शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाईंदरच्या डोंगरी येथे रस्ता खचल्याने भितीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 20:56 IST

भिंत कोसळल्याने येथील तलावा लगतचा रस्ता खचण्याच्या स्थितीत आहे.

ठळक मुद्देभाईंदर पश्चिमेस ये - जा करण्यासाठी उत्तन, पाली, चौक, गोराई, मनोरी साठी सदरचा एकमेव रस्ता आहे.सद्या खचलेल्या रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांनीच दगडं ठेऊन अपघात घडु नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मीरारोड - भाईंदरच्या डोंगरी येथे रस्ता खचल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपर्वी याच भागात रस्त्या लगतच्या तलावाची कुंपण भिंत कोसळली होती.भाईंदर पश्चिमेस ये - जा करण्यासाठी उत्तन, पाली, चौक, गोराई, मनोरी साठी सदरचा एकमेव रस्ता आहे. शिवाय एस्सेलवर्ल्ड, ज्युडिशीयल अकदामी, केशवसृष्टी साठी सुध्दा वाहनाने जाण्यास हाच रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ असली तरी डोंगरी ते आनंद नगरपर्यंत रस्ता तसा अरुंदच आहे. येथून कचरा वाहुन नेणारे डंपर, परिवहन सेवेच्या बस , डंपर आदी अवजड वाहने देखील भरधाव जात असतात. यंदाचा पावसाळा सुरु झाला तेव्हा आनंद नगर येथील रस्त्या लगत असलेल्या तलावाची कुंपण भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने येथील तलावा लगतचा रस्ता खचण्याच्या स्थितीत आहे.त्यातच आज गुरुवारी सदर तलावा पासुन जवळच असलेल्या विहरी लगतचा रस्ता खचला आहे. रस्त्याचा काही भाग खचुन पडला असुन उर्वरीत काही भागास लांब भेग पडली आहे. रस्ता खचल्याचे कळताच स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पालिकेच्या बांधकाम विभागास याची माहिती देऊन सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सद्या खचलेल्या रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांनीच दगडं ठेऊन अपघात घडु नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. सदर रस्त्याच्या उजव्या बाजुस खोल भागात शेती असुन त्यामुळे डावी कडील डोंगरावरुन येणाराया पाण्याच्या प्रवाहाने खालची माती वाहुन जात असल्याने रस्ता खचल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad safetyरस्ते सुरक्षाbhayandarभाइंदर