शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

‘नोटा’ची सर्वच पक्षांच्या उमेदवारांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:14 IST

पोटनिवडणुकीत टक्का १६ हजारांवर; राजकीय पक्षांवर अंतर्मुख होण्याची वेळ

बोईसर : लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या २०१४ व २०१८ च्या पोटनिवडणुकी बरोबरच २०१४ साली पालघर लोकसभेच्या क्षेत्रातील सहाही विधानसभा निवडणुकीमध्ये वरील पैकी कोणीही नाही नोटा (नन आॅफ द अबॉव्ह) या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याने सर्वच राजकीय पक्ष व संघटना तसेच अपक्ष निवडणूक लढवीणाऱ्या उमेदवारांनी त्याची धास्ती घेतली आहेलोकसभेच्या मे २०१४ साली घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये सुमारे ९ लाख ९२ हजार ७७० मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये २१ हजार ९७७ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला तर मे २०१८ च्या पोटनिवडणुकीमध्ये ८ लाख ८६ हजार ८७३ मतदारांनी मतदान केले त्यापैकी १६ हजार ८८४ मतदारांनी नोटा पर्यायचा वापर केला होता तर २०१४ साठी विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये बोईसर विधानसभा मतदारसंघात ३१२६ (१.८ टक्के) , नालासोपारा १८९८ (०.८४टक्के), विक्रमगड : ४१८८ (२.५टक्के), पालघर : २९८७ (१.८२टक्के) ,वसई : २९९४ (१.५५ ट्क्के) , डहाणू : ४४९८ (२.९० टक्के)असे एकूण १९ हजार ६९१ मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर केला होता.२८ मे २०१८ च्या पोटनिवडणुकीमध्ये ५१.२८ टक्के मतदान झाले होते. त्या अत्यंत अतितटीच्या व प्रतिष्ठेच्या आणि राज्य व देशपातळीवरील राजकीय पक्षांच्या नजरा लागलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला होता. त्याच निवडणूकी मध्ये १६ हजार ८८४ नोटा पर्यायाची होती म्हणजेच विजयी (मताधिक्यची) मतांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त मत नोटा पर्यायाची होती जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार निवडणूक रिंगणातील उमेदवारांना नाकारत असतील तर ही खुप गंभीर बाब आहे.लोकशाहीत सर्वसामान्य मतदारांना मतदान रु पी एक मोठी शक्ती दिली आहे. पाच वर्षांनी होणारी निवडणूक ही डोळसपणे विचार करायला लावणारी असते आपला लोकप्रतिनिधी कसा असावा त्याच्याकडून आपल्या अपेक्षांची पूर्तता होते का होत नसेल तर त्याला आपण पर्याय निर्माण करायला हवा नवीन व लायक माणसाला संधी द्यायला हवी लोकशाही अधिक प्रकल्प कशी होईल याचा विचार होणे आवश्यक आहे.भारतीय लोकशाही जगात अधिक प्रगल्भ व मजबूत आहे लोकशाहीत लोकप्रतिनिधि पर्यायाने सरकार मतदाना द्वारे निवडून दिले जाते त्या मुळे मतदान ही खरी ताकद आहे म्हणून निवडणूक कोणतीही असो मतदारांनी आपला हक्क आणि कर्तव्य प्रामाणिकपणे जपायला हवीत

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर