शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पालघरकरांना गंडा घालणारा अन्सारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:51 IST

२० हजार भरा तात्काळ ५ लाखाचे कर्ज देतो अशी जाहिरात करून पाचवी शिकलेल्या मुंबईतील ताहीर अन्सारी याने पालघरमधील बिल्डर, उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा चुना लावून पोबारा केला होता.

हितेंन नाईकपालघर : २० हजार भरा तात्काळ ५ लाखाचे कर्ज देतो अशी जाहिरात करून पाचवी शिकलेल्या मुंबईतील ताहीर अन्सारी याने पालघरमधील बिल्डर, उच्च शिक्षितांना लाखो रुपयांचा चुना लावून पोबारा केला होता. मात्र पालघरचे पोलीस उपनिरीक्षक सुहास कांबळे यांनी त्याला मुंबईतील त्याच्या कार्यालयातून अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली.मानव सेवा नावाच्या एका सेवाभावी संस्थेच्या नावाखाली २० हजार भरा, ५ लाखाचे कर्ज घ्या, ४ लाख भरा, दोन वर्षात दुप्पट रक्कम घ्या, अशी आकर्षक आमिषे दाखविणाऱ्या ेजाहिराती पालघरमध्ये त्याने प्रसिद्ध केल्या होत्या. जुन्या पालघरमध्ये राहणाºया पुष्पा रमेश पाटील या एका महिलेला त्याने आपल्या मानव संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्षपद तर राजेंद्र मोरे याला जिल्हाध्यक्षपद देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. दोघांनी पालघर स्टेशनच्या पूर्वेकडील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये एक गाळा भाड्याने घेऊन तिथे आपला गोरखधंदा सुरू केला. पुष्पा पाटील आणि मोरे हे स्थानिक असल्याने त्यांच्या संपर्कातील आदिवासी, अशिक्षित तर काही बिल्डर, एमबीए झालेल्या उच्चशिक्षितांनी २५० रुपये सभासद फी चा फॉर्म भरून २० हजारा पासून ४ लाखा पर्यंतच्या रक्कमा या मानवसेवाच्या स्कीममध्ये गुंतविल्या. या योजनेचे फॉर्म भरल्या नंतर त्या फॉर्म ची व अन्य कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दिल्ली ब्रँच मधून आॅडिटर येणार असल्याचे सांगून ग्राहकांना काही दिवस वाट बघायला लावली जायची. जिल्ह्यातील २०० ते ३०० ग्राहकांची सुमारे १९ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.नालासोपारा येथील अनिल गोंड आणि कृष्णा नामक दोन तरुणांची निवड आरोपी ताहीर अन्सारी याने आॅडिटर म्हणून केली होती. हे तरुण त्या फॉर्म मधील काही त्रुटीची पूर्तता करून देण्याच्या कामासाठी महिना, दोन महिन्यांनी येत असत. ९ वी पास असणारे हे दोन तरुण साथीदार मोठ्या खुबीने कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम करीत होते. अनेक महिने गेल्यानंतर पैसे भरूनही कर्जाची रक्कम मिळत नसल्याने ग्राहकांनी पैसे परत मागण्याचा तगादा पुष्पा पाटील यांच्या मागे लावला. आपले पैसे परत मागण्यासाठी ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने पुष्पा पाटीलने अन्सारीकडे विचारणा सुरू केली. मात्र तो ही टाळाटाळ करीत असल्याचे तिच्या लक्षात आल्यावर तिने सरळ पालघर पोलीस स्टेशन गाठले.या प्रकरणी तिच्या फिर्यादी वरून ताहीर अन्सारी विरोधात फसवणूक आणि एमपीआयडी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पालघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे ह्यांनी उपनिरीक्षक सुहास कांबळे ह्यांच्या कडे तपास सोपवला. आरोपी अन्सारीच्या मोबाईलवर कांबळे यांनी संपर्क साधून आपण पालघर वरून बोलतो असे सांगितल्यावर तो फोन कट करू लागला. त्यांनी दुसºया मोबाईल वरून संपर्क साधला असता आपण कुणाचे पैसे घेतले नसल्याचे सांगून पुष्पा पाटीलचे हे कारस्थान असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी फिर्यादी पुष्पांची चौकशी केली असता या प्रकरणात ती स्वत: आणि मोरे बरोबरीचे सहकारी असल्याचे निदर्शनास आले आहे.सध्या दोन्ही आरोपीवर आग्रीपाडा पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल होऊन त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशा भूलथापाना बळी पडू नका असे आवाहन पीएसआय कांबळी यांनी केले आहे.>आरोपीच्या अटकेसाठी असा लावला सापळाउपनिरीक्षक कांबळेंना मुख्य आरोपी हा मुंबईतील आग्रीपाडा येथे राहत असल्याची माहिती मिळाल्या नंतर त्याच्या घर झडतीत कर्ज देणे, पैसे दुप्पट करून देणे, आदी विविध प्रकारचे कोरे फॉर्म सापडले. त्याने नायर हॉस्पिटल जवळ एक आॅफिस थाटल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सरळ त्याचे आॅफिस गाठून आपल्याला २० हजार गुंतवायचे असल्याची माहिती त्यातील मुलाला दिली. त्याने अन्सारीशी संपर्क साधताच काही वेळाने तो आपल्या कार्यालयात हजर झाला आणि पीएसआय कांबळे यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने मानवसेवा नामक साप्ताहिक आणि युट्यूबवर आपले चॅनल सुरू केल्याची माहितीही पुढे आली असून चॅनल आणि साप्ताहिकचा मालक, पत्रकार असल्याने अनेक लोकांनी त्याच्यावर आंधळा विश्वास टाकला होता.