शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अमिता घोडा यांची माघार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:32 IST

आज निवडणूक : जि.प. उपाध्यक्षपदी निलेश सांबरे यांचे नाव निश्चित

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या (मंगळवारी) होत असून अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या अमिता घोडा यांनी माघार घेतल्याची माहिती पुढे येते आहे. यामुळे शिवसेनेच्या भारती कामडी किंवा वैदेही वाढाण यांचे पारडे जड झाले आहे. तर उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या निलेश सांबरे यांची निवड एकमताने झाली आहे.पालघर जिल्हा परिषदेत एकूण ५७ सदस्य असून शिवसेना १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, माकप ५, बविआ ४, अपक्ष ३ तर काँग्रेस १ असे संख्याबळ असून १८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना समोर आला आहे. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा २९ हा आकडा पार करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी (१४ जागेसह), काँग्रेस (१) आणि जिजाऊ संघटना (अपक्ष १) अशी साथ मिळाली आहे.

राज्यात सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी महाआघाडी सत्तेत असून राज्याचा कारभार सुरळीत चालवत असून आता पालघर जिल्हा परिषदेतही हीच महाआघाडी सत्ता स्थापन करेल, यात कुठलीही शंका उरलेली नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या अडीच वर्षाचे आरक्षण महिलांसाठी (अनुसूचित जमाती) राखीव असून सत्ता स्थापनेत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना पहिल्या अडीच वर्षांच्या अध्यक्षपदाचा दावा करणार आहे. राष्ट्रवादीनेही ते मान्य केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते.शिवसेनेकडून सेनेचे माजी आ. अमित घोडा यांची पत्नी अमिता घोडा, वैदेही वाढाण आणि भारती कामडी यांची नावे चर्चेत होती. परंतु, आता अमिता घोडा यांचे नाव मागे पडल्याची चर्चा असल्याने आता वैदेही वाढाण आणि भारती कामडी यांच्यापैकी एकाची निवड करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या १४ सदस्यांपैकी विक्रमगडमधील ३, जव्हारमधील १, वाड्यातील ४ जागा निवडून आणण्यात यशस्वी झालेले आणि स्वत:ही अपक्ष म्हणून निवडून आलेले जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे यांची उपाध्यक्षपदासाठी एकमताने निवड झाल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. एकूण चार सभापती पदे असून दोन्ही पक्षात त्याचे समसमान वाटप केले जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीत बविआची साथ असली तरी जिल्ह्यात सेना आणि बविआमधून विस्तवही जात नाही. त्यामुळे इथे कुठल्याही परिस्थितीत बविआला सत्तेत घेऊ नये, अशी मागणी होत आहे.सेना-राष्ट्रवादीचे बहुमतच्नुकत्याच झालेल्या पंचायत समितीचे सभापती-उपसभापती पद निवडताना शिवसेनेने बविआपेक्षा भाजपला जवळ करून जव्हार आणि वसई येथे सत्ता स्थापन केली. मात्र जिल्हा परिषदेत सेना आणि राष्ट्रवादी या दोघांच्या सदस्यांची बेरीज बहुमताचा आकडा पार करीत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर