शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

कृत्रिम तलावांची योजना यंदाही बारगळण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:57 IST

पालिकेची उदासीनता । भाविकांमध्ये जनजागृती करण्याबाबत प्रशासनाला अपयश

आशिष राणे।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करण्याचा पालिकेचा प्रयत्न दुसऱ्या वर्षीही फसताना दिसत आहे. एकूणच पालिका हद्दीतील नागरिकांचा प्रतिसाद नसल्याने यावर्षीही गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची योजना बारगळल्यातच जमा आहे.अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपला आहे. मात्र पालिकेने कुठेही विसर्जनाची सोय म्हणून कृत्रिम तलावांची सोयच केली नसल्याची माहिती शहर अभियंता माधव जवादे यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे यंदाही तलावात आणि समुद्रात पारंपरिक पद्धतीनेच गणेश विसर्जन होणार आहे हे स्पष्ट आहे.दरम्यान, कृत्रिम तलाव ही संकल्पनाच मागीलवर्षी व यंदाही बारगळत किंवा रद्द झाल्याने तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी भाविकांनी छोट्या मूर्ती बसवाव्यात, असे आवाहन नेहमीच पालिका प्रशासन व महापौर करत असतात. मात्र पालिका प्रशासन याच कृत्रिम तलावांबाबत आग्रही का नाही हे मात्र कोडे आहे.पालिकेची उदासीनता !‘हरित वसई, स्वच्छ वसई’ असा नारा देणाºया वसई-विरार महापालिकेला यंदाही पर्यावरणच्या संवर्धनासाठी शहरात कृत्रिम तलाव उभारता आलेले नाहीत ही शोकांतिका आहे. पालिका व नागरिकांची ही उदासीनता असून कृत्रिम तलावांबाबत जनजागृती करण्यात आलेल्या अपयशामुळे यंदाही पालिकेने कृत्रिम तलाव न उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.आयुक्त, महापौरांनी निर्णय घेण्याची गरज?गेल्यावर्षी तत्कालीन पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी कृत्रिम तलाव बनवण्याचा संकल्प जाहीर केला होता. प्रत्येक प्रभागात कुठे कृत्रिम तलाव उभारले जातील, त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. परंतु त्या वेळी नागरिकांची मानसिकता तयार झालेली नव्हती. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम तलावांचा वापर करा, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यासाठी वेळ कमी पडेल, असे लक्षात आल्यानंतर तेव्हाही योजना बारगळली होती. आताही ती राबवली जाईल का याबाबत शंका उपस्थित होत आहे.गेल्यावर्षीचा धडा घेऊन पुढे चूक सुधारू, असे म्हणत यंदाचा गणेशोत्सव येवून ठेपला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी व्यवस्थित तयारी करून, नागरिकांमध्ये जनजागृती करून कृत्रिम तलाव उभारले जातील, असे आश्वासन त्या वेळी देण्यात आले होते. मात्र यंदाही मागचा कित्ता गिरवण्यात आला आहे. कृत्रिम तलावांचे महत्त्व भाविकांना पटवून देण्यात पालिका पुन्हा अपयशी ठरली आहे.पर्यावरणप्रेमींची नाराजीपर्यावरणाबाबत सजग असणाºया भाविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून पालिकेकडे तब्बल एक वर्षांचा कालावधी होता. मग कृत्रिम तलावाबाबत योग्य नियोजन आणि जनजागृती का बरे केले नाही, असे वसईतील पर्यावरणप्रेमी नागरिक यांनी प्रश्न विचारला आहे. शहरात अस्तित्वात असलेल्या तलावांच्या सुशोभीकरणासाठी पालिका लाखो रुपये खर्च करते आणि आम्हाला नाईलाजाने त्यातच विसर्जन करावे लागते. कृत्रिम तलाव असते तर तलावांचे प्रदूषण थांबले असते, अशी संतप्त प्रतिक्रि या आता पर्यावरणप्रेमी देत आहेत.उत्सवाच्या बैठका नावालापालिका आयुक्त आणि महापौरांनी गणेशोत्सव मंडळाच्या पूर्वतयारीसाठी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेतल्या होत्या. परंतु अनेक नगरसेवकांनी त्याला नकार दिल्याचे समजते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांनीही कृत्रिम तलावाला विरोध केला. त्यामुळे कृत्रिम तलावाची योजना यंदाही दुसºयावर्षीही बारगळली आहे.