शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारच्या अनेक कामांना मंजुरी

By admin | Updated: April 24, 2016 02:08 IST

येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सहा महिन्यांनी होऊन त्यात अनेक कामांना मंजुरी मिळाल्याने शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला.

जव्हार : येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सहा महिन्यांनी होऊन त्यात अनेक कामांना मंजुरी मिळाल्याने शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला. दि.२६ आॅक्टो. १५ रोजी झाली होती. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत पडलेली मोठी फूट व त्यांनी वेगळा गट स्थापन केल्याने सत्ताधारी अल्प मतात गेल्याने सर्वसाधारण सभा होऊ शकली नव्हती. त्यामुळे शहराच्या विकासकामांबाबत धोरणात्मक निर्णय व सभेची मान्यता नसल्यामुळे कामांना मंजूरी मिळणे, निविदा प्रक्रिया, वार्षिक ठेके व महत्वाचे म्हणजे या वर्षीचा अर्थसंकल्प परिषदेच्या ९८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली, अशा परिस्थितीत या सभेत प्रशासन, सत्ताधारी व विरोधक कोणत्या विषयांना प्राधान्य देवून रखडलेला विकासासाठी एकविचाराने एकत्र येतात का या बाबत सामान्यांमध्ये उत्सुकता होती.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणाला प्रचंड प्रमाणात गळती लागून दररोज ४ लाख लिटर पाणी वाया जात होते ती थांबविण्यासाठी व ओढवणारे पाणी संकट टाळण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या अभिनंदनाचा ठराव रियाज मणियार यांनी मांडला व त्यास अमोल औसरकर यांनी अनुमोदन दिले. तसेच भविष्याचा विचार करता त्या धरणाच्या खालील जागेत नवीन बंधारा बांधण्यासाठी सर्वेक्षण जलसंपदा पाटबंधारे विभागामार्फत करून घेण्याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. मध्यंतरीच्या काळात सत्ताधारी अस्तित्वात नसल्यामुळे वीज, पाणीपुरवठा, आरोग्य , घनकचरा याचे वार्षिक ठेके सर्वसाधारण सभा न झाल्यामुळे दिले गेले नाही त्यामुळे गेल्या वर्षीच्या ठेकेदारांना मुदतवाढ द्यावी कि नव्याने निविदा मागविण्यात याव्यात? या विषयावरून वाद निर्माण झाला परंतु मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी ज्या ठेक्याला तांत्रिक मान्यतेची आवश्यकता नाही त्यांची निविदा प्रक्रिया १ महिन्यात पूर्ण करू असे सभागृहास सांगितले. अमोल औसरकर यांनी डम्पिंग ग्राउंड ची जागा बदलावी ते नागरीवस्तीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले त्यावर नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनी पर्यायी जागेबाबत पाहणी करू असे आश्वासन दिले. नगरसेविका मीना जाधव यांनी पथदिप सुरु व बंद करण्यासाठी ठेकेदार नेमला जातो त्यामुळे जर या कामासाठी २ माणसांची नेमणूक केली तर न.प.चा आर्थिक फायदा होऊ शकतो यावर वैद्य यांनी प्रायोगिक तत्वावर ३ महिन्यासाठी असा प्रयोग करू असे सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संदीप वैद्य. उपनगराध्यक्षा आशा बल्लाळ, मुख्याधिकारी वैभव विधाते यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, विभागप्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)