शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

फटाका व्यवसायावर बंदी आणा

By admin | Updated: October 14, 2015 02:19 IST

राज्यभर प्रसिद्ध असलेला वाड्यातील फटाक्यांचा व्यवसाय हा नियमबाह्य आहे. एखादी दुर्घटना घडल्यास हजारो नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो

वाडा : राज्यभर प्रसिद्ध असलेला वाड्यातील फटाक्यांचा व्यवसाय हा नियमबाह्य आहे. एखादी दुर्घटना घडल्यास हजारो नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या व्यवसायावर बंदी आणा, अशी मागणी मनसेने पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून तत्काळ कारवाई न झाल्यास २६ आॅक्टोबरपासून वाडा तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे फटाका व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.वाडा शहरातील परळीनाका, देसईनाका, मस्जिदनाका या भागात फटाक्यांची दुकाने आहेत. तामिळनाडूतील शिवा-काशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. येथून फटाक्यांचा संपूर्ण माल वाड्यात आणला जातो. मलवाडा या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक फटाका व्यापाऱ्यांनी गोदामे बांधलेली आहेत. दरवर्षी येथे कोट्यवधींची फटाका विक्री होत असते. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, गुजरात या शहरातील व्यावसायातील व किरकोळ खरेदीदार मोठ्या प्रमाणावर येथून फटाके खरेदी करतात. हे व्यावसायिक फटाक्यांचा साठा मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु हा साठा करताना कोणतीही सुरक्षितता राखली जात नाही. अनेकांनी मुख्य रस्त्यालगत दुकाने थाटल्याने एकूणच नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. आग प्रतिबंधक अग्निशमन यंत्रणा येथे नसल्याने आगीच्या वाढत्या घटना पाहता या व्यवसायावर बंदी आणावी अशी मागणी मनसेने केली आहे.हे व्यावसायिक परवाने घेताना शासनाने घातलेले नियम धाब्यावर बसवून फटाक्यांची विक्री करीत आहेत. परवानगीपेक्षा अधिक साठा करून फटाका विक्री केली जाते. प्रत्यक्षात मात्र कमी फटाका विक्री दाखवून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडविला जातो. त्याचप्रमाणे वाहतूकीचा परवाना नसलेल्या वाहनांतून मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची वाहतूक केली जाते. त्यामुळे कोणतीही आग प्रतिबंधक काळजी घेतली जात नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यास संपूर्ण वाडा शहर आगीच्या भक्षस्थानी जाऊ शकते. कारण वाड्यात कोणत्याही प्रकारची अग्नीशमन यंत्रणा नसल्याने मोठ्या प्रमाणावर जिवीत व वित्तहानी होण्याची भीती निवेदनात व्यक्त केली आहे.वाड्यातील फटाका व्यवसाय करणारे व्यापारी ग्राहकांना कोणतीही पावती देत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विक्रीकर, आयकर बुडविला जातो. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करूनही प्रत्यक्षात अल्प प्रमाणात शासनाला कर रूपाने महसूल जमा होतो. या व्यवसायिकांनी नियम धाब्यावर बसवून सुरु असलेल्या व्यवसायास महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे हा व्यवसाय सुरु असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. जनहित लक्षात घेऊन वाडा तालुक्यात अग्नीशमन यंत्रणा जोवर अस्तित्वात येत नाही. तोवर वाड्यातील या व्यावसायिकांना फटाका विक्री व साठवणूकीचे परवाने रद्द करावेत अशी मागणी मनसेचे पालघर उपजिल्हा प्रमुख गोविंद पाटील, तालुका प्रमुख भरत हजारे, सचिव देवेंद्र भानूशाली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (वार्ताहर)