शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पालघरात असंघटीत कामगारांना पेन्शन लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:20 IST

जिल्ह्यातील सर्व असंघटीत कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून वयाच्या साठाव्या वर्षानंतर कमीतकमी तीन हजार रुपये पेन्शन मिळणार

पालघर : जिल्ह्यातील सर्व असंघटीत कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून वयाच्या साठाव्या वर्षानंतर कमीतकमी तीन हजार रुपये पेन्शन मिळणार असून यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होणार आहे. अनेक योजनांपासून वंचित असणाऱ्या या असंघटीतांना न्याय मिळवून देण्याचा संघटीतपणे प्रयत्न करू असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी केले.जिल्ह्यात तारापूर एमआयडीसी, पालघरमधील बिडको आदी वसाहती, वाडा, विक्रमगड, डहाणू, वसई, तलासरी आदी भागातील कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात असंघटीत कामगार आहेत. जिल्ह्याला २५ हजार असंघटीत कामगारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यातील ५ हजार ५०० कामगारांची नोंदणी करण्यात आली असली तरी आम्ही आपले उद्दिष्ट वेळीच पूर्ण करू असा आशावाद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी प्रस्ताविकेतून व्यक्त केला. एमआयडीसी कारखान्यातून कामगारांची नोंदणी करण्याबाबत तारापूरच्या कामगार उपायुक्तांकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटीत कामगारांच्या आयुष्यात दूरगामी परिणाम करणारी योजना असल्याचे सांगून कामगारांच्या पगारातील थोड्या रक्कमेत राज्यशासनाचाही वाटा समविष्ट करून तिचा फायदा त्यांना मिळून त्यांचा वृद्धापकाळ सुखावह होईल असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी व्यक्त केले.रिक्षा चालक, फेरीवाले, मिड-डे मील कामगार, माथाडी कामगार, शेती मजूर, घर कामगार इत्यादीना अनेक आर्थिक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. या १८ ते ४० वयोगटातील १५ हजारापेक्षा कमी मासिक वेतन असणाऱ्या असंघटीत कामगारांना योग्यवेळी पेन्शन मिळाल्याने त्यांना मोठा आधार मिळणार आहे असे बोरीकर यांनी यावेळी सांगतिले. यावेळी प्रासंगिक स्वरुपात जिल्ह्यातील निवडक लाभार्थींना त्यांचे नोंदणी पत्र देण्यात आले.