शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

पाण्याविनाच हगणदारी मुक्ती?, पालघर जि.प.ने केलेली घोषणा वादाच्या भोव-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 04:09 IST

पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भीक्ष्य असतांना जिल्हा परिषदेने जिल्हा हगणदारी मुक्त झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ती कितपत खरी असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.

- रविंद्र साळवेमोखाडा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भीक्ष्य असतांना जिल्हा परिषदेने जिल्हा हगणदारी मुक्त झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ती कितपत खरी असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.वसई, पालघर, बोईसर, डहाणू, वाडा या तालुक्यांचा शहरी भाग सोडला तर जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू, वाडा, तलासरी या तालुक्यातील आदिवासी गाव - पाड्यांतील पाणी टंचाईचा टाहो जानेवारी महिना संपताच सुरू होतो पाणीटंचाईच्या तडाख्यातून मोखाड्याचा शहरीभाग ऐन पावसाळ्यात सुध्दा वाचलेला नाही अशा स्थितीत ही घोषणा जि.प.ने केली तरी कशी असा प्रश्न आहे.ग्रामीण भागात जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरू होणारे पाण्याचे दुर्भिक्ष बघता प्रशासनाच्या कागदी घोड्यांवर विसंबून ही घोषणा जि.प.ने केली आहे. तसेच बºयाच ग्रामपंचायतीमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून बांधकाम सुरू केलेली शौचालये अपूर्णच आहेत. याबाबत एकाही ग्रामपंचायतीने ठेकेदारावर कारवाई केल्याचे समोर आलेले नाही यामुळे शौचालयाचे बांधकाम अपूर्ण असतांना हागणदारीमुक्ती झाली कशी?अधिकाºयांनी शोबाजी करून फक्त तालुक्यातील केवळ नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या, ग्रामपंचायती क्षेत्रातील नागरिकांकडून अधिकाºयांनी सक्तीने शौचालये बांधून घेतली म्हणजे हागणदारी मुक्ती होत नाही. कारण या शौचालयांना पाण्याचा पुरवठाच केला गेलेला नाही. आजही ग्रामीण भागात उघड्यावर शौचालयास जाण्याचे प्रमाण अधिक आहे. तर प्रत्येक वर्षी मोखाडा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावपाड्यांच्या संख्येत दुपटीने वाढ होत असते तर गाव - पाड्यातील जनता हातची कामे सोडून दिवस रात्र पाणी भरण्यासाठी मैलोनमैल प्रवास करीत असते. अशा स्थितीत हगणदारीमुक्तीची घोषणा कितपत सत्य मानावी.ही घोषणा म्हणजे निव्वळ हवेतला तीर- अनेक शौचालये अपूर्ण आहेत. कुठे ठेकेदाराची हलगर्जी तर कुठे अनुदानाचा हप्ताच मिळालेला नाही. अशी कारणे त्यामागे आहेत. याबाबत कुणीही आवाक्षर उच्चारत नाही.- जिल्ह्यात एकूण किती शौचालये बांधणीचे प्रस्ताव होते, किती मंजूर झाले, त्यांच्या निधीचे वाटप कसे झाले, त्यांना पाणीपुरवठा झाला का? याची कोणतीही खातरजमा प्रशासनाने केल्याचे स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार