शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

पालघर जिल्ह्यात फक्त ९१८ शेतकऱ्यांना माफी

By admin | Updated: July 7, 2017 06:00 IST

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील कर्जमाफी लाभधारकांची

निखिल मेस्त्री/लोकमत न्यूज नेटवर्कनंडोरे : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील कर्जमाफी लाभधारकांची जिल्हानिहाय यादी ट्विटरद्वारा जाहीर केली असून यामध्ये पालघर जिल्ह्यातील केवळ ९१८ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे दर्शविण्यात आल्याने जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे तर शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.याबाबतीत जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाला जिल्ह्यामार्फत दीड लाखापर्यंत व दीड लाखावरील १९ हजार ३१४ लाभार्थींची संख्या व माहिती पाठविल्याचे स्पष्ट केले.यानंतर शासन निर्णयानुसार २०१२ व आता २००९ पर्यंतचे पात्र लाभार्थींची निश्चित संख्या व माफ होणाऱ्या कर्जाची रक्कम यासंबंधीची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.सहकार विभागाने पाठविलेल्या यादीनुसार दीड लाखापर्यंतची कर्जमाफी मिळू शकणाऱ्यांची संख्या १६,६४३ आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर निघालेल्या शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१२ पासूनचे थकबाकीदार पात्र धरण्यात आले आहेत आणि पालघर सारख्या आदिवासी ग्रामीण भागातून मुंबई जिल्ह्याइतकीच (८१३) संख्या दिसूनही मुख्यमंत्र्यांना या संख्येबद्दल शंका निर्माण होऊ नये याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.हा आकडा आला कुठून?काल मुख्यमंत्रीनी यात बदल करून २००९ पासूनच्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल असे म्हटले आहे शासनाच्या या निर्णयामुळे सहकार विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या यादीतील पात्र लाभार्थींची संख्या घटू शकते हे खरे असले तरी मुख्यमंत्र्यांनी ट्विट केल्याप्रमाणे १९ हजारांपैकी १० हजार शेतकरी यातून बाद होणे असंभव आहे.त्यामुळेच ९१८ हा आकडा आला कुठून ?