शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

संतप्त मच्छीमारांनी बार्जला पिटाळले

By admin | Updated: March 17, 2016 02:39 IST

तारापूरच्या औद्योगिक वसाहतीमधून प्रदुषीत रासायनिक सांडपाण्याचे पाईप नवापूर गावाच्या समोरील समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याच्या कामासाठी आलेल्या एमटीसी टाईड

- हितेन नाईक,  पालघरतारापूरच्या औद्योगिक वसाहतीमधून प्रदुषीत रासायनिक सांडपाण्याचे पाईप नवापूर गावाच्या समोरील समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याच्या कामासाठी आलेल्या एमटीसी टाईड या कंपनीच्या बार्जला दांडी गावातील मच्छीमारांच्या बोटीनी समुद्रात घेराव घातला. आणि त्यांना पिटाळून लावले. यावेळी मोठ्या संख्येने महिलाही समुद्रात गेल्या होत्या.तारापुरच्या औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामधून बाहेर निघणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) नवापूर गावातून पाईप लाईनद्वारे समुद्रात सोडले जात होते. या मागील चाळीस वर्षापासून टाकण्यात आलेल्या पाईपलाईन जुनाट व नादुरूस्त झाल्याने एमआयडीसीने ही जुनाट पाईपलाईन बदलून त्या जागी नवीन एचडीपीई पाईप लाईन समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याचे काम हाती घेतले होते. याद्वारे समुद्रात सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मच्छीमारीचा गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा मत्स्य संपदेचा भाग नष्ट होणार असल्याने मच्छीमारांचा या कामाला विरोध होता. नवापूर ग्रामपंचायतीने लाखो रू. चा विकास निधी स्वीकारून आपल्या गावातून या पाईपलाईन टाकण्यास परवानगी दिल्याने किनारपट्टीवरील मच्छीमार गावामधून संतप्त प्रतिक्रीया उमटत होत्या. दि. २७ फेब्रुवारी रोजी उच्छेळी-दांडी येथील शेकडो पुरूष महिलांनी नवापूर गावासमोरील समुद्रावर पाईपलाईन टाकण्याचे काम बंद पाडले होते. यावेळी नवापूर व उच्छेळी-दांडीच्या ग्रामस्थांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. तर या प्रदूषित पाण्याच्या पाईपलाईनमुळे भविष्यात निर्माण होणारे पर्यावरणाचे दुष्यपरीणाम पाहता हे काम बंद करण्यासाठी अनेक अर्ज विनंत्या करूनही हे काम थांबत नसल्याने काही अज्ञात व्यक्तींनी पाम येथे रस्त्यावर टाकलेले पाईप पेटवून दिले असावेत अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. सातपाटी सागरी पो. स्टे. मध्येही अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या मच्छीमार किनारपट्टीवर जिंदाल, वाढवण हे बंदर प्रकल्प स्थानिकांवर लादले जात असतांना एमआयडीसीमधून थेट समुद्रात प्रदूषित पाण्याची पाईपलाईन सोडल्याने आधीच मत्स्य दुष्काळाच्या खाईत होरपळत असलेल्या मच्छीमारांचा व्यवसाय संपुष्टात येईल. त्यामुळे मच्छीमार संतप्त झाला असून आज नवापूर गावासमोरील समुद्रात अंधेरी येथील एमटीसी टाईड या कंपनीचा बार्ज पाईप टाकण्याचे काम हाती घेत असल्याचे कळल्यानंतर उच्छेळी-दांडीच्या मच्छीमारांनी आपापल्या बोटी थेट समुद्रात नेल्या. सुधीर तामोरे, विजय तामोरे, विद्याधर केणी, राजीव पागधरे, रोहीदास तामोरे, इ. सह रणरागिणी बनलेल्या संगीता अक्रे इ. व शेकडो महिलांनी या बार्जला पिटाळून लावले.