शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

परिवहन सेवेविरोधात उत्तनकर बंद पाळणार

By admin | Updated: October 17, 2015 01:35 IST

शहरापासून सुमारे २ ते १२ किमी अंतरावर वसलेल्या गावांतील प्रवाशांना स्थानिक परिवहन सेवा सोयीस्कर ठरत असताना अस्तित्वातील परिवहन सेवेच्या केवळ

भार्इंदर : शहरापासून सुमारे २ ते १२ किमी अंतरावर वसलेल्या गावांतील प्रवाशांना स्थानिक परिवहन सेवा सोयीस्कर ठरत असताना अस्तित्वातील परिवहन सेवेच्या केवळ १० ते १२ बसच रस्त्यांवर धावत आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांना जादा पैसे मोजून खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने असमाधानकारक ठरलेल्या परिवहन सेवेविरोधात सर्व उत्तनकर ग्रामस्थ जनमोर्चाच्या माध्यमातून शनिवारी (१७ आॅक्टोबर) परिसरात काळे झेंडे लावून बंद पाळणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. पालिकेची स्थानिक परिवहन सेवा डबघाईला आल्याने त्याचा सर्वात जास्त परिणाम मोर्वा ते उत्तन, पाली, मनोरी व गोराई गावांतील प्रवाशांवर होत आहे. येथील बहुतांशी लोक शहराबाहेर कामधंद्यासाठी जात असल्याने त्यांना भार्इंदर रेल्वे स्थानक तसेच मुंबईला जाण्याकरिता गोराई खाडी गाठावी लागते. त्यासाठी एकमेव वाहतूक मार्ग उपलब्ध आहे. मुंबई पालिकेच्या हद्दीत असलेली गोराई व मनोरी ही गावे मीरा-भार्इंदर शहरांशी भूमार्गाने जोडली गेल्याने त्यांच्यासह मोर्वा, मुर्धा, राई, उत्तन, पाली ही गावेदेखील समुद्रकिनारपट्टीवर वसल्याने त्यांना रस्ते वाहतुकीशिवाय अन्य वाहतुकीचा पर्याय नाही. यासाठी मीरा-भार्इंदर पालिकेने २००५ मध्ये कंत्राटी, तद्नंतर २०१० मध्ये खाजगी-लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावरील परिवहन सेवा सुरू केली आहे. ती भंगारावस्थेत गेल्याने या सेवेच्या दिवसाला सरासरी २ ते ४ फेऱ्याच होत आहेत. शिवाय ही सेवा पर्यायी व्यवस्था न करताच मोडीत काढण्यात येणार असल्याने उत्तनकर चिंतित आहेत. वारंवार प्रशासनाला निवेदन व पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याविरोधात उत्तनकरांनी शनिवारी बंद पाळण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.