शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सेवक परीक्षा प्रकरण उच्च न्यायालात

By admin | Updated: September 9, 2016 02:31 IST

राज्याचा कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत एक परीक्षार्थी ठाणे आणि औरंगाबाद

हितेन नाईक, पालघरराज्याचा कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत एक परीक्षार्थी ठाणे आणि औरंगाबाद या दोन वेगवेगळ्या केंद्रात एकाच दिवशी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्याची घटना समोर आली आहे. या नोकर भरतीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करून या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी हर्षला पाटील या परीक्षार्थीनी केली आहे. लवकरच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आणि एकच वेळी झालेल्या कृषी सेवक भर्तीचा निकाल सहा कृषी विभागाच्या वेबसाइटवर नुकताच जाहिर करण्यात आला होता. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सर्व विभागात एकाच दिवशी व एकाच वेळेत परीक्षा घेण्यात आली असताना ठाणे व औरंगाबाद या दोन विभागात कृषीसेवक पदासाठी निवड झालेल्या विशाल उखा पाटील या उमेदवाराचे नाव दोन्ही केंद्रावर आल्याचे दिसून आले आहे.काही जिल्ह्यात परीक्षे दरम्यान मायक्रो हेडफोन लाऊन गैरप्रकार केले जात आसल्याचे निदर्शनास झाले आहे. त्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही लावून परीक्षा व्हायला हवी असे परीक्षार्थींनी बोलताना सांगितले.प्रश्न पत्रिका बनविताना ही सीसीटीव्हीङ्क कैमेऱ्याच्या देखरेखीखाली व्हायला हवी. परीक्षा झाल्यानंतर लगेच दोन ते तीन दिवसांच्या आत सर्व उमेदवारांचे गुण जाहिर करण्यात यावेत आदी मागण्या या परीक्षार्थिनी केल्या असुन ही परीक्षा रद्द करून नव्याने व पारदर्शक पध्दतीने घेण्यात यावी अशी मागणी होत आहे.या परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही परीक्षा पारदर्शक पणे राबवली गेली नसल्याचा आरोप ही काही परीक्षार्थिनी केला आहे. तर काही भागात प्रश्न पत्रिका फुटल्याची चर्चा असूंन एका पदा साठी १४ लाख रुपयाची मागणी काही दलाला मार्फत करण्यात आल्याचीही चर्चा सध्या परीक्षा दिलेल्या उमेदवारात रंगली आहे.कोकणाबाहेरील प्रश्न का?कृषीसेवक हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा व्यक्ती असतो. मग प्रत्येक विभागानुसार त्या त्या विभागात पिकणाऱ्या पिकांबाबत प्रश्न विचारले जाणे अत्यावश्यक व गरजेचे असताना मात्र कोकण विभागातील प्रश्नपत्रिकेत कोकणा बाहेरील पिकांचे प्रश्न कशासाठी देण्यात आले होते असा मुद्दा परिक्षार्थ्यांनी उपस्थित केला आहे.महाराष्ट्रात एकाच दिवसात एकाच वेळेस परीक्षा झाली आसताना एक उमेदवार दोन्ही विभागात कसा मेरिटला येऊ शकतो म्हणजे जे निवड झालेत त्यांच्या मागे खुप मोठ अर्थ कारण लपल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नोकर भरती प्रक्रि या रद्द करून ती पारदर्शक पणे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अनेक जिल्ह्यात भरती प्रक्रि या दरम्यान अनेक गैरप्रकार झल्याचे उघडकीस आले आहेत...