शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘नोटा’ची सर्वच पक्षांच्या उमेदवारांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:14 IST

पोटनिवडणुकीत टक्का १६ हजारांवर; राजकीय पक्षांवर अंतर्मुख होण्याची वेळ

बोईसर : लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या २०१४ व २०१८ च्या पोटनिवडणुकी बरोबरच २०१४ साली पालघर लोकसभेच्या क्षेत्रातील सहाही विधानसभा निवडणुकीमध्ये वरील पैकी कोणीही नाही नोटा (नन आॅफ द अबॉव्ह) या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याने सर्वच राजकीय पक्ष व संघटना तसेच अपक्ष निवडणूक लढवीणाऱ्या उमेदवारांनी त्याची धास्ती घेतली आहेलोकसभेच्या मे २०१४ साली घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये सुमारे ९ लाख ९२ हजार ७७० मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये २१ हजार ९७७ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला तर मे २०१८ च्या पोटनिवडणुकीमध्ये ८ लाख ८६ हजार ८७३ मतदारांनी मतदान केले त्यापैकी १६ हजार ८८४ मतदारांनी नोटा पर्यायचा वापर केला होता तर २०१४ साठी विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये बोईसर विधानसभा मतदारसंघात ३१२६ (१.८ टक्के) , नालासोपारा १८९८ (०.८४टक्के), विक्रमगड : ४१८८ (२.५टक्के), पालघर : २९८७ (१.८२टक्के) ,वसई : २९९४ (१.५५ ट्क्के) , डहाणू : ४४९८ (२.९० टक्के)असे एकूण १९ हजार ६९१ मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर केला होता.२८ मे २०१८ च्या पोटनिवडणुकीमध्ये ५१.२८ टक्के मतदान झाले होते. त्या अत्यंत अतितटीच्या व प्रतिष्ठेच्या आणि राज्य व देशपातळीवरील राजकीय पक्षांच्या नजरा लागलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला होता. त्याच निवडणूकी मध्ये १६ हजार ८८४ नोटा पर्यायाची होती म्हणजेच विजयी (मताधिक्यची) मतांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त मत नोटा पर्यायाची होती जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार निवडणूक रिंगणातील उमेदवारांना नाकारत असतील तर ही खुप गंभीर बाब आहे.लोकशाहीत सर्वसामान्य मतदारांना मतदान रु पी एक मोठी शक्ती दिली आहे. पाच वर्षांनी होणारी निवडणूक ही डोळसपणे विचार करायला लावणारी असते आपला लोकप्रतिनिधी कसा असावा त्याच्याकडून आपल्या अपेक्षांची पूर्तता होते का होत नसेल तर त्याला आपण पर्याय निर्माण करायला हवा नवीन व लायक माणसाला संधी द्यायला हवी लोकशाही अधिक प्रकल्प कशी होईल याचा विचार होणे आवश्यक आहे.भारतीय लोकशाही जगात अधिक प्रगल्भ व मजबूत आहे लोकशाहीत लोकप्रतिनिधि पर्यायाने सरकार मतदाना द्वारे निवडून दिले जाते त्या मुळे मतदान ही खरी ताकद आहे म्हणून निवडणूक कोणतीही असो मतदारांनी आपला हक्क आणि कर्तव्य प्रामाणिकपणे जपायला हवीत

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर