शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

पांढरा कांदा ठरतोय म्हसरोली गावाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:56 IST

१२० शेतकऱ्याची २०० ते २५० एकरवर लागवड; प्रयोगशिल शेतकºयाकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष

- राहुल वाडेकरविकमगड : या तालुक्यातील शेतीक्षेत्रात विविध प्रयोग सुरु असून त्यामुळे पालघर जिल्हात हा तालुका कृषी केंद्रबिंदू ठरू पाहत आहे. फुलशेतीमध्ये मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडु, सूर्यफुल, तूती लागवड त्याचबरोबर हळद, भाजीपाला लागवड केली जात आहे. आता यापुढे पाऊल टाकून नगदी पिकांकडे लक्ष केंद्रीत करुन बाजारात अधिक उत्पन्न देईल त्याकडे शेतकºयाचा क ल दिसून येत आहे.तालुक्यातील म्हसरोली या गावात पाच ते सहा वर्षापासून खरीपातील भातपीक कापणीनंतर डिसेंबरमधे पांढºया कांद्याची लागवड केली जात आहे. त्याला वाढती मागणी असून चांगली किंमतही मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत गावातील शेतकऱ्यांकडून त्याची लागवड मोठयÞा प्रमाणात केली जाऊ लागली आहे. विक्र मगड तालुक्यापासुन जवळ असलेल्या मुंबई, वसई-विरार, पालघर, नालासोपारा, भार्इंदर या शहरांतून या कांद्याला होणारी मागणी लक्षात घेऊन म्हसरोली गावातील शेतकरी अधिक प्रमाणात त्याची लागवड करू लागले आहेत. या गावात १२० शेतकºयानी या वर्षी २०० ते २५० एकरावर पांढºया कांद्याची लागवड केली आहे. त्यातून यावर्षी जवळपास १ लाख टन कांद्याचे उत्पादन या एका गावातून येणार असल्याचे शेतकरी सांगतात.पारंपरिक शेतीला फाटा देऊन यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सेंद्रिय खते, दर्जेदार बियाणे, पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. यामुळे एकरी वीस टन एवढे विक्रमी उत्पादन घेण्यास मदत होऊ शकणार आहे. चांगल्या प्रतिचा कांदा उत्पादित झाल्यास त्याला प्रतिमाळ ९० ते १०० रुपये इतका चांगला दर शेतकºयांना मिळू शकेल, असा विश्वास सुनील रामु नडगे या कांदा लागवड शेतकºयाने व्यक्त केला आहे.म्हसरोली गावातील शेतकरी राजेंद्र मधुकर भोईर यानी डिसेंबर महिन्यात दीड एकरावर पांढºया कांद्याची लागवड केली असून त्याना लागवडी पासून ते कांदा काढण्यापर्यंत ३५ ते ४० हजाराचा खर्च आला आहे. चार महिन्यात त्याना खर्च वजा करता १ लाख रु पये उत्पन्न मिळेल अशी आशा त्यानी व्यक्त केली. तर या गावात जगदीश रामू बेंदर, सुनील रामू नडगे, अनिल गोविंद बेंदर, बालु बेंदर अशा गावातील १२० शेतकºयानी २०० ते २५० एकर वर लागवड केली आहे. त्यातून या गावात १ लाख टन उत्पादन येईल असे शेतकºयानी सांगितले.पांढºया कांद्याचे औषधी गुणधर्मजर सर्दी किंवा कफाचा विकार असेल तर ताज्या कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास तो दूर होते. रोज कांदा खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते हे मधुमेह रोगावर परिणाम करते. कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अ‍ॅसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते.