शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम तलावांची योजना यंदाही बारगळण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:57 IST

पालिकेची उदासीनता । भाविकांमध्ये जनजागृती करण्याबाबत प्रशासनाला अपयश

आशिष राणे।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करण्याचा पालिकेचा प्रयत्न दुसऱ्या वर्षीही फसताना दिसत आहे. एकूणच पालिका हद्दीतील नागरिकांचा प्रतिसाद नसल्याने यावर्षीही गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची योजना बारगळल्यातच जमा आहे.अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपला आहे. मात्र पालिकेने कुठेही विसर्जनाची सोय म्हणून कृत्रिम तलावांची सोयच केली नसल्याची माहिती शहर अभियंता माधव जवादे यांनी ‘लोकमत’ला दिली. यामुळे यंदाही तलावात आणि समुद्रात पारंपरिक पद्धतीनेच गणेश विसर्जन होणार आहे हे स्पष्ट आहे.दरम्यान, कृत्रिम तलाव ही संकल्पनाच मागीलवर्षी व यंदाही बारगळत किंवा रद्द झाल्याने तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी भाविकांनी छोट्या मूर्ती बसवाव्यात, असे आवाहन नेहमीच पालिका प्रशासन व महापौर करत असतात. मात्र पालिका प्रशासन याच कृत्रिम तलावांबाबत आग्रही का नाही हे मात्र कोडे आहे.पालिकेची उदासीनता !‘हरित वसई, स्वच्छ वसई’ असा नारा देणाºया वसई-विरार महापालिकेला यंदाही पर्यावरणच्या संवर्धनासाठी शहरात कृत्रिम तलाव उभारता आलेले नाहीत ही शोकांतिका आहे. पालिका व नागरिकांची ही उदासीनता असून कृत्रिम तलावांबाबत जनजागृती करण्यात आलेल्या अपयशामुळे यंदाही पालिकेने कृत्रिम तलाव न उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.आयुक्त, महापौरांनी निर्णय घेण्याची गरज?गेल्यावर्षी तत्कालीन पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी कृत्रिम तलाव बनवण्याचा संकल्प जाहीर केला होता. प्रत्येक प्रभागात कुठे कृत्रिम तलाव उभारले जातील, त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. परंतु त्या वेळी नागरिकांची मानसिकता तयार झालेली नव्हती. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम तलावांचा वापर करा, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यासाठी वेळ कमी पडेल, असे लक्षात आल्यानंतर तेव्हाही योजना बारगळली होती. आताही ती राबवली जाईल का याबाबत शंका उपस्थित होत आहे.गेल्यावर्षीचा धडा घेऊन पुढे चूक सुधारू, असे म्हणत यंदाचा गणेशोत्सव येवून ठेपला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी व्यवस्थित तयारी करून, नागरिकांमध्ये जनजागृती करून कृत्रिम तलाव उभारले जातील, असे आश्वासन त्या वेळी देण्यात आले होते. मात्र यंदाही मागचा कित्ता गिरवण्यात आला आहे. कृत्रिम तलावांचे महत्त्व भाविकांना पटवून देण्यात पालिका पुन्हा अपयशी ठरली आहे.पर्यावरणप्रेमींची नाराजीपर्यावरणाबाबत सजग असणाºया भाविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून पालिकेकडे तब्बल एक वर्षांचा कालावधी होता. मग कृत्रिम तलावाबाबत योग्य नियोजन आणि जनजागृती का बरे केले नाही, असे वसईतील पर्यावरणप्रेमी नागरिक यांनी प्रश्न विचारला आहे. शहरात अस्तित्वात असलेल्या तलावांच्या सुशोभीकरणासाठी पालिका लाखो रुपये खर्च करते आणि आम्हाला नाईलाजाने त्यातच विसर्जन करावे लागते. कृत्रिम तलाव असते तर तलावांचे प्रदूषण थांबले असते, अशी संतप्त प्रतिक्रि या आता पर्यावरणप्रेमी देत आहेत.उत्सवाच्या बैठका नावालापालिका आयुक्त आणि महापौरांनी गणेशोत्सव मंडळाच्या पूर्वतयारीसाठी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेतल्या होत्या. परंतु अनेक नगरसेवकांनी त्याला नकार दिल्याचे समजते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांनीही कृत्रिम तलावाला विरोध केला. त्यामुळे कृत्रिम तलावाची योजना यंदाही दुसºयावर्षीही बारगळली आहे.