शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

घाणेरड्या परिवहन सेवेने नाराज

By admin | Updated: August 26, 2015 23:50 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीत परिवहन सेवा सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला खरा, परंतु सेवेत असलेल्या वाहनांच्या स्वच्छतेकडे तिचे

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीत परिवहन सेवा सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला खरा, परंतु सेवेत असलेल्या वाहनांच्या स्वच्छतेकडे तिचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रवासीवर्गात प्रचंड नाराजी आहे. परिवहन सेवेकडे अद्याप आगारासाठी जागा नसल्यामुळे वाहनांची निगा राखणे ठेकेदाराला शक्य होत नाही. याबाबत, महानगरपालिकेने लक्ष घालावे अशी प्रवासीवर्गाकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या प्रवासीवर्गाला महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने चांगलाच दिलासा दिला. मात्र, अस्वच्छ व घाणेरड्या गाड्यांमुळे शाळा-कॉलेज तसेच कार्यालयांत जाणाऱ्यांचे अनेक वेळा कपडे खराब होतात. सध्या या परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे १०० ते १५० बसेस आहेत. परंतु या बसेसची निगा राखणे, स्वच्छता करणे, बसेस धुणे आदींसाठी लागणाऱ्या आगाराची कमतरता आहे. त्यामुळे परिवहन सेवेच्या बसेस रस्त्यावरच उभ्या करण्यात येतात. अनेक बसेसना गेल्या काही महिन्यात धुतलेल्याच नाहीत. या अस्वच्छतेमुळे प्रवासीवर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. परिवहन सेवेने तिकिटाच्या दरात वाढ केली तरी प्रवाशांनी त्यास संमती दिली, परंतु बसेसमधील अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही दुरावस्था संपणार कधी असा सवाल प्रवासी करीत आहेत.(प्रतिनिधी)