शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

बविआच्या जाधवांना स्वातंत्र्य नाही, गावितांची खुर्चीसाठी धावाधाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:16 IST

वसईमध्ये करबटांचे टीकास्त्र; भूमिपूत्र बचाव आंदोलनाची जाहीर सभा

वसई : महाआघाडीचा मित्रपक्ष म्हणून बविआच्या उमेदवाराला आम. ठाकूरांना विचारल्या खेरीज स्वत:चे मत व कुठलेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यच नाही, तर दुसरीकडे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खास. गावित हे केवळ खुर्चीसाठी वारंवार पक्ष बदलत असल्याने या दोघांवर पालघर जिल्ह्याचे मतदार कुठल्या मानसिकतेनं विश्वास ठेवणार असे परखड विचार भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे उमेदवार दत्ताराम करबट यांनी वसईच्या वाघोलीत मांडले. पालघर लोकसभेच्या मतदारसंघात प्रचार, जाहीर सभा व कॉर्नर सभाना आता भर उन्हात देखील कमालीचा वेग येताना दिसत असून एका पाठोपाठ एक अशा सर्व पक्षीय व संघटना यांच्या जाहीर सभा संपन्न होत आहेत.वसईच्या पश्चिम पट्टीत वाघोली गावाच्या माळीआळी येथे शुक्र वारी संध्याकाळी भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे पालघर लोकसभेचे उमेदवार दत्ताराम करबट यांची पहिली जाहीर सभा संपन्न झाली. या जाहीर सभेसाठी मंचावर भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे उमेदवार दत्ताराम करबट, बुलेट ट्रेन विरोधी आदिवासींचे नेते काळुराम काका दोधडे, जेष्ठ विधिज्ञ नॉव्हेल डाबरे, शशी सोनावणे, पर्यावरण समनव्यक समीर वर्तक, दत्ता सांबरे, विधिज्ञ धनंजय चव्हाण, जेष्ठ सालू कजार, गोडसंन डायस, मेकेन्जी डाबरे व प्रकाश जाधव आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केली.जनतेचे प्रश्न कसे मांडणारमहाआघाडीच्या उमेदवाराला स्वत:चे मत, निर्णय व कुठलही अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नसेल तर महायुतीच्या उमेदवाराला केवळ खुर्चीची लालसा असून सत्ते व्यक्तिरिक्त जनतेची किंमतच राहिलेली नसेल तर आपण का म्हणून त्यांना निवडून द्यावयाचे असे करबट यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर