शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

१३० कोटींच्या दंडाविरोधातील ‘टिमा’ची पुनर्विचार याचिका लवादाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:22 IST

तारापूर एमआयडीसीमधील काही कारखाने आणि सीईटीपी यंत्रणा यांना हरित लवाद दिल्ली यांनी परिसरात प्रदूषण करून पर्यावरणाच्या हानीस जबाबदार ठरवून एकूण १६० कोटी ४ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

हितेन नाईक

पालघर : तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणाला जबाबदार धरीत हरित लवादाने ठोठावलेल्या १३० कोटींच्या दंडाविरोधात ‘टिमा’ने दाखल केलेले अपील फेटाळल्यानंतर पुन्हा करण्यात आलेली पुनर्विचार याचिका लवादाने फेटाळून लावली आहे. ही कारखानदारांच्या टिमा संस्थेला सणसणीत चपराक समजली जात आहे.

तारापूर एमआयडीसीमधील काही कारखाने आणि सीईटीपी यंत्रणा यांना हरित लवाद दिल्ली यांनी परिसरात प्रदूषण करून पर्यावरणाच्या हानीस जबाबदार ठरवून एकूण १६० कोटी ४ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. या आदेशाविरोधात तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टिमा) यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने तारापूर एमआयडीसीमधील कंपन्या आणि सीईटीपी यंत्रणा यांना एकूण दंडाच्या रकमेच्या ३० टक्के रक्कम एक महिन्याच्या आत भरण्याचे तसेच तज्ज्ञ समितीच्या अहवालाबाबत जे आक्षेप आहेत, त्याबाबत तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र हरित लवादात सादर करावे, असे आदेश पारित केले होते. या आदेशानंतर ‘टिमा’ने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका सादर करून न्यायालयास विनंती केली होती. त्या विनंतीनुसार ३० टक्के दंडाच्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम प्रत्यक्ष भरण्याची आणि उर्वरित ५० टक्के रक्कम बँक गॅरंटीमार्फत भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी केली होती. याबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

या सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेच्या वकिलांनी या मागणीस आपला सक्त विरोध दर्शवीत भक्कमपणे बाजू मांडली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ‘टिमा’ची मागणी फेटाळून लावली आणि दंड भरावाच लागेल, असे या कंपन्यांना स्पष्टपणे बजावले. फक्त ही रक्कम भरण्यासाठी संबंधित कंपन्या आणि टीईपीएस यांना आणखीन तीस दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते नरेंद्र नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली.तारापूर एमआयडीसीमधील कारखान्यांद्वारे स्थानिकांना रोजगार निर्मिती झाली असली तरी काही कारखान्यांमार्फत मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषित पाणी बाहेर सोडले जात असल्याने प्रदूषणाची मोठी मात्रा वाढली असून किनारपट्टीवरील गावांतील १३ हजार १८९ स्थानिकांना कॅन्सर, किडनी आधी विविध रोगांनी ग्रासल्याचे शासकीय रुग्णालयाच्या नोंदीतून समोर आले आहे.

कंपन्या शासनाचे नियम पायदळी तुडवून प्रचंड नफा कमवीत असताना आपण एवढा दंड भरू शकत नसल्याचे सांगत आहेत. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने त्यांना चांगलीच चपराक बसली आहे.- नरेंद्र नाईक, याचिकाकर्ते 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार