शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आदिवासी निधीवर दरोडाच, आयआयटी मुंबईचा लेखापरीक्षण अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:44 IST

विक्रमगड तालुक्यातील ३०४ कामांपैकी फक्त ४२ कामे झालेली आहेत.

- राहुल वाडेकरतलवाडा : विक्रमगड तालुक्यातील ३०४ कामांपैकी फक्त ४२ कामे झालेली आहेत. या कामांवर ३० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे, याबाबत लोकमतने पाठपुरावा केला होता. पत्रकार सघांकडून व लोकमतच्या मागणी वरून आयआयटी कडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल या संस्थेने आदिवासी विभागाकडे वेळोवेळी सादर केलेले चार अहवाल पत्रकारांसमोर सादर केले. यामध्ये ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत २०१२-१३ ते २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या कामामध्ये मोठा गैरव्यावहार झाल्याचे आयआयटी, मुंबईच्या लेखा परीक्षण अहवालात सिद्ध झाले आहे.विक्रमगड तालुक्यांतील गावांचा विकास व्हावा, यासाठी ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेमधून २०१२-१३ ते २०१४-१५ या वर्षामध्ये ९४ गावांपैकी ८३ गावामध्ये ३०४ विकास कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने ३० कोटींचा निधी दिला गेला. मात्र गावांचा विकास न होता तालुक्यातील अधिकारी व ठेकेदार यांचाच विकास झाला. तब्बल २६ कोटी रु पये त्यांनी संगनमताने हडप केले आहेत असा आरोप करण्यात आला आहे.आयआयटीच्या एकूण ११७५ पानांच्या अहवालामध्ये प्रत्येक कामांची तांत्रिक, संख्यात्मक व गुणात्मक निकषांवर तपासणी झाली आहे. या अहवालामध्ये काही धक्कादायक निष्कर्ष नोंदवले गेले आहेत. त्यामध्ये एकूण ३०४ कामांपैकी एक ही काम प्रत्यक्षात सुरूच झाले नाही. १०८ कामे प्रत्यक्षात साईटवर मिळाली नाहीत. ५७ कामांची अंदाजपत्रकेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे नसल्याने ती कामे झाली आहेत किंवा नाही हेच तपासले जाऊ शकले नाही. प्रत्यक्षात ती कामे अस्तित्वात आहेत की, नाहीत याचीच शंका आहे. ९४ कामांचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट आहे. कामे करायची म्हणून केली आहेत. तर फक्त ४२ कामे ही चांगल्या स्थितीमध्ये होती. मात्र त्यांची अंदाजपत्रके मिळाली असती आणि त्या प्रमाणेच ती झाले असेल तरच ती चांगली असे म्हणता येतील, असे अहवालामध्ये म्हटले आहे.याचाच अर्थ एकूण ३०४ कामांपैकी फक्त ४२ कामेच झालेली आहेत. आयआयटीच्या अहवालानुसार फक्त १३.८१ टक्के कामे झालेली आहेत. संबंधित वृत्त/ २>२६ कोटींचा भ्रष्टाचार ११७५ पानी अहवालएकूण कामांवर सुमारे ३० कोटी रु पये खर्च झाला आहे. म्हणजेच एकूण २६ कोटी रुपयांच्या आसपास भ्रष्टाचार झाला आहे. हे स्पष्ट होत आहे. या एकूण कामांमध्ये ४५ टक्के डांबरीकरण रस्ते, १३ टक्के मोऱ्या, १२ टक्के सिमेंट काँक्र ीट रस्ते, ३० टक्के गटार, संरक्षक भिंती, व्यायामशाळा, समाजगृह, शौचालय व खेळाची मैदाने यांचा समावेश आहे. मात्र या कामांचा आदिवासी बांधवाना उपयोग झालेला नाही. आयआयटीने ११७५ पानी अहवालामध्ये निरीक्षणे नोंदवली आहेत.पहिल्या टप्पा मध्ये आमच्या कडे १०५ कामाचा अहवाल मिळाला आहे. दुसºया आणि तिसºया टप्पाचा अहवालाची चौकशी सुरु आहे. १०५ कामा पैकी १२ कामे जि.प पाणी पुरवठा विभागाची आहेत. ३ कामे जि.प च्या सां.बा ची आहेत. ९० कामे सां.बा ची आहेत. जि. प च्या ११५ कामा संदर्भात खुलासा सादर केला आहे. - अजित कुंभार, प्रकल्प अधिकारी