शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

भाटेबंदरला उद्यापासून वेलंकनी यात्रा

By admin | Updated: August 28, 2016 03:54 IST

येथील उत्तनच्या भाटेबंदर समुदकिनारी वसलेल्या ख्रिस्तींच्या वेलंकनीमातेच्या यात्रेला सोमवार, २९ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही यात्रा १२ दिवस चालणार असल्याची

भार्इंदर : येथील उत्तनच्या भाटेबंदर समुदकिनारी वसलेल्या ख्रिस्तींच्या वेलंकनीमातेच्या यात्रेला सोमवार, २९ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही यात्रा १२ दिवस चालणार असल्याची माहिती तीर्थमंदिर सुकाणू समितीचे अध्यक्ष रेनॉल्ड बेचरी यांनी दिली.यात्रेचा प्रारंभ मुंबई सरधर्मप्रांताचे बिशप अ‍ॅग्नेलो ग्रेशियस यांच्या उपस्थितीत होईल. या वेळी परंपरेनुसार वेलंकनीमातेची पालखी परिसरातील दर्यामाता चर्चमधून निघून ती तीर्थमंदिरात आणली जाणार आहे. त्यानंतर, मंदिरात विधिवत वेलकंनीमातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिर आवारात २० फूट उंचीचे धार्मिक ध्वजारोहण केले जाईल. पुढील नऊ दिवस ध्वज सायंकाळी ५ वाजता दररोज फडकावला जाईल. यात्रेदरम्यान दररोज सकाळी ६ ते रात्री ८ वाजेदरम्यान मराठी, इंग्रजी, हिंदी, कोकणी, तामीळ अशा पाच भाषांत प्रार्थना (मिस्सा) होईल. त्यासाठी दोन बिशप व २६ प्रवचनकार धर्मगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रार्थनेदरम्यान १, ४ व ७ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता समितीमार्फत मातेच्या पालखीची परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येईल. ४ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता ईस्ट इंडियन ख्रिस्तींची मराठी बोलीभाषेत विशेष प्रार्थना होईल. ८ सप्टेंबरला शेवटच्या दिवशी दिव्य सोहळ्यासाठी बिशप वॉस्को पेन्हा उपस्थित राहतील. मागील वर्षी १४ नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्रीय ख्रिस्तशरीर संमेलन, २२ मे रोजीच्या जपमाळमातेचा मनोरा या सुंदर वास्तुशिल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला देशातील अनेक राज्यांतील भक्तांनी येथे हजेरी लावली होती. तसेच पोप यांच्या दूतांनीही या तीर्थमंदिराला अनेकदा भेटी दिल्या आहेत. (प्रतिनिधी) १२० वर्षांपासून वास्तव्य१२० वर्षांपासून मीरा-भार्इंदरमध्ये ईस्ट इंडियन ख्रिस्ती समाज वास्तव्यास आहे. त्यांनी अद्याप आपली मराठी मायबोली जपली आहे. मूळ मासेमारी व भातशेतीचा व्यवसाय असलेला हा समाज कालांतराने इतरत्र विखुरला गेला. परंतु, आजही उत्तनसह पश्चिम किनारपट्टीवर हा समाज आपले अस्तित्व टिकवून आहे.