शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारच्या अनेक कामांना मंजुरी

By admin | Updated: April 24, 2016 02:08 IST

येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सहा महिन्यांनी होऊन त्यात अनेक कामांना मंजुरी मिळाल्याने शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला.

जव्हार : येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सहा महिन्यांनी होऊन त्यात अनेक कामांना मंजुरी मिळाल्याने शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला. दि.२६ आॅक्टो. १५ रोजी झाली होती. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत पडलेली मोठी फूट व त्यांनी वेगळा गट स्थापन केल्याने सत्ताधारी अल्प मतात गेल्याने सर्वसाधारण सभा होऊ शकली नव्हती. त्यामुळे शहराच्या विकासकामांबाबत धोरणात्मक निर्णय व सभेची मान्यता नसल्यामुळे कामांना मंजूरी मिळणे, निविदा प्रक्रिया, वार्षिक ठेके व महत्वाचे म्हणजे या वर्षीचा अर्थसंकल्प परिषदेच्या ९८ वर्षाच्या इतिहासात प्रथमच मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली, अशा परिस्थितीत या सभेत प्रशासन, सत्ताधारी व विरोधक कोणत्या विषयांना प्राधान्य देवून रखडलेला विकासासाठी एकविचाराने एकत्र येतात का या बाबत सामान्यांमध्ये उत्सुकता होती.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणाला प्रचंड प्रमाणात गळती लागून दररोज ४ लाख लिटर पाणी वाया जात होते ती थांबविण्यासाठी व ओढवणारे पाणी संकट टाळण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या अभिनंदनाचा ठराव रियाज मणियार यांनी मांडला व त्यास अमोल औसरकर यांनी अनुमोदन दिले. तसेच भविष्याचा विचार करता त्या धरणाच्या खालील जागेत नवीन बंधारा बांधण्यासाठी सर्वेक्षण जलसंपदा पाटबंधारे विभागामार्फत करून घेण्याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. मध्यंतरीच्या काळात सत्ताधारी अस्तित्वात नसल्यामुळे वीज, पाणीपुरवठा, आरोग्य , घनकचरा याचे वार्षिक ठेके सर्वसाधारण सभा न झाल्यामुळे दिले गेले नाही त्यामुळे गेल्या वर्षीच्या ठेकेदारांना मुदतवाढ द्यावी कि नव्याने निविदा मागविण्यात याव्यात? या विषयावरून वाद निर्माण झाला परंतु मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी ज्या ठेक्याला तांत्रिक मान्यतेची आवश्यकता नाही त्यांची निविदा प्रक्रिया १ महिन्यात पूर्ण करू असे सभागृहास सांगितले. अमोल औसरकर यांनी डम्पिंग ग्राउंड ची जागा बदलावी ते नागरीवस्तीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले त्यावर नगराध्यक्ष संदीप वैद्य यांनी पर्यायी जागेबाबत पाहणी करू असे आश्वासन दिले. नगरसेविका मीना जाधव यांनी पथदिप सुरु व बंद करण्यासाठी ठेकेदार नेमला जातो त्यामुळे जर या कामासाठी २ माणसांची नेमणूक केली तर न.प.चा आर्थिक फायदा होऊ शकतो यावर वैद्य यांनी प्रायोगिक तत्वावर ३ महिन्यासाठी असा प्रयोग करू असे सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संदीप वैद्य. उपनगराध्यक्षा आशा बल्लाळ, मुख्याधिकारी वैभव विधाते यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, विभागप्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)