शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

जव्हारच्या अनेक कामांना मंजुरी

By admin | Updated: April 24, 2016 02:08 IST

येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सहा महिन्यांनी होऊन त्यात अनेक कामांना मंजुरी मिळाल्याने शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला.

जव्हार : येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सहा महिन्यांनी होऊन त्यात अनेक कामांना मंजुरी मिळाल्याने शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला. दि.२६ आॅक्टो. १५ रोजी झाली होती. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत पडलेली मोठी फूट व त्यांनी वेगळा गट स्थापन केल्याने सत्ताधारी अल्प मतात गेल्याने सर्वसाधारण सभा होऊ शकली नव्हती. त्यामुळे शहराच्या विकासकामांबाबत धोरणात्मक निर्णय व सभेची मान्यता नसल्यामुळे कामांना मंजूरी मिळणे, निविदा प्रक्रिया, वार्षिक ठेके व महत्वाचे म्हणजे या वर्षीचा अर्थसंकल्प परिषदेच्या ९८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली, अशा परिस्थितीत या सभेत प्रशासन, सत्ताधारी व विरोधक कोणत्या विषयांना प्राधान्य देवून रखडलेला विकासासाठी एकविचाराने एकत्र येतात का या बाबत सामान्यांमध्ये उत्सुकता होती.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणाला प्रचंड प्रमाणात गळती लागून दररोज ४ लाख लिटर पाणी वाया जात होते ती थांबविण्यासाठी व ओढवणारे पाणी संकट टाळण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या अभिनंदनाचा ठराव रियाज मणियार यांनी मांडला व त्यास अमोल औसरकर यांनी अनुमोदन दिले. तसेच भविष्याचा विचार करता त्या धरणाच्या खालील जागेत नवीन बंधारा बांधण्यासाठी सर्वेक्षण जलसंपदा पाटबंधारे विभागामार्फत करून घेण्याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. मध्यंतरीच्या काळात सत्ताधारी अस्तित्वात नसल्यामुळे वीज, पाणीपुरवठा, आरोग्य , घनकचरा याचे वार्षिक ठेके सर्वसाधारण सभा न झाल्यामुळे दिले गेले नाही त्यामुळे गेल्या वर्षीच्या ठेकेदारांना मुदतवाढ द्यावी कि नव्याने निविदा मागविण्यात याव्यात? या विषयावरून वाद निर्माण झाला परंतु मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी ज्या ठेक्याला तांत्रिक मान्यतेची आवश्यकता नाही त्यांची निविदा प्रक्रिया १ महिन्यात पूर्ण करू असे सभागृहास सांगितले. अमोल औसरकर यांनी डम्पिंग ग्राउंड ची जागा बदलावी ते नागरीवस्तीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले त्यावर नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनी पर्यायी जागेबाबत पाहणी करू असे आश्वासन दिले. नगरसेविका मीना जाधव यांनी पथदिप सुरु व बंद करण्यासाठी ठेकेदार नेमला जातो त्यामुळे जर या कामासाठी २ माणसांची नेमणूक केली तर न.प.चा आर्थिक फायदा होऊ शकतो यावर वैद्य यांनी प्रायोगिक तत्वावर ३ महिन्यासाठी असा प्रयोग करू असे सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संदीप वैद्य. उपनगराध्यक्षा आशा बल्लाळ, मुख्याधिकारी वैभव विधाते यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, विभागप्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)