शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी निधीवर दरोडाच, आयआयटी मुंबईचा लेखापरीक्षण अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:44 IST

विक्रमगड तालुक्यातील ३०४ कामांपैकी फक्त ४२ कामे झालेली आहेत.

- राहुल वाडेकरतलवाडा : विक्रमगड तालुक्यातील ३०४ कामांपैकी फक्त ४२ कामे झालेली आहेत. या कामांवर ३० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे, याबाबत लोकमतने पाठपुरावा केला होता. पत्रकार सघांकडून व लोकमतच्या मागणी वरून आयआयटी कडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल या संस्थेने आदिवासी विभागाकडे वेळोवेळी सादर केलेले चार अहवाल पत्रकारांसमोर सादर केले. यामध्ये ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत २०१२-१३ ते २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या कामामध्ये मोठा गैरव्यावहार झाल्याचे आयआयटी, मुंबईच्या लेखा परीक्षण अहवालात सिद्ध झाले आहे.विक्रमगड तालुक्यांतील गावांचा विकास व्हावा, यासाठी ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेमधून २०१२-१३ ते २०१४-१५ या वर्षामध्ये ९४ गावांपैकी ८३ गावामध्ये ३०४ विकास कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने ३० कोटींचा निधी दिला गेला. मात्र गावांचा विकास न होता तालुक्यातील अधिकारी व ठेकेदार यांचाच विकास झाला. तब्बल २६ कोटी रु पये त्यांनी संगनमताने हडप केले आहेत असा आरोप करण्यात आला आहे.आयआयटीच्या एकूण ११७५ पानांच्या अहवालामध्ये प्रत्येक कामांची तांत्रिक, संख्यात्मक व गुणात्मक निकषांवर तपासणी झाली आहे. या अहवालामध्ये काही धक्कादायक निष्कर्ष नोंदवले गेले आहेत. त्यामध्ये एकूण ३०४ कामांपैकी एक ही काम प्रत्यक्षात सुरूच झाले नाही. १०८ कामे प्रत्यक्षात साईटवर मिळाली नाहीत. ५७ कामांची अंदाजपत्रकेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नसल्याने ती कामे झाली आहेत किंवा नाही हेच तपासले जाऊ शकले नाही. प्रत्यक्षात ती कामे अस्तित्वात आहेत की, नाहीत याचीच शंका आहे. ९४ कामांचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट आहे. कामे करायची म्हणून केली आहेत. तर फक्त ४२ कामे ही चांगल्या स्थितीमध्ये होती. मात्र त्यांची अंदाजपत्रके मिळाली असती आणि त्या प्रमाणेच ती झाले असेल तरच ती चांगली असे म्हणता येतील, असे अहवालामध्ये म्हटले आहे.याचाच अर्थ एकूण ३०४ कामांपैकी फक्त ४२ कामेच झालेली आहेत. आयआयटीच्या अहवालानुसार फक्त १३.८१ टक्के कामे झालेली आहेत. संबंधित वृत्त/ २>२६ कोटींचा भ्रष्टाचार ११७५ पानी अहवालएकूण कामांवर सुमारे ३० कोटी रु पये खर्च झाला आहे. म्हणजेच एकूण २६ कोटी रुपयांच्या आसपास भ्रष्टाचार झाला आहे. हे स्पष्ट होत आहे. या एकूण कामांमध्ये ४५ टक्के डांबरीकरण रस्ते, १३ टक्के मोऱ्या, १२ टक्के सिमेंट काँक्र ीट रस्ते, ३० टक्के गटार, संरक्षक भिंती, व्यायामशाळा, समाजगृह, शौचालय व खेळाची मैदाने यांचा समावेश आहे. मात्र या कामांचा आदिवासी बांधवाना उपयोग झालेला नाही. आयआयटीने ११७५ पानी अहवालामध्ये निरीक्षणे नोंदवली आहेत.पहिल्या टप्पा मध्ये आमच्या कडे १०५ कामाचा अहवाल मिळाला आहे. दुसºया आणि तिसºया टप्पाचा अहवालाची चौकशी सुरु आहे. १०५ कामा पैकी १२ कामे जि.प पाणी पुरवठा विभागाची आहेत. ३ कामे जि.प च्या सां.बा ची आहेत. ९० कामे सां.बा ची आहेत. जि. प च्या ११५ कामा संदर्भात खुलासा सादर केला आहे. - अजित कुंभार, प्रकल्प अधिकारी