शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

युती-आघाडीचा फैसला ३० डिसेंबरलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:56 IST

अर्ज छाननी : जिल्हा परिषदेसाठी ३६१ तर पं. स.साठी ६५३ नामनिर्देशनपत्र वैध

पालघर/डहाणू : पालघर जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली असून मंगळवारी झालेल्या छाननीनंतर वैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पालघरच्या ८८ नामनिर्देशन पत्रापैकी ८७ वैध झाली आहेत. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण कुणासमोर लढणार, तसेच युती आणि आघाडीचे समीकरण समजणार आहे.

डहाणू जिल्हा परिषदेसाठी ७० आणि पंचायत समितीसाठी ११३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी आॅनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र भरण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. त्यात जिल्हा परिषदेच्या १३ गटांसाठी ७१, तर पंचायत समितीच्या २६ गणांसाठी ११५ नामनिर्देशन पत्र भरण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सौरभ कटियार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग यांनी दिली. नामनिर्देशन पत्राची छाननी मंगळवारी करण्यात आली. त्यात जि.प. गटातील एक, तर पंचायत समितीच्या गणातील दोन नामनिर्देशन पत्र बाद ठरविण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात ७०, तर पंचायत समितीच्या रिंगणात ११३ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.जव्हारमध्ये जि.प.चे २० तर पं.स.चे ४१ उमेदवारी अर्ज ठरले वैधजव्हार : जव्हार तालुक्यातील जि.प. पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठीचे २० उमेदवारी अर्ज वैध ठरले असून पंचायत समितीच्या ८ जागांसाठी ४१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये अनेक अपक्ष आणि वाटाघाटीच्या हिशोबाने भरलेले उमेदवारी अर्ज दाखल असल्याने अर्ज माघारीच्या दिवशीच या उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जव्हारमध्ये तूर्तास तरी महाआघाडीच्या सूत्रानुसार राष्ट्रवादी बविआ आणि काँग्रेसचे जागा वाटप झालेले असून भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असल्याचे चित्र आहे. जव्हारमध्ये झेडपीच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ जांगासाठी ही निवडणूक होत आहे. वावर गणातील पंचायत समितीकरिता वय कमी असल्यामुळे बाद करण्यात आला तर न्याहाळे येथील जात पडताळणी नसल्यामुळे २ अर्ज बाद करण्यात आले.वाडा पं.स.तील एक अर्ज बादवाडा : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मंगळवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. या वेळी मोज गणातून लोकेश रामचंद्र पाटील यांनी सूचकाचे नाव दुसऱ्या गणातील व्यक्तीचे टाकल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे आता १३१ उमेदवारी अर्ज वैध राहिले. अर्ज मागे घेण्याची तारीख ३० डिसेंबर आहे.तलासरीतही चार अर्ज अवैधतलासरी : तलासरीत जिल्हा परिषद गटाच्या पाच आणि पंचायत समितीच्या १० गणांच्या जागांसाठी एकूण ८७ उमेदवारी अर्जदाखल झाले आहेत. त्या अर्जाची छाननी मंगळवारी तहसील कार्यालयात होऊन जि. प. गटातील ३० अर्जापैकी उधवा गटातील १ अर्ज बाद झाला, तर पंचायत समिती गणांच्या ५७ अर्जांपैकी झरी, डोंगारी, उधवा या तीन गणांतील प्रत्येकी एक अर्ज असे तीन अर्ज बाद झाले आहेत.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार