शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बुडालेला मुलाच्या मृत्युचे कारण फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:16 IST

एका चार वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असताना शवविच्छेदन अहवालात डॉक्टराने मृत्युचे कारण फाशी असे नमूद केल्याने

वसई : एका चार वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असताना शवविच्छेदन अहवालात डॉक्टराने मृत्युचे कारण फाशी असे नमूद केल्याने मुलाच्या पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना नालासोपारा शहरात घडली. आयुषकुमार पटेल (४) असे मृत बालकाचे नाव आहे. नालासोपारा येथील श्री राम नगरमध्ये राहणारा आयुषकुमार शुक्रवारी संध्याकाळी झाल्याने त्याची शोधाशोध करण्यात आली. रात्री त्याचा मृतदेह घरापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या एका बांधकाम सुरु असलेल्या पाण्याच्या उघड्या टाकीत आढळून आला. शनिवारी शवविच्छेदन केल्यानंतर आयुषकुमारवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, संध्याकाळी तुळींज पोलिसांनी आयुषच्या वडिलांना बोलावून पोस्टमार्टेम अहवाल परत करण्याची मागणी केली. तसेच आयुषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची घाई का केली म्हणून धारेवर धरून त्यांना अपमानास्पद वागणूकही दिली. रिपोर्टमध्ये काही तरी गडबड असल्याचा संशय आल्याने आयुषचे वडिल हरीकुमार पटेल यांनी एका ओळखीच्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवला. त्यावेळी रिपोर्टमध्ये मृत्युचे कारण फाशी लागल्याचे नमूद केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला. त्यानंतर हरीकुमार यांनी आयुषच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पुन्हा करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी ती मागणी फेटाळून लावत शवविच्छेदन अहवाल शवविच्छेदन करणारे डॉ. अविनाश डोंगरे यांच्याकडून बदलून घेतला. डॉ. डोंगरे यांनी आपली चूक मान्य करीत दिलगीरी व्यक्त केली आहे. दिवसभर आत्महत्येप्रकरणी शवविच्छेदन केले होते. त्यामुळे नजरचुकीने आयुषच्या अहवालात चुकीची नोंद झाल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे. तर याप्रकरणात चौकशी सुरु आहे. आ़युषचा पाण्यात बुडूनच मृत्यु झाला आहे. डॉक्टरांकडून नजरचुकीने चुकीचे नोंद झाली आहे, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी दिली.