शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
4
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
5
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
6
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
7
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
8
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
9
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
10
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
11
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
12
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
13
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
14
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
15
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
16
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
17
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
18
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
19
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:43 IST

विक्रमगड : तालुक्याचे नाव केवळ विक्रमगड मात्र येथील नागरीक वर्षानुवर्षे समस्या सहन करण्याचा विक्रम करीत असतात़

राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्याचे नाव केवळ विक्रमगड मात्र येथील नागरीक वर्षानुवर्षे समस्या सहन करण्याचा विक्रम करीत असतात़ तालुक्याचा विक्रम म्हणजे कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी अपुºया मनुष्य बळामुळे पोलिसांचीच दमछाक होते आहे.तालुक्यात पोलिस कार्यालय एक असून, त्याची रचना विचित्र आहे. कारण तालुक्यातील काही गावे विक्रमगड तालुक्यात येतात तर पोलिस कार्यालय मनोर, कासा, जव्हार अशा दुस-या तालुक्यात़ त्यातही विक्रमगडच्या पोलिस कार्यालयात तालुक्याच्या मानाने पोलिसांची संख्या अत्यंत कमी असून, ६० गावांच्या व १२० पाडयांच्या कार्यक्षेत्रासाठी अवघे ४० पोलीस आहेत. तर पोलिसांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करणाºया पोलिस पाटलांचीही अनेक गावातील पदेही रिक्त आहे.विक्रमगड तालुका हा आदिवासी बहुल असल्याने तसेच विक्रमगड पोलिस हद्दीतील ६० गावे १२० पाडयांस सुरक्षा पुरवितांना अपुºया पोलिसांमुळे कार्यरत असलेल्या पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडून त्यांची तारांबळ उडते आहे़ येथे पोलिस अधिकारी म्हणून विजय शिंदे यांची दुसºयांदा या पदी नियुक्ती करण्यात आली आहे़ मध्यतरी त्यांची बदली बोईसर येथे झाली होती़ तर एपीआय म्हणून विश्वास पाटील हे काम पाहत आहे़ या पोलिस ठाण्यात ४० पोलिस कर्मचारी, त्यामध्ये ८ महिलांचा कर्म-यांचा समावेश आहे़ या ४० कर्मचाºयांतच दोन अधिकाºयांचाही समावेश आहे. असे अपुरे संख्याबळ असल्याने ६० गावे व १२० पाडे व दिड लाखाच्या घरात लोकसंख्या असल्याने कायदा सुव्यवस्था राखायची कशी? असा प्रश्न पोलिसांना पडतो. त्यातच संघटनांची आंदोलने, राजकिय पक्षांचे मोर्चे याची भर पडत असते.तालुक्याच्या मानाने सद्यस्थितीच्या परिस्थितीनुसार ६० पोलिस कर्मचारी एक पोलिस निरीक्षक, एक ए़ पी़ आय़, चार पोलिस उपनिरीक्षक अशी पदे असणे आवश्यक आहे़ ब्रिटीश काळापासून विक्रमगड पोलिस कार्यालयात कर्मचारी व अधिकारी भरती केली नसल्याने सद्यस्थितीत विक्रमगड पोलिस कार्यालयात ६० गावांच्या व १२० पाडयांच्या सुरक्षेतेसाठी फक्त ४० कर्मचारी आहेत़ त्यामुळे पोलिसांना अतिरिक्त कामाचा ताण,बंदोबस्त, दिवस रात्रीची गस्त, वारंट बजावणे,कोर्टात जाणे, पेट्रोलिंग करणे, किरकोळ भांडणे सोडविणे अपघात या कामांच्या ताणामुळे व अपु-या पोलिस बळामुळे विक्रमगड व परिसरा आसपास असणा-या गाव खेडया पाडयांचा सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे़पोलिस पाटील हा गावकºयांसाठी भांडणे, तंटे स्थानिक पातळीवर मिटविणारा व पोलिसांना गाव-पाडयातील माहिती देणारा महत्वाचा दुआ आहे़ त्यामुळे प्रत्येक गावात-पाडयांसाठी स्वतंत्र पोलिस पाटलांची आवश्यकता आहे़विक्रमगड पोलिस कार्यक्षेत्रात तालुक्यातील ६० गावांचा समावेश असुन, त्यातील बहुसंख्य पदे रिक्तच आहे़ त्यामुळे एकेका पोलिस पाटलाला दोन-तीन गावांची जबाबदारी पार पाडावी लागते़>पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्डही उपेक्षितकायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असलेले व प्रत्येक कार्यक्रमांच्या वेळी व निवडणूक, नवरात्र, गणपती आदीसांठी होमगार्ड पोलिसांप्रमाणेच चोख सुरक्षेसाठी बंदोबस्तांत महत्वाची भूमिका बजावित असतांत परंतु ते ही आजही उपेक्षित आहेत़ या दलाच्या अनेक मागण्या प्रलंबित असुन, शासनदरबारी त्यांची नोंद घेतली जात नसल्याच्या त्यांच्याही तक्रारी आहेत़>विक्रमगडमधील वाहतूक नियंत्रणडहाणू-वाडा-मनोर या महामार्गावरुन विक्रमगडमधून मुख्य बाजारातून मोठया प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरु असून, त्यामुळे सकाळी व सायंकाळी या मार्गावरील गडदे येथील तांबाडी पूल व अन्य पूलावर वाहतुककोंडी होते आहे. हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे़ त्यामुळे बारीक सारिक अपघातांमध्ये वाढ होत आहे़>एक दिवसाच्या जनतादरबाराची गरजविक्रमगड पोलिस कार्यालयात वरिष्ठ अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली थेट जनतेशी व जनतेचा पोलिसांची संपर्क येवून घडलेल्या घडामोडींचा व वाद, विवाद कसे टाळावे तंटे गावातच कशा प्रकारे मिटवावेत यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी जनता दरबाराची आवश्यकता आहे़ गावपातळीवर तंटामुक्ती समित्या नेमण्यांत आलेल्या आहेत़ तक्रार निवारणासाठी शुक्रवार होता मात्र त्यात सातत्य नाही़