शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टीवाढीविरोधात सर्वपक्षीय एकजूट, मंगळवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 02:40 IST

वसई विरार महापालिकेने ग्रामीण भागात आकारलेल्या वाढीव घरपट्टीविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट होऊ लागली असून वाढीव घरपट्टी न भरण्याचे आवाहन गावकºयांना करण्यात आले आहे. मंगळवारी सर्वपक्षीय बैठक होत असून त्यात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.

वसई : वसई विरार महापालिकेने ग्रामीण भागात आकारलेल्या वाढीव घरपट्टीविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट होऊ लागली असून वाढीव घरपट्टी न भरण्याचे आवाहन गावकºयांना करण्यात आले आहे. मंगळवारी सर्वपक्षीय बैठक होत असून त्यात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.महापालिकेने शहराप्रमाणेच ग्रामीण भागात घरपट्टी आकारण्याचे ठरवले असून त्याचे पहिले पाऊल म्हणून यंदापासून घरपट्टीत ४० टक्के वाढ करण्यात आली आहे. मात्र, या वाढीमुळे गावकºयांना दुप्पट घरपट्टी आकारली गेल्याची बिले महापालिकेकडून पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे गावकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.वाढीव घरपट्टीला जनआंदोलन समितीने विरोध करून गावागावात बैठका घेऊन जनजागरण सुरु केले आहे. हा विरोध तीव्र व्हावा यासाठी समितीने सर्वपक्षीयांना एकत्र आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता जनआंदोलनसोबत काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि आरपीआयचे नेते आले आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेश सचिव दत्ता नर, जिल्हाध्यक्ष डॉमणिक डिमेलो, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील, भाजपाचे वसई विधानसभा संघटक शाम पाटकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे उपस्थित होते.येत्या मंगळवारी निर्मळ येथे दुसरी सर्वपक्षीय बैठक होत असून तिला शिवसेनेचे पदाधिकारी हजर राहणार आहेत. यावेळी वाढीव घरपट्टीविरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. त्यात प्रशासन, पदाधिकारी आणि नगरसेवकांशी सुसंवाद साधण्यासह आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात घरपट्टी न भरण्याचे आवाहन गावकºयांना करण्यात आले आहे, अशी माहिती जनआंदोलन समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी दिली.दरम्यान, सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने घरपट्टीत प्रचंड वाढ झाल्याचे मान्य करीत ती मागे घेण्यात यावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र, प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांच्याकडून दरवाढ मागे घेण्याची कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.उलट घरपट्टी वसुलीसाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु ठेवले आहे. पण, गावातील वातावरण पाहता कोणताही संघर्ष होऊ नये यासाठी प्रशासनाने नोटीसा न बजावता जेवढी वसुली करता येईल, तेवढी करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. असे असले तरी दरवाढ मागे घेतली गेली नाहीतर वसईत संघर्ष होणार हे निश्चित मानले जात आहे. मंगळवारी सर्वपक्षीय बैठक होत असून त्यात आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार