शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

भाताबरोबर जनावरांचा चाराही झाला खराब; शेतकरी सापडला दुहेरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 22:52 IST

वाडा येथील परिस्थिती : करपे भिजल्याने तरंगू लागली

वाडा : वाडा तालुक्यात परतीच्या पावसाने भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आठवडाभर परतीचा पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले भातपीक पावसामुळे शेतातच असल्याने कोंब आले आहेत. तर पेंढाही काळाभोर पडला असून तो जनावरांना खाण्यास योग्य राहिला नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक पडला असल्याने उत्पन्न चांगले आहे. भातपीक सोन्यासारखे चमकत होते. मात्र परतीच्या पावसाने या पिकाचे नुकसान झाले. दहा दिवसांपूर्वी कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी जव्हार, मोखाडा येथून मजूर आणून भाताची कापणी सुरू केली होती. कापणी केलेल्या भाताची कडपे दोन दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवली असता परतीच्या पावसाने सुरूवात केली तो आठ ते दहा दिवस पडतच राहिला. पावसाने करपे भिजली असून काही ठिकाणी ती तरंगू लागली आहेत.

भाताचे दाणे परिपक्व असल्याने या दाण्यांना शेतातच कोंब फुटू लागले आहेत. भात तर खराब झालाच पण जनावरांचा पेंढाही काळाभोर पडला असून तो जनावरांना खाण्यास योग्य राहिला नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापूर्वी पाऊस गेल्याने भातपिकांचे नुकसान झाले होते. तर यावर्षी परतीच्या पावसाने भातपिकांचे नुकसान झाले आहे.भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे उद्यापासून सुरू करणार आहोत. - माधव हासे, तालुका कृषी अधिकारी