शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अर्नाळा समुद्रकिनारी भटक्या कुत्र्यांचा हैदोस, वर्षभरात १० जणांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 03:15 IST

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. गुरुवारी संध्याकाळी एका नऊ वर्षाच्या मुलीला जखमी केलेल्या भटक्या कुत्र्यांनी वर्षभरात दहाहून अधिक जणांवर हल्ला करून जखमी केले आहे.

वसई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. गुरुवारी संध्याकाळी एका नऊ वर्षाच्या मुलीला जखमी केलेल्या भटक्या कुत्र्यांनी वर्षभरात दहाहून अधिक जणांवर हल्ला करून जखमी केले आहे. सध्या किनाºयावर दोनशेहून अधिक भटकी कुत्री झुंडीने फिरत असून त्यात अ़नेक पिसाळलेल्या कुत्र्यांचा समावेश आहे. या कुत्र्यांचा त्रास गावकºयांसह पर्यटकांनाही होऊ लागला आहे.अ़र्नाळा गावातील अपूर्वा महादेव तांडेल (९) ही मुलगी गुरुवारी संध्याकाळी आपल्या मित्रांसह समु्द्रकिनारी खेळत असताना पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी मुलांवर हल्ला केला. यावेळी अपूर्वा झुंडीच्या तावडीत सापडली. पिसाळलेल्या कुत्र्यांनी तिला अ़नेक ठिकाणी चावा घेऊन जखमी केले. गावकºयांनी कुत्र्यांना हाकलून अपूर्वाची सुटका केली.कुत्र्यांच्या तावडीत सापडलेली अपूर्वा ही पहिली मुलगी नाही. याआधी या कुत्र्यांनी समुद्रकिनाºयावर आलेल्या किमान दहाहून अधिक जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. कुत्र्यांनी मांडलेल्या उच्छादाने मॉर्निंग वॉक करणाºयांची संख्या आता कमी झाली आहे. एकटा दुकटा दिसला की कुत्र्यांची झुंड त्यांच्यावर हल्ला करताना दिसते. पर्यटकांनाही या भटक्या कुत्र्यांना त्रास सहन करावा लागत आहे.गेल्या दोन वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रासाचा सामना गावकºयांना करावा लागत आहे. वसई विरार महापालिकेचे कर्मचारी शहरातील भटकी कुत्री पकडून निर्बिजीकरण केल्यानंतर त्या कुत्र्यांना समुद्रकिनारी आणून सोडत असतात. सहा महिन्यांपूर्वी कुत्री घेऊन आलेल्या महापालिकेच्या गाडीला गावकºयांना पिटाळून लावले होते.आता रात्री अपरात्री कुत्री आणून सोडली जात आहेत. कुत्र्यांना खायला मिळत नसल्याने डंम्पिंग ग्राऊंडवर त्यांनी ठाण मांडले आहे. तर भुकलेली कुत्री समुद्रकिनारी असलेल्या स्मशानात प्रेत जळत असताना खेचून नेत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अनेकदा झुंडीने पळवून नेलेली प्रेते पुन्हा अग्नीत टाकण्याचे काम गावकºयांना करावे लागले आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या भितीने आता गावकºयांना प्रेत पूर्ण जळेपर्यंत स्मशानात ठाण मांडून राखण करीत बसावे लागत आहे.>महाालिकेचे कर्मचारी भटकी कुत्री सोडत असल्याची तक्रार गावकºयांकडून आल्यानंतर ग्रामपंचायतीने महापालिकेकडे तक्रार केलेली आहे. भटक्या कुत्र्यांमध्ये अ़नेक पिसाळलेली कुत्री आहेत. महापालिकेने त्याचा बंदोबस्त करायला हवा.-सतीश तांडेल, उपसरपंच, अर्नाळा ग्रामपंचायत