शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भार्इंदरला सुरू झाली डास शोधमोहीम

By admin | Updated: August 29, 2016 04:25 IST

मीरा रोड येथील ‘पूनमसागर’ इमारतीत दोन दिवसांपूर्वी राकेश भट या युवकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. यानंतर, जागे झालेल्या मीरा-भार्इंदर महापालिका प्रशासनाने

भार्इंदर : मीरा रोड येथील ‘पूनमसागर’ इमारतीत दोन दिवसांपूर्वी राकेश भट या युवकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. यानंतर, जागे झालेल्या मीरा-भार्इंदर महापालिका प्रशासनाने त्या परिसरात डासांची शोधमोहीम सुरू केली. या वेळी ३ हजार २०० घरांची झाडाझडती घेतली असता अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या, अशी माहिती उपायुक्त व स्वच्छता विभागप्रमुख डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली.शहरातील नवीन बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी बांधण्यात येणारी पाण्याची टाकी, पाणीसाठा, पावसाळ्यामुळे पडणारे खड्डे, टायरट्युबमध्ये साठवलेले पाणी, घरातील फुलदाणी, फ्रीजचा मागील भाग, वातानुकूलित यंत्रात अनेक दिवस पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होते. झाडांच्या कुंड्यांखालील ताटात साचलेले पाणी रिकामे न केल्यास त्यातही डासांची पैदास होते. उघड्यावर पाणी साठवण्यात येणाऱ्या भांड्यांतही डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. उघड्यावर साठवलेले पाणी वेळेत बदलून वापरण्यात येणारे भांडे स्वच्छ करून ते बंदिस्त ठेवणे अपेक्षित असतानाही अनेक जण ते टाळतात. परिणामी, डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन डेंग्यू, मलेरियासारखे आजार बळावतात. शहरात गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे प्रशासनाने सांगितले. अलीकडेच मीरा रोडमध्ये राकेशचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याचे उजेडात आल्याने स्वच्छता विभागाने त्वरित डास शोधमोहीम सुरू केली आहे. डास नियंत्रण पथकाचे प्रमुख अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या परिसरातील तीन हजार २०० घरांची झाडाझडती घेतली. त्यात त्यांना पाणी साठवलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळल्या. त्या जागा त्वरित कोरड्या क रून त्यावर डासनाशक औषधांची फवारणी केली. डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या व्यावसायिकांकडून आर्थिक दंड वसूल केला. (वार्ताहर)