शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

पालघर उपनगराध्यक्षपदी उत्तम घरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:03 IST

दोन वर्षे सेनेला तर भाजपला तीन; नगराध्यक्षपद गेल्याने अजूनही घडी बसेना

पालघर : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेने कडून उत्तम घरत तर भाजप कडून लक्ष्मीदेवी हजारी या इच्छुकांनी भरलेल्या नामनिर्देशन पत्रा नंतर हजारी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने उत्तम घरत यांची एकमताने निवड झाली आहे.पालघर नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान सेना-भाजप युती प्रमाणे नगराध्यक्षपद सेनेकडे तर उपनगराध्यक्षपद भाजप कडे तसेच दोन विषय समित्या व दोन स्विकृत सदस्य भाजप कडे राहतील असे ठरल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र नगराध्यक्ष पदी महाआघाडी च्या डॉ. उज्वला काळे यांची निवड झाल्याने एकहाती सत्ता मिळवूनही नगराध्यक्ष पद हातचे गेल्याने सेने पुढच्या अडचणी वाढल्या होत्या.नगरपरिषदेत एकूण २८ नगरसेवक निवडून आले असून शिवसेना १४, भाजप ७, सेना बंडखोर ५ तर राष्ट्रवादी २ असे बलाबल राहिले आहे. तूर्तास तरी दोन वर्ष नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद उत्तम घरत सांभाळणार असून याआधीही उत्तम घरत यांनी पालघर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद भूषिवलेले होते. सलग पाच टर्म ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.उपनगराध्यक्ष पाठोपाठ स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे अरु ण माने यांची पालघर नगर परिषदेमध्ये वर्णी लागली आहे. सेना-भाजपमध्ये ठरल्याप्रमाणे एकूण तीन स्वीकृत नगरसेवक घ्यावयाचे होते त्यापैकी दोन नगरसेवक हे भाजप तर एक नगरसेवक शिवसेना असे ठरले होते. मात्र शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक कोण असतील याबाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्याची काळजी सेनेने घेतली. शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराने स्वीकृत नगरसेवक साठी अर्ज दाखल केला नसल्याने अजून शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक कोण हे निवडणुकी नंतर जाहीर होणार आहे. मात्र, त्याची चुरस सुरु झाली आहे.अखेर झाला समझोताआज उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सेने कढून उत्तम घरत तर भाजप कडून लक्ष्मीदेवी हजारी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.उपनगराध्यक्षपदी शिवसेना व भाजपामध्ये चढाओढ होती अखेर वरिष्ठांच्या समझोत्या नुसार पहिली दोन वर्षे शिवसेनेला मिळणार असून अन्य तीन वर्षांचा कालावधी भाजपला देण्यात येणार आहे.

टॅग्स :palgharपालघर