शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

‘नोटा’ची सर्वच पक्षांच्या उमेदवारांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:14 IST

पोटनिवडणुकीत टक्का १६ हजारांवर; राजकीय पक्षांवर अंतर्मुख होण्याची वेळ

बोईसर : लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या २०१४ व २०१८ च्या पोटनिवडणुकी बरोबरच २०१४ साली पालघर लोकसभेच्या क्षेत्रातील सहाही विधानसभा निवडणुकीमध्ये वरील पैकी कोणीही नाही नोटा (नन आॅफ द अबॉव्ह) या पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याने सर्वच राजकीय पक्ष व संघटना तसेच अपक्ष निवडणूक लढवीणाऱ्या उमेदवारांनी त्याची धास्ती घेतली आहेलोकसभेच्या मे २०१४ साली घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये सुमारे ९ लाख ९२ हजार ७७० मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये २१ हजार ९७७ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला तर मे २०१८ च्या पोटनिवडणुकीमध्ये ८ लाख ८६ हजार ८७३ मतदारांनी मतदान केले त्यापैकी १६ हजार ८८४ मतदारांनी नोटा पर्यायचा वापर केला होता तर २०१४ साठी विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये बोईसर विधानसभा मतदारसंघात ३१२६ (१.८ टक्के) , नालासोपारा १८९८ (०.८४टक्के), विक्रमगड : ४१८८ (२.५टक्के), पालघर : २९८७ (१.८२टक्के) ,वसई : २९९४ (१.५५ ट्क्के) , डहाणू : ४४९८ (२.९० टक्के)असे एकूण १९ हजार ६९१ मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर केला होता.२८ मे २०१८ च्या पोटनिवडणुकीमध्ये ५१.२८ टक्के मतदान झाले होते. त्या अत्यंत अतितटीच्या व प्रतिष्ठेच्या आणि राज्य व देशपातळीवरील राजकीय पक्षांच्या नजरा लागलेल्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला होता. त्याच निवडणूकी मध्ये १६ हजार ८८४ नोटा पर्यायाची होती म्हणजेच विजयी (मताधिक्यची) मतांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त मत नोटा पर्यायाची होती जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार निवडणूक रिंगणातील उमेदवारांना नाकारत असतील तर ही खुप गंभीर बाब आहे.लोकशाहीत सर्वसामान्य मतदारांना मतदान रु पी एक मोठी शक्ती दिली आहे. पाच वर्षांनी होणारी निवडणूक ही डोळसपणे विचार करायला लावणारी असते आपला लोकप्रतिनिधी कसा असावा त्याच्याकडून आपल्या अपेक्षांची पूर्तता होते का होत नसेल तर त्याला आपण पर्याय निर्माण करायला हवा नवीन व लायक माणसाला संधी द्यायला हवी लोकशाही अधिक प्रकल्प कशी होईल याचा विचार होणे आवश्यक आहे.भारतीय लोकशाही जगात अधिक प्रगल्भ व मजबूत आहे लोकशाहीत लोकप्रतिनिधि पर्यायाने सरकार मतदाना द्वारे निवडून दिले जाते त्या मुळे मतदान ही खरी ताकद आहे म्हणून निवडणूक कोणतीही असो मतदारांनी आपला हक्क आणि कर्तव्य प्रामाणिकपणे जपायला हवीत

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर