शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वायू वादळाने डहाणूत चिकूची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:27 IST

५५० मॅट्रिक टन उत्पादनावर परिणाम; बागायतदारांची भरपाईची मागणी

बोर्डी : वायू चक्रीवादळादरम्यान सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने चिकू फळांची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन बागायतीत फळांचा खच पडला आहे. या फळाचे तालुक्यातील क्षेत्र साडेपाचहजार हेक्टर असून सुमारे साडेपाच मॅट्रिक टन फळांचे नुकसान झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. दरम्यान शासनाने तत्काळ भरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.अरबी समुद्रात मागील आठवड्यात वायू चक्र ीवादळ निर्माण झाले होते. ते खोल समुद्रातून मुंबई, पालघर आणि गुजरातच्या दिशेने पुढे सरकत गेले. या काळात वादळी वारे वाहून जिल्ह्यात जीवित आणि वित्तहानी झाल्याची नोंद झाली नसली, तरी जोराच्या वाºयामुळे बागायतीतील छोट्या चिकू फळांची मोठ्या प्रमाणात गळती होऊन बागायतदारांना नुकसान सोसावे लागले आहे. डहाणू तालुक्यातील हे प्रमुख फळपीक असून त्याचे नोंदणीकृत क्षेत्र साडेपाचहजार हेक्टर तर नोंदणी न झालेले क्षेत्रही मोठे आहे. एकूण जिल्ह्याचा विचार करता त्यामध्ये मोठी वाढ होईल. दरम्यान वाºयामुळे एका झाडाखाली किमान पाच किलो फळगळती झाली आहे. ही फळे पक्व झाली असती, तर त्यांचे वजन दुपटीने वाढले असते. त्यानुसार एका एकरात ४० झाडे या प्रमाणे ४०० किलो फळांचे नुकसान झाले आहे. तर एका हेक्टरात १०० झाडांप्रमाणे १ टन फळांचे नुकसान झाले आहे. एकूण साडेपाचहजार हेक्टराचा विचार केला असता, ५५ हजार झाडांचा समावेश असून ५५० मॅट्रिक टन उत्पादन वाया गेले आहे. शिवाय सातबाºयावर नोंदणी न झालेल्या झाडांचे प्रमाणही मोठे असल्याने हा आकडा वाढणार आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान झालेल्या बागायतदारांचे प्रमाण मोठे आहे.तर ही झळ चिकू फळतोडणी करणाºया आदिवासी मजुरांनाही बसणार असून त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागणार आहे. तालुक्यात रोजगाराअभावी स्थलांतराचा प्रश्नही ऐरणीवर आहे. काही कुटुंबात कुपोषित बालकांचे प्रमाणही दिसून येते. त्यामुळे तालुक्याला रोजगार देणाºया या चिकू फळांचे झालेले नुकसान पाहता, तत्काळ शासनाने नुकसान भरपाई घोषित करण्याची मागणी बागायतदारांनी केली आहे.वायू चक्र ीवादळामुळे चिकू बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर फलगळती झाली आहे. त्याचा फटका आगामी उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. याकरिता शासनाने तत्काळ मदत जाहीर करणे आवश्यक आहे.- देवेंद्र राऊत, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त बागायतदार