शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पांढरा कांदा ठरतोय म्हसरोली गावाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:56 IST

१२० शेतकऱ्याची २०० ते २५० एकरवर लागवड; प्रयोगशिल शेतकºयाकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष

- राहुल वाडेकरविकमगड : या तालुक्यातील शेतीक्षेत्रात विविध प्रयोग सुरु असून त्यामुळे पालघर जिल्हात हा तालुका कृषी केंद्रबिंदू ठरू पाहत आहे. फुलशेतीमध्ये मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडु, सूर्यफुल, तूती लागवड त्याचबरोबर हळद, भाजीपाला लागवड केली जात आहे. आता यापुढे पाऊल टाकून नगदी पिकांकडे लक्ष केंद्रीत करुन बाजारात अधिक उत्पन्न देईल त्याकडे शेतकºयाचा क ल दिसून येत आहे.तालुक्यातील म्हसरोली या गावात पाच ते सहा वर्षापासून खरीपातील भातपीक कापणीनंतर डिसेंबरमधे पांढºया कांद्याची लागवड केली जात आहे. त्याला वाढती मागणी असून चांगली किंमतही मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत गावातील शेतकऱ्यांकडून त्याची लागवड मोठयÞा प्रमाणात केली जाऊ लागली आहे. विक्र मगड तालुक्यापासुन जवळ असलेल्या मुंबई, वसई-विरार, पालघर, नालासोपारा, भार्इंदर या शहरांतून या कांद्याला होणारी मागणी लक्षात घेऊन म्हसरोली गावातील शेतकरी अधिक प्रमाणात त्याची लागवड करू लागले आहेत. या गावात १२० शेतकºयानी या वर्षी २०० ते २५० एकरावर पांढºया कांद्याची लागवड केली आहे. त्यातून यावर्षी जवळपास १ लाख टन कांद्याचे उत्पादन या एका गावातून येणार असल्याचे शेतकरी सांगतात.पारंपरिक शेतीला फाटा देऊन यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सेंद्रिय खते, दर्जेदार बियाणे, पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. यामुळे एकरी वीस टन एवढे विक्रमी उत्पादन घेण्यास मदत होऊ शकणार आहे. चांगल्या प्रतिचा कांदा उत्पादित झाल्यास त्याला प्रतिमाळ ९० ते १०० रुपये इतका चांगला दर शेतकºयांना मिळू शकेल, असा विश्वास सुनील रामु नडगे या कांदा लागवड शेतकºयाने व्यक्त केला आहे.म्हसरोली गावातील शेतकरी राजेंद्र मधुकर भोईर यानी डिसेंबर महिन्यात दीड एकरावर पांढºया कांद्याची लागवड केली असून त्याना लागवडी पासून ते कांदा काढण्यापर्यंत ३५ ते ४० हजाराचा खर्च आला आहे. चार महिन्यात त्याना खर्च वजा करता १ लाख रु पये उत्पन्न मिळेल अशी आशा त्यानी व्यक्त केली. तर या गावात जगदीश रामू बेंदर, सुनील रामू नडगे, अनिल गोविंद बेंदर, बालु बेंदर अशा गावातील १२० शेतकºयानी २०० ते २५० एकर वर लागवड केली आहे. त्यातून या गावात १ लाख टन उत्पादन येईल असे शेतकºयानी सांगितले.पांढºया कांद्याचे औषधी गुणधर्मजर सर्दी किंवा कफाचा विकार असेल तर ताज्या कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास तो दूर होते. रोज कांदा खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते हे मधुमेह रोगावर परिणाम करते. कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अ‍ॅसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते.