शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

पालघर जिल्ह्यात फक्त ९१८ शेतकऱ्यांना माफी

By admin | Updated: July 7, 2017 06:00 IST

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील कर्जमाफी लाभधारकांची

निखिल मेस्त्री/लोकमत न्यूज नेटवर्कनंडोरे : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील कर्जमाफी लाभधारकांची जिल्हानिहाय यादी ट्विटरद्वारा जाहीर केली असून यामध्ये पालघर जिल्ह्यातील केवळ ९१८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे दर्शविण्यात आल्याने जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे तर शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.याबाबतीत जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाला जिल्ह्यामार्फत दीड लाखापर्यंत व दीड लाखावरील १९ हजार ३१४ लाभार्थींची संख्या व माहिती पाठविल्याचे स्पष्ट केले.यानंतर शासन निर्णयानुसार २०१२ व आता २००९ पर्यंतचे पात्र लाभार्थींची निश्चित संख्या व माफ होणाऱ्या कर्जाची रक्कम यासंबंधीची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.सहकार विभागाने पाठविलेल्या यादीनुसार दीड लाखापर्यंतची कर्जमाफी मिळू शकणाऱ्यांची संख्या १६,६४३ आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर निघालेल्या शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१२ पासूनचे थकबाकीदार पात्र धरण्यात आले आहेत आणि पालघर सारख्या आदिवासी ग्रामीण भागातून मुंबई जिल्ह्याइतकीच (८१३) संख्या दिसूनही मुख्यमंत्र्यांना या संख्येबद्दल शंका निर्माण होऊ नये याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.हा आकडा आला कुठून?काल मुख्यमंत्रीनी यात बदल करून २००९ पासूनच्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल असे म्हटले आहे शासनाच्या या निर्णयामुळे सहकार विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या यादीतील पात्र लाभार्थींची संख्या घटू शकते हे खरे असले तरी मुख्यमंत्र्यांनी ट्विट केल्याप्रमाणे १९ हजारांपैकी १० हजार शेतकरी यातून बाद होणे असंभव आहे.त्यामुळेच ९१८ हा आकडा आला कुठून ?