शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अमिता घोडा यांची माघार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:32 IST

आज निवडणूक : जि.प. उपाध्यक्षपदी निलेश सांबरे यांचे नाव निश्चित

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या (मंगळवारी) होत असून अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या अमिता घोडा यांनी माघार घेतल्याची माहिती पुढे येते आहे. यामुळे शिवसेनेच्या भारती कामडी किंवा वैदेही वाढाण यांचे पारडे जड झाले आहे. तर उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या निलेश सांबरे यांची निवड एकमताने झाली आहे.पालघर जिल्हा परिषदेत एकूण ५७ सदस्य असून शिवसेना १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, माकप ५, बविआ ४, अपक्ष ३ तर काँग्रेस १ असे संख्याबळ असून १८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना समोर आला आहे. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा २९ हा आकडा पार करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी (१४ जागेसह), काँग्रेस (१) आणि जिजाऊ संघटना (अपक्ष १) अशी साथ मिळाली आहे.

राज्यात सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी महाआघाडी सत्तेत असून राज्याचा कारभार सुरळीत चालवत असून आता पालघर जिल्हा परिषदेतही हीच महाआघाडी सत्ता स्थापन करेल, यात कुठलीही शंका उरलेली नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या अडीच वर्षाचे आरक्षण महिलांसाठी (अनुसूचित जमाती) राखीव असून सत्ता स्थापनेत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना पहिल्या अडीच वर्षांच्या अध्यक्षपदाचा दावा करणार आहे. राष्ट्रवादीनेही ते मान्य केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते.शिवसेनेकडून सेनेचे माजी आ. अमित घोडा यांची पत्नी अमिता घोडा, वैदेही वाढाण आणि भारती कामडी यांची नावे चर्चेत होती. परंतु, आता अमिता घोडा यांचे नाव मागे पडल्याची चर्चा असल्याने आता वैदेही वाढाण आणि भारती कामडी यांच्यापैकी एकाची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या १४ सदस्यांपैकी विक्रमगडमधील ३, जव्हारमधील १, वाड्यातील ४ जागा निवडून आणण्यात यशस्वी झालेले आणि स्वत:ही अपक्ष म्हणून निवडून आलेले जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे यांची उपाध्यक्षपदासाठी एकमताने निवड झाल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. एकूण चार सभापती पदे असून दोन्ही पक्षात त्याचे समसमान वाटप केले जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीत बविआची साथ असली तरी जिल्ह्यात सेना आणि बविआमधून विस्तवही जात नाही. त्यामुळे इथे कुठल्याही परिस्थितीत बविआला सत्तेत घेऊ नये, अशी मागणी होत आहे.सेना-राष्ट्रवादीचे बहुमतच्नुकत्याच झालेल्या पंचायत समितीचे सभापती-उपसभापती पद निवडताना शिवसेनेने बविआपेक्षा भाजपला जवळ करून जव्हार आणि वसई येथे सत्ता स्थापन केली. मात्र जिल्हा परिषदेत सेना आणि राष्ट्रवादी या दोघांच्या सदस्यांची बेरीज बहुमताचा आकडा पार करीत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर