शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त मच्छीमारांनी बार्जला पिटाळले

By admin | Updated: March 17, 2016 02:39 IST

तारापूरच्या औद्योगिक वसाहतीमधून प्रदुषीत रासायनिक सांडपाण्याचे पाईप नवापूर गावाच्या समोरील समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याच्या कामासाठी आलेल्या एमटीसी टाईड

- हितेन नाईक,  पालघरतारापूरच्या औद्योगिक वसाहतीमधून प्रदुषीत रासायनिक सांडपाण्याचे पाईप नवापूर गावाच्या समोरील समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याच्या कामासाठी आलेल्या एमटीसी टाईड या कंपनीच्या बार्जला दांडी गावातील मच्छीमारांच्या बोटीनी समुद्रात घेराव घातला. आणि त्यांना पिटाळून लावले. यावेळी मोठ्या संख्येने महिलाही समुद्रात गेल्या होत्या.तारापुरच्या औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामधून बाहेर निघणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) नवापूर गावातून पाईप लाईनद्वारे समुद्रात सोडले जात होते. या मागील चाळीस वर्षापासून टाकण्यात आलेल्या पाईपलाईन जुनाट व नादुरूस्त झाल्याने एमआयडीसीने ही जुनाट पाईपलाईन बदलून त्या जागी नवीन एचडीपीई पाईप लाईन समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याचे काम हाती घेतले होते. याद्वारे समुद्रात सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मच्छीमारीचा गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा मत्स्य संपदेचा भाग नष्ट होणार असल्याने मच्छीमारांचा या कामाला विरोध होता. नवापूर ग्रामपंचायतीने लाखो रू. चा विकास निधी स्वीकारून आपल्या गावातून या पाईपलाईन टाकण्यास परवानगी दिल्याने किनारपट्टीवरील मच्छीमार गावामधून संतप्त प्रतिक्रीया उमटत होत्या. दि. २७ फेब्रुवारी रोजी उच्छेळी-दांडी येथील शेकडो पुरूष महिलांनी नवापूर गावासमोरील समुद्रावर पाईपलाईन टाकण्याचे काम बंद पाडले होते. यावेळी नवापूर व उच्छेळी-दांडीच्या ग्रामस्थांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. तर या प्रदूषित पाण्याच्या पाईपलाईनमुळे भविष्यात निर्माण होणारे पर्यावरणाचे दुष्यपरीणाम पाहता हे काम बंद करण्यासाठी अनेक अर्ज विनंत्या करूनही हे काम थांबत नसल्याने काही अज्ञात व्यक्तींनी पाम येथे रस्त्यावर टाकलेले पाईप पेटवून दिले असावेत अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. सातपाटी सागरी पो. स्टे. मध्येही अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या मच्छीमार किनारपट्टीवर जिंदाल, वाढवण हे बंदर प्रकल्प स्थानिकांवर लादले जात असतांना एमआयडीसीमधून थेट समुद्रात प्रदूषित पाण्याची पाईपलाईन सोडल्याने आधीच मत्स्य दुष्काळाच्या खाईत होरपळत असलेल्या मच्छीमारांचा व्यवसाय संपुष्टात येईल. त्यामुळे मच्छीमार संतप्त झाला असून आज नवापूर गावासमोरील समुद्रात अंधेरी येथील एमटीसी टाईड या कंपनीचा बार्ज पाईप टाकण्याचे काम हाती घेत असल्याचे कळल्यानंतर उच्छेळी-दांडीच्या मच्छीमारांनी आपापल्या बोटी थेट समुद्रात नेल्या. सुधीर तामोरे, विजय तामोरे, विद्याधर केणी, राजीव पागधरे, रोहीदास तामोरे, इ. सह रणरागिणी बनलेल्या संगीता अक्रे इ. व शेकडो महिलांनी या बार्जला पिटाळून लावले.