शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

वसई अन् जव्हारमध्ये मात्र सेना-भाजप ‘युती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:24 IST

संडे अँकर । वसईत शिवसेनेचा सभापती, भाजपचा उपसभापती; बहुजन विकास आघाडीला ठेवले सत्तेपासून दूर

पारोळ : राज्यात शिवसेना-भाजप एकत्र आले नसले तरी वसई पंचायत समितीत मात्र बहुजन विकास आघाडीला दूर ठेवण्यासाठी ‘युती’ची सत्ता स्थापन झाली आहे. शनिवारी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनुजा अजय पाटील सभापती, तर भाजपच्या वनिता तांडेल यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. दरम्यान, शिवसेना व भाजप यांची राज्यात युती तुटली असली तरी वसईत आणि जव्हारमध्ये ‘युती’ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

७ जानेवारी रोजी पार पडलेल्या वसई पंचायत समिती निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यात वसई तालुक्यातील ८ गणांपैकी ३ गणांत बहुजन विकास आघाडीला, ३ गणांत शिवसेनेला आणि २ गणांत भाजपला विजय मिळाला होता. सत्तास्थापनेसाठी ५ हा आकडा महत्त्वाचा असल्याने बविआ आणि शिवसेनेला साहजिकच भाजपच्या दोन विजयी उमेदवारांवर अवलंबून राहावे लागणार होते.महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांची युती न होता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्याने वसई पंचायत समितीत सत्तेसाठी युती होणार नाही, असे राजकीय जाणकारांनी वर्तवले असतानाच शिवसेना-भाजप यांची वसई पंचायत समितीत युती झाल्याने सर्व राजकीय गणिते बदलली आहेत.वसई पंचायत समितीच्या बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांना सत्तेसाठी समान संधी होती. पण त्यासाठी भाजपची साथ आवश्यक होती. यामुळे भाजप कोणासोबत जाते याकडे वसईकरांचे लक्ष लागले होते. सभापतीसाठी आरक्षण हे ओबीसी महिला असे पडले होते. त्यामुळे बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांच्याकडे ओबीसी महिला होत्या, पण सभापती निवडणुकीत भाजपने उपसभापतीपद घेत आपले समर्थन सेनेला दिल्याने तिल्हेर गणातून सेनेतून निवडून आलेल्या अनुजा पाटील यांना सभापतीपदाचा मान मिळाला. वसई पंचायत समितीवर सभापती व उपसभापती महिला झाल्याने समितीवर महिलाराज आले आहे.लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : राज्यात शिवसेना-भाजप एकत्र आले नसले तरी वसई पंचायत समितीत मात्र बहुजन विकास आघाडीला दूर ठेवण्यासाठी ‘युती’ची सत्ता स्थापन झाली आहे. शनिवारी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनुजा अजय पाटील सभापती, तर भाजपच्या वनिता तांडेल यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. दरम्यान, शिवसेना व भाजप यांची राज्यात युती तुटली असली तरी वसईत आणि जव्हारमध्ये ‘युती’ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.७ जानेवारी रोजी पार पडलेल्या वसई पंचायत समिती निवडणुकीचा निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यात वसई तालुक्यातील ८ गणांपैकी ३ गणांत बहुजन विकास आघाडीला, ३ गणांत शिवसेनेला आणि २ गणांत भाजपला विजय मिळाला होता. सत्तास्थापनेसाठी ५ हा आकडा महत्त्वाचा असल्याने बविआ आणि शिवसेनेला साहजिकच भाजपच्या दोन विजयी उमेदवारांवर अवलंबून राहावे लागणार होते.महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांची युती न होता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्याने वसई पंचायत समितीत सत्तेसाठी युती होणार नाही, असे राजकीय जाणकारांनी वर्तवले असतानाच शिवसेना-भाजप यांची वसई पंचायत समितीत युती झाल्याने सर्व राजकीय गणिते बदलली आहेत.वसई पंचायत समितीच्या बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांना सत्तेसाठी समान संधी होती. पण त्यासाठी भाजपची साथ आवश्यक होती. यामुळे भाजप कोणासोबत जाते याकडे वसईकरांचे लक्ष लागले होते. सभापतीसाठी आरक्षण हे ओबीसी महिला असे पडले होते. त्यामुळे बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांच्याकडे ओबीसी महिला होत्या, पण सभापती निवडणुकीत भाजपने उपसभापतीपद घेत आपले समर्थन सेनेला दिल्याने तिल्हेर गणातून सेनेतून निवडून आलेल्या अनुजा पाटील यांना सभापतीपदाचा मान मिळाला. वसई पंचायत समितीवर सभापती व उपसभापती महिला झाल्याने समितीवर महिलाराज आले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारShiv Senaशिवसेना