शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

वसईतील ३०० प्राचीन बावखले नष्ट होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 00:34 IST

वसईकरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेली बावखलांची संख्या २०० ने घटल्याने वसईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

- सुनील घरतपारोळ - वसईकरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेली बावखलांची संख्या २०० ने घटल्याने वसईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या बावखलांचे योग्य संवर्धन न झाल्याने उरलेली ३०० बावखलेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ते संवर्धन करण्याची गरज असून त्या साठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे.वसईच्या पश्चिम पट्टयÞात बावखलांची संख्या मोठयÞा प्रमाणावर आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी याच बावखलांच्या आणि नजीकच्या विहिरींचा वापर होतो. वसईत पूर्वी ५०० च्या आसपास बावखले होती. त्यांची संख्या आता ३०० पर्यंत येऊन पोहोचलीआहे. पाण्यातील क्षार संतुलित ठेवण्यासाठी बावखलेंचा उपयोग केला जातो. वसईत जेव्हा बावखलेंची संख्या ५०० च्या आसपास होती तेव्हा पाण्यातील क्षार हे १०० ते १५० च्या आसपास होते. ते आता ५०० ते ६०० पर्यंत पोचले आहेत. वसईत मोठयÞा प्रमाणावर लोकसंख्या वाढल्याने जागेच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे खाजगी बावखले नष्ट करून त्यावर भराव टाकून ही त्याजागी गृहसंकुले बांधली जात आहेत. या साठी बावखले असलेली जागा वसई विरार महापालिकेने आरक्षित करून बावखले वाचवण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.बावखले म्हणजे मोठा खड्डा त्यात पावसाचे पाणी जमा केले जाते. वसईचा भूप्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोडयÞा पाण्याच्या साठयÞासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. त्यामुळे हि बावखले वाचवणे, साफ करण्याची, संवर्धन करण्याची ही काळाची गरज आहे. बावखलेच राहिली नाही तर वसईकरांना गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.बावखले वाचले तर वसईतील पाण्याचे नैसिर्गक स्त्रोत वाचतील, या भागातील निसर्ग संपदा साठी ही पाणी उपलब्ध होईल यासाठी बावखले वाचवणे ही काळाची गरज आहे.-विजय चोघळा,अध्यक्ष पालघर जिल्हा पर्यावरण मित्र संघटना

टॅग्स :Vasai Virarवसई विरार