शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

पालघर जिल्ह्यात फक्त ९१८ शेतकऱ्यांना माफी

By admin | Updated: July 7, 2017 06:00 IST

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील कर्जमाफी लाभधारकांची

निखिल मेस्त्री/लोकमत न्यूज नेटवर्कनंडोरे : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील कर्जमाफी लाभधारकांची जिल्हानिहाय यादी ट्विटरद्वारा जाहीर केली असून यामध्ये पालघर जिल्ह्यातील केवळ ९१८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे दर्शविण्यात आल्याने जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे तर शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.याबाबतीत जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाला जिल्ह्यामार्फत दीड लाखापर्यंत व दीड लाखावरील १९ हजार ३१४ लाभार्थींची संख्या व माहिती पाठविल्याचे स्पष्ट केले.यानंतर शासन निर्णयानुसार २०१२ व आता २००९ पर्यंतचे पात्र लाभार्थींची निश्चित संख्या व माफ होणाऱ्या कर्जाची रक्कम यासंबंधीची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.सहकार विभागाने पाठविलेल्या यादीनुसार दीड लाखापर्यंतची कर्जमाफी मिळू शकणाऱ्यांची संख्या १६,६४३ आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर निघालेल्या शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१२ पासूनचे थकबाकीदार पात्र धरण्यात आले आहेत आणि पालघर सारख्या आदिवासी ग्रामीण भागातून मुंबई जिल्ह्याइतकीच (८१३) संख्या दिसूनही मुख्यमंत्र्यांना या संख्येबद्दल शंका निर्माण होऊ नये याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.हा आकडा आला कुठून?काल मुख्यमंत्रीनी यात बदल करून २००९ पासूनच्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल असे म्हटले आहे शासनाच्या या निर्णयामुळे सहकार विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या यादीतील पात्र लाभार्थींची संख्या घटू शकते हे खरे असले तरी मुख्यमंत्र्यांनी ट्विट केल्याप्रमाणे १९ हजारांपैकी १० हजार शेतकरी यातून बाद होणे असंभव आहे.त्यामुळेच ९१८ हा आकडा आला कुठून ?