शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:57 IST

वसई तालुक्यात गेल्या २५ वर्षांपासून निर्विवाद सत्ता असलेली बहुजन विकास आघाडी असो की सर्वच राजकीय पक्ष असो प्रत्येकाने कुठेना कुठे नाल्यावर, रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी करून पक्षाची कार्यालये थाटली आहे.

नालासोपारा : वसई तालुक्यात गेल्या २५ वर्षांपासून निर्विवाद सत्ता असलेली बहुजन विकास आघाडी असो की सर्वच राजकीय पक्ष असो प्रत्येकाने कुठेना कुठे नाल्यावर, रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी करून पक्षाची कार्यालये थाटली आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनपा किंवा कोणत्याही सामाजिक संघटनेने पुढाकार न घेता आजपर्यंत ते काणाडोळा करतच आले आहे. आता अशा अनधिकृत पक्षांच्या कार्यालयांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. वसई विरार मनपाचे आयुक्त बळीराम पवार त्यांच्यावर कारवाई कधी करणार याकडे सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.वसई तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सरकारी जागा, गार्डन, शाळा, हॉस्पिटल याव्यतिरिक्त आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामे वसई विरार मनपाने भुईसपाट केली आहेत. कित्येक गरीब लोकांना व जनतेला सणांच्या वेळी, उन्हाळ्यात, पावसाळ्यात बेघर केले आहे पण या राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करण्याची साधी हिंमत दाखवली नसल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या अशा राजकीय पक्षांच्या कार्यालयाला तर मनपाने साधी नोटीस सुद्धा धाडली असल्याचे आठवत नाही. मनपात सत्ताधारी पक्षातले नगरसेवक, दुसऱ्या पक्षातील नगरसेवक, विविध पक्षातील नेतेमंडळी बिनधास्त नाले व मोकळ्या जागेवर आपली अनधिकृत कार्यालये उभी करून आपले बस्तान मांडताना दिसत आहे पण मनपा मूग गिळून, गप्प बसून कारवाई का करत नाही हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.मनपा अनधिकृत बांधकामावर कारवाई करतांना रीतसर नोटीस पाठवून पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई करते मग आजपर्यंत मनपाने किती राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यलयांची दखल घेऊन त्यापैकी कितींना नोटीसा पाठवल्यात? राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करण्यासाठी मनपावर काही दबाव तर येत नाही ना?महापालिकेची राजकीय पक्षांवर मेहरनजरवसई तालुक्यात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी व लोकांच्या मदतीसाठी धावून जाणाº्या पोलिसाची मात्र मनपाकडून उपेक्षाच झाली आहे. पोलीस स्टेशनला जागा देण्यासाठी मनपा कायद्यावर बोट ठेवत आहे पण राजकीय पक्ष गटारावर आणि रस्त्यावरील मोकळ्या जागेवर बिनधास्त कब्जा करून तिथे अनधिकृत कार्यालये बांधत आहे.पोलीस स्टेशनला जागा द्यायची म्हटले की सिडकोने डीपी प्लॅन मध्ये कुठेही तशी जागा ठेवली नसून २०२१ सालापर्यंत वाट पाहण्यास सांगत आहे. तुळींज पोलीस स्टेशन गटारावर आहे म्हणून मागे औपचारिकतेचे कारण देऊन नोटीस पाठवली मग अशा राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयाला किती नोटीसा पाठवल्यात?

टॅग्स :Vasai Virarवसई विरार