशी दिव्य सोहळ्यासाठी बिशप वॉस्को पेन्हा उपस्थित राहतील. मागील वर्षी १४ नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्रीय ख्रिस्तशरीर संमेलन, २२ मे रोजीच्या जपमाळमातेचा मनोरा या सुंदर वास्तुशिल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला देशातील अनेक राज्यांतील भक्तांनी येथे हजेरी लावली होती. तसेच पोप यांच्या दूतांनीही या तीर्थमंदिराला अनेकदा भेटी दिल्या आहेत. (प्रतिनिधी) १२० वर्षांपासून वास्तव्य१२० वर्षांपासून मीरा-भार्इंदरमध्ये ईस्ट इंडियन ख्रिस्ती समाज वास्तव्यास आहे. त्यांनी अद्याप आपली मराठी मायबोली जपली आहे. मूळ मासेमारी व भातशेतीचा व्यवसाय असलेला हा समाज कालांतराने इतरत्र विखुरला गेला. परंतु, आजही उत्तनसह पश्चिम किनारपट्टीवर हा समाज आपले अस्तित्व टिकवून आहे.