शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

वायू वादळाने डहाणूत चिकूची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:27 IST

५५० मॅट्रिक टन उत्पादनावर परिणाम; बागायतदारांची भरपाईची मागणी

बोर्डी : वायू चक्रीवादळादरम्यान सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने चिकू फळांची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन बागायतीत फळांचा खच पडला आहे. या फळाचे तालुक्यातील क्षेत्र साडेपाचहजार हेक्टर असून सुमारे साडेपाच मॅट्रिक टन फळांचे नुकसान झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. दरम्यान शासनाने तत्काळ भरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.अरबी समुद्रात मागील आठवड्यात वायू चक्र ीवादळ निर्माण झाले होते. ते खोल समुद्रातून मुंबई, पालघर आणि गुजरातच्या दिशेने पुढे सरकत गेले. या काळात वादळी वारे वाहून जिल्ह्यात जीवित आणि वित्तहानी झाल्याची नोंद झाली नसली, तरी जोराच्या वाºयामुळे बागायतीतील छोट्या चिकू फळांची मोठ्या प्रमाणात गळती होऊन बागायतदारांना नुकसान सोसावे लागले आहे. डहाणू तालुक्यातील हे प्रमुख फळपीक असून त्याचे नोंदणीकृत क्षेत्र साडेपाचहजार हेक्टर तर नोंदणी न झालेले क्षेत्रही मोठे आहे. एकूण जिल्ह्याचा विचार करता त्यामध्ये मोठी वाढ होईल. दरम्यान वाºयामुळे एका झाडाखाली किमान पाच किलो फळगळती झाली आहे. ही फळे पक्व झाली असती, तर त्यांचे वजन दुपटीने वाढले असते. त्यानुसार एका एकरात ४० झाडे या प्रमाणे ४०० किलो फळांचे नुकसान झाले आहे. तर एका हेक्टरात १०० झाडांप्रमाणे १ टन फळांचे नुकसान झाले आहे. एकूण साडेपाचहजार हेक्टराचा विचार केला असता, ५५ हजार झाडांचा समावेश असून ५५० मॅट्रिक टन उत्पादन वाया गेले आहे. शिवाय सातबाºयावर नोंदणी न झालेल्या झाडांचे प्रमाणही मोठे असल्याने हा आकडा वाढणार आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान झालेल्या बागायतदारांचे प्रमाण मोठे आहे.तर ही झळ चिकू फळतोडणी करणाºया आदिवासी मजुरांनाही बसणार असून त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे. तालुक्यात रोजगाराअभावी स्थलांतराचा प्रश्नही ऐरणीवर आहे. काही कुटुंबात कुपोषित बालकांचे प्रमाणही दिसून येते. त्यामुळे तालुक्याला रोजगार देणाºया या चिकू फळांचे झालेले नुकसान पाहता, तत्काळ शासनाने नुकसान भरपाई घोषित करण्याची मागणी बागायतदारांनी केली आहे.वायू चक्र ीवादळामुळे चिकू बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर फलगळती झाली आहे. त्याचा फटका आगामी उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. याकरिता शासनाने तत्काळ मदत जाहीर करणे आवश्यक आहे.- देवेंद्र राऊत, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त बागायतदार