शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:43 IST

विक्रमगड : तालुक्याचे नाव केवळ विक्रमगड मात्र येथील नागरीक वर्षानुवर्षे समस्या सहन करण्याचा विक्रम करीत असतात़

राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्याचे नाव केवळ विक्रमगड मात्र येथील नागरीक वर्षानुवर्षे समस्या सहन करण्याचा विक्रम करीत असतात़ तालुक्याचा विक्रम म्हणजे कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी अपुºया मनुष्य बळामुळे पोलिसांचीच दमछाक होते आहे.तालुक्यात पोलिस कार्यालय एक असून, त्याची रचना विचित्र आहे. कारण तालुक्यातील काही गावे विक्रमगड तालुक्यात येतात तर पोलिस कार्यालय मनोर, कासा, जव्हार अशा दुस-या तालुक्यात़ त्यातही विक्रमगडच्या पोलिस कार्यालयात तालुक्याच्या मानाने पोलिसांची संख्या अत्यंत कमी असून, ६० गावांच्या व १२० पाडयांच्या कार्यक्षेत्रासाठी अवघे ४० पोलीस आहेत. तर पोलिसांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करणाºया पोलिस पाटलांचीही अनेक गावातील पदेही रिक्त आहे.विक्रमगड तालुका हा आदिवासी बहुल असल्याने तसेच विक्रमगड पोलिस हद्दीतील ६० गावे १२० पाडयांस सुरक्षा पुरवितांना अपुºया पोलिसांमुळे कार्यरत असलेल्या पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडून त्यांची तारांबळ उडते आहे़ येथे पोलिस अधिकारी म्हणून विजय शिंदे यांची दुसºयांदा या पदी नियुक्ती करण्यात आली आहे़ मध्यतरी त्यांची बदली बोईसर येथे झाली होती़ तर एपीआय म्हणून विश्वास पाटील हे काम पाहत आहे़ या पोलिस ठाण्यात ४० पोलिस कर्मचारी, त्यामध्ये ८ महिलांचा कर्म-यांचा समावेश आहे़ या ४० कर्मचाºयांतच दोन अधिकाºयांचाही समावेश आहे. असे अपुरे संख्याबळ असल्याने ६० गावे व १२० पाडे व दिड लाखाच्या घरात लोकसंख्या असल्याने कायदा सुव्यवस्था राखायची कशी? असा प्रश्न पोलिसांना पडतो. त्यातच संघटनांची आंदोलने, राजकिय पक्षांचे मोर्चे याची भर पडत असते.तालुक्याच्या मानाने सद्यस्थितीच्या परिस्थितीनुसार ६० पोलिस कर्मचारी एक पोलिस निरीक्षक, एक ए़ पी़ आय़, चार पोलिस उपनिरीक्षक अशी पदे असणे आवश्यक आहे़ ब्रिटीश काळापासून विक्रमगड पोलिस कार्यालयात कर्मचारी व अधिकारी भरती केली नसल्याने सद्यस्थितीत विक्रमगड पोलिस कार्यालयात ६० गावांच्या व १२० पाडयांच्या सुरक्षेतेसाठी फक्त ४० कर्मचारी आहेत़ त्यामुळे पोलिसांना अतिरिक्त कामाचा ताण,बंदोबस्त, दिवस रात्रीची गस्त, वारंट बजावणे,कोर्टात जाणे, पेट्रोलिंग करणे, किरकोळ भांडणे सोडविणे अपघात या कामांच्या ताणामुळे व अपु-या पोलिस बळामुळे विक्रमगड व परिसरा आसपास असणा-या गाव खेडया पाडयांचा सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे़पोलिस पाटील हा गावकºयांसाठी भांडणे, तंटे स्थानिक पातळीवर मिटविणारा व पोलिसांना गाव-पाडयातील माहिती देणारा महत्वाचा दुआ आहे़ त्यामुळे प्रत्येक गावात-पाडयांसाठी स्वतंत्र पोलिस पाटलांची आवश्यकता आहे़विक्रमगड पोलिस कार्यक्षेत्रात तालुक्यातील ६० गावांचा समावेश असुन, त्यातील बहुसंख्य पदे रिक्तच आहे़ त्यामुळे एकेका पोलिस पाटलाला दोन-तीन गावांची जबाबदारी पार पाडावी लागते़>पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्डही उपेक्षितकायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असलेले व प्रत्येक कार्यक्रमांच्या वेळी व निवडणूक, नवरात्र, गणपती आदीसांठी होमगार्ड पोलिसांप्रमाणेच चोख सुरक्षेसाठी बंदोबस्तांत महत्वाची भूमिका बजावित असतांत परंतु ते ही आजही उपेक्षित आहेत़ या दलाच्या अनेक मागण्या प्रलंबित असुन, शासनदरबारी त्यांची नोंद घेतली जात नसल्याच्या त्यांच्याही तक्रारी आहेत़>विक्रमगडमधील वाहतूक नियंत्रणडहाणू-वाडा-मनोर या महामार्गावरुन विक्रमगडमधून मुख्य बाजारातून मोठया प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरु असून, त्यामुळे सकाळी व सायंकाळी या मार्गावरील गडदे येथील तांबाडी पूल व अन्य पूलावर वाहतुककोंडी होते आहे. हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे़ त्यामुळे बारीक सारिक अपघातांमध्ये वाढ होत आहे़>एक दिवसाच्या जनतादरबाराची गरजविक्रमगड पोलिस कार्यालयात वरिष्ठ अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली थेट जनतेशी व जनतेचा पोलिसांची संपर्क येवून घडलेल्या घडामोडींचा व वाद, विवाद कसे टाळावे तंटे गावातच कशा प्रकारे मिटवावेत यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी जनता दरबाराची आवश्यकता आहे़ गावपातळीवर तंटामुक्ती समित्या नेमण्यांत आलेल्या आहेत़ तक्रार निवारणासाठी शुक्रवार होता मात्र त्यात सातत्य नाही़