शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

फटाका व्यवसायावर बंदी आणा

By admin | Updated: October 14, 2015 02:19 IST

राज्यभर प्रसिद्ध असलेला वाड्यातील फटाक्यांचा व्यवसाय हा नियमबाह्य आहे. एखादी दुर्घटना घडल्यास हजारो नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो

वाडा : राज्यभर प्रसिद्ध असलेला वाड्यातील फटाक्यांचा व्यवसाय हा नियमबाह्य आहे. एखादी दुर्घटना घडल्यास हजारो नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या व्यवसायावर बंदी आणा, अशी मागणी मनसेने पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून तत्काळ कारवाई न झाल्यास २६ आॅक्टोबरपासून वाडा तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे फटाका व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.वाडा शहरातील परळीनाका, देसईनाका, मस्जिदनाका या भागात फटाक्यांची दुकाने आहेत. तामिळनाडूतील शिवा-काशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. येथून फटाक्यांचा संपूर्ण माल वाड्यात आणला जातो. मलवाडा या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक फटाका व्यापाऱ्यांनी गोदामे बांधलेली आहेत. दरवर्षी येथे कोट्यवधींची फटाका विक्री होत असते. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, गुजरात या शहरातील व्यावसायातील व किरकोळ खरेदीदार मोठ्या प्रमाणावर येथून फटाके खरेदी करतात. हे व्यावसायिक फटाक्यांचा साठा मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु हा साठा करताना कोणतीही सुरक्षितता राखली जात नाही. अनेकांनी मुख्य रस्त्यालगत दुकाने थाटल्याने एकूणच नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. आग प्रतिबंधक अग्निशमन यंत्रणा येथे नसल्याने आगीच्या वाढत्या घटना पाहता या व्यवसायावर बंदी आणावी अशी मागणी मनसेने केली आहे.हे व्यावसायिक परवाने घेताना शासनाने घातलेले नियम धाब्यावर बसवून फटाक्यांची विक्री करीत आहेत. परवानगीपेक्षा अधिक साठा करून फटाका विक्री केली जाते. प्रत्यक्षात मात्र कमी फटाका विक्री दाखवून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडविला जातो. त्याचप्रमाणे वाहतूकीचा परवाना नसलेल्या वाहनांतून मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची वाहतूक केली जाते. त्यामुळे कोणतीही आग प्रतिबंधक काळजी घेतली जात नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यास संपूर्ण वाडा शहर आगीच्या भक्षस्थानी जाऊ शकते. कारण वाड्यात कोणत्याही प्रकारची अग्नीशमन यंत्रणा नसल्याने मोठ्या प्रमाणावर जिवीत व वित्तहानी होण्याची भीती निवेदनात व्यक्त केली आहे.वाड्यातील फटाका व्यवसाय करणारे व्यापारी ग्राहकांना कोणतीही पावती देत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विक्रीकर, आयकर बुडविला जातो. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करूनही प्रत्यक्षात अल्प प्रमाणात शासनाला कर रूपाने महसूल जमा होतो. या व्यवसायिकांनी नियम धाब्यावर बसवून सुरु असलेल्या व्यवसायास महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे हा व्यवसाय सुरु असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. जनहित लक्षात घेऊन वाडा तालुक्यात अग्नीशमन यंत्रणा जोवर अस्तित्वात येत नाही. तोवर वाड्यातील या व्यावसायिकांना फटाका विक्री व साठवणूकीचे परवाने रद्द करावेत अशी मागणी मनसेचे पालघर उपजिल्हा प्रमुख गोविंद पाटील, तालुका प्रमुख भरत हजारे, सचिव देवेंद्र भानूशाली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (वार्ताहर)