शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

गॅसचा टँकर नदीत कोसळून वायुगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:34 IST

रायते पुलावरील घटना : चालक जखमी; वायुगळती थांबवण्यात आले यश

टिटवाळा / म्हारळ : कल्याण-मुरबाड महामार्गावरील रायते पुलावरून एलपीजीने भरलेला टँकर बुधवारी मध्यरात्री उल्हास नदीत कोसळून वायुगळती झाली. पहाटे ही वायुगळती थांबवण्यात यश आले. अपघातात टँकरचालक जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईतील चेंबूरहून मुरबाडकडे हा एलपीजी गॅसचा टॅँकर जात होता. रायते पुलाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे लोखंडी रेलिंग तोडून हा टॅँकर ४० फूट खाली नदीत कोसळला. याबाबत टिटवाळा येथील युवक तुषार गिरीराज याने तत्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुरबाड पोलीस उपविभागीय अधिकारी गायकवाड, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आहिरराव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात चालक तेरसू यादव हा जखमी झाला आहे. त्याला प्रथम गोवेली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उल्हास नगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, टॅँकरमधील एलपीजीची पाण्यात गळती झाल्याने पोलिसांनी हा रस्ता बंद केला. तसेच तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर, अग्निशमन दल आणि गॅस कंपनीच्या वायू नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमोद कोलते यांच्यासह आर. मायकल आणि रितेश कुमार यांनी नदीत उतरून वायुगळती तात्पुरती बंद केली. हा टॅँकर नदीत कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे अहिरराव यांनी सांगितले. दरम्यान, एलपीजी गॅस पाण्यावर तरंगत असल्याने टिटवाळा पोलिसांनी हा परिसर बंद केला. टँकरमध्ये ३६ हजार लीटर एलपीजी गॅस आहे. हा गॅस दुसऱ्या टॅँकरमध्ये साठवण्यात येणार आहे, असे वायुगळती नियंत्रण पथकाच्या आर. मायकल यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस पथक तैनात असून गॅसमुळे कुणाला त्रास होत आहे का, याचीही माहिती घेण्यात येत आहे.गॅस टॅँकर नदीत कोसळल्याची माहिती मिळताच मध्यरात्री २ वाजता त्वरित घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच वायुगळतीवर नियंत्रण आणले. - प्रमोद कोलते,अग्निशमन अधिकारी, कल्याण