शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

वसईतील ३०० प्राचीन बावखले नष्ट होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 00:34 IST

वसईकरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेली बावखलांची संख्या २०० ने घटल्याने वसईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

- सुनील घरतपारोळ - वसईकरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेली बावखलांची संख्या २०० ने घटल्याने वसईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या बावखलांचे योग्य संवर्धन न झाल्याने उरलेली ३०० बावखलेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ते संवर्धन करण्याची गरज असून त्या साठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे.वसईच्या पश्चिम पट्टयÞात बावखलांची संख्या मोठयÞा प्रमाणावर आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी याच बावखलांच्या आणि नजीकच्या विहिरींचा वापर होतो. वसईत पूर्वी ५०० च्या आसपास बावखले होती. त्यांची संख्या आता ३०० पर्यंत येऊन पोहोचलीआहे. पाण्यातील क्षार संतुलित ठेवण्यासाठी बावखलेंचा उपयोग केला जातो. वसईत जेव्हा बावखलेंची संख्या ५०० च्या आसपास होती तेव्हा पाण्यातील क्षार हे १०० ते १५० च्या आसपास होते. ते आता ५०० ते ६०० पर्यंत पोचले आहेत. वसईत मोठयÞा प्रमाणावर लोकसंख्या वाढल्याने जागेच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे खाजगी बावखले नष्ट करून त्यावर भराव टाकून ही त्याजागी गृहसंकुले बांधली जात आहेत. या साठी बावखले असलेली जागा वसई विरार महापालिकेने आरक्षित करून बावखले वाचवण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.बावखले म्हणजे मोठा खड्डा त्यात पावसाचे पाणी जमा केले जाते. वसईचा भूप्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोडयÞा पाण्याच्या साठयÞासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. त्यामुळे हि बावखले वाचवणे, साफ करण्याची, संवर्धन करण्याची ही काळाची गरज आहे. बावखलेच राहिली नाही तर वसईकरांना गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.बावखले वाचले तर वसईतील पाण्याचे नैसिर्गक स्त्रोत वाचतील, या भागातील निसर्ग संपदा साठी ही पाणी उपलब्ध होईल यासाठी बावखले वाचवणे ही काळाची गरज आहे.-विजय चोघळा,अध्यक्ष पालघर जिल्हा पर्यावरण मित्र संघटना

टॅग्स :Vasai Virarवसई विरार