शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

भाईंदरच्या डोंगरी येथे रस्ता खचल्याने भितीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 20:56 IST

भिंत कोसळल्याने येथील तलावा लगतचा रस्ता खचण्याच्या स्थितीत आहे.

ठळक मुद्देभाईंदर पश्चिमेस ये - जा करण्यासाठी उत्तन, पाली, चौक, गोराई, मनोरी साठी सदरचा एकमेव रस्ता आहे.सद्या खचलेल्या रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांनीच दगडं ठेऊन अपघात घडु नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मीरारोड - भाईंदरच्या डोंगरी येथे रस्ता खचल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपर्वी याच भागात रस्त्या लगतच्या तलावाची कुंपण भिंत कोसळली होती.भाईंदर पश्चिमेस ये - जा करण्यासाठी उत्तन, पाली, चौक, गोराई, मनोरी साठी सदरचा एकमेव रस्ता आहे. शिवाय एस्सेलवर्ल्ड, ज्युडिशीयल अकदामी, केशवसृष्टी साठी सुध्दा वाहनाने जाण्यास हाच रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ असली तरी डोंगरी ते आनंद नगरपर्यंत रस्ता तसा अरुंदच आहे. येथून कचरा वाहुन नेणारे डंपर, परिवहन सेवेच्या बस , डंपर आदी अवजड वाहने देखील भरधाव जात असतात. यंदाचा पावसाळा सुरु झाला तेव्हा आनंद नगर येथील रस्त्या लगत असलेल्या तलावाची कुंपण भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने येथील तलावा लगतचा रस्ता खचण्याच्या स्थितीत आहे.त्यातच आज गुरुवारी सदर तलावा पासुन जवळच असलेल्या विहरी लगतचा रस्ता खचला आहे. रस्त्याचा काही भाग खचुन पडला असुन उर्वरीत काही भागास लांब भेग पडली आहे. रस्ता खचल्याचे कळताच स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पालिकेच्या बांधकाम विभागास याची माहिती देऊन सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सद्या खचलेल्या रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांनीच दगडं ठेऊन अपघात घडु नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. सदर रस्त्याच्या उजव्या बाजुस खोल भागात शेती असुन त्यामुळे डावी कडील डोंगरावरुन येणाराया पाण्याच्या प्रवाहाने खालची माती वाहुन जात असल्याने रस्ता खचल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad safetyरस्ते सुरक्षाbhayandarभाइंदर