शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

वाढवण बंदर सर्व्हेसाठी आलेल्यांविरुद्ध संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:33 IST

पोलीस ठाण्यात तक्रार : जनतेची मने वळवण्याचे प्रयत्न : महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आंदोलन उभारणार

डहाणू/विरार : प्रस्तावित वाढवण बंदर उभारणाऱ्या जेएनपीटीविरोधात बंदर परिसरात जनक्षोभ भडकला असतानाच सोमवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान जेएनपीटीमार्फत येथील जनतेची मने वळविण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याकरिता ठेका घेतलेल्या मुंबईच्या कंपनीचे काही लोक वाढवण बंदराच्या सर्व्हेकरिता आले.  याची माहिती स्थानिकांना कळताच येथील लोकांचा जनक्षोभ अधिकच भडकला आणि थोडा वेळ वातावरण तंग झाले. दरम्यान, वाढवण बंदर विकसित झाले तर मुंबईपासून पालघर, डहाणू, झाईपर्यंतचा मच्छीमार समाज उद्ध्वस्त होणार असल्याने  महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीमार्फत आंदोलन उभारण्यात  येणार आहे. 

जेएनपीटीचे लोक वाढवण बंदराच्या सर्वेच्या कामासाठी आल्याचे कळताच तेथे आलेल्या गाडीला लोकांनी घेराव घातला आणि गाडीत बसलेल्या एका महिलेसह तीन जणांकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांच्याकडे कोणतीही परवानगी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांना चिंचणी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्पेश विसे यांनी चौकशी केली असता त्यांना माजी नायब तहसीलदार पिरजादा यांच्या सांगण्याने बंदराच्या माहितीसाठी वरोरचे कोतवाल नंदू जाधव यांच्याकडे पाठविले असल्याची कबुली त्यांनी दिली. त्याप्रमाणे संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यासाठी गावकऱ्यांनी तक्रारी अर्ज दिला आहे.

दरम्यान, वाढवण बंदर विकसित झाले तर मुंबईपासून पालघर, डहाणू, झाईपर्यंतचा मच्छीमार समाज उद्ध्वस्त होईल. त्यामुळे महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली आक्रमक आंदोलन उभे केले जाईल. त्यास मच्छीमार बंधू-भगिनीनी साथ द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी केले.

दरवर्षी २१ नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मच्छिमारांचा हा आनंदाचा, जल्लोशाचा दिवस असताना शासनातील मत्स्यव्यवसाय खात्यातील अधिकारी कशाकरिता आजच्या दिवशी शाश्वत मासेमारीच्या कार्यशाळा भरवितात, अशा सवाल किरण कोळी यांनी केला.कार्यक्रमाचे निटनेटके आयोजन करणाऱ्या गावातील संस्थांचे त्यांनी कौतुक केले. तर फेसबुक, व्हाॅटसॲपवर मोठमोठ्या भाषा करणाऱ्यांनी समाजाच्या कार्यक्रमामध्ये व मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. दरम्यान, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी प्रस्तावना केली. तर विजय थाटू, फिलीप मस्तान, राजेन मेहेर, जयकुमार भाय, पूर्णिमा मेहेर इत्यादींची भाषणे झाली. व्यासपीठावर मोरेश्वर पाटील, ज्योती मेहर, उज्वला पाटील, गणेश भुर्की, इनास डेढू, सरपंच हेमलता बाळसी, उपसरपंच महींद्र पाटील इत्यादी होते.

जनजागृती यात्रा काढण्याचे आवाहनजागतिक मच्छीमार दिन कार्यक्रम अर्नाळा कोळीवाडा, विरार येथे नुकताच आयोजित करण्यात आला. या वेळी प्रथम कोळी महिलांनी कांदळवन (तिवर) झाडांची बंदरपाडा खाडीवर पूजा-आरती करून व अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ केला. नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वाढवण बंदराविरोधात जनजागृती यात्रा काढण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार