शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मरणानंतरही भोगाव्या लागतात यातना; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 22:41 IST

पेल्हार येथील स्मशानभूमीची दुरवस्था

- मंगेश कराळे नालासोपारा : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मृतदेहांना यातना भोगाव्या लागत असून अंत्यविधीसाठी येणारे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच रहिवाशांना येथे अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते आहे. पेल्हार गावातील वनोठा पाडा येथील स्मशानभूमी शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसते आहे. स्मशानभूमीच्या भिंती तुटलेल्या, बसण्यासाठी जागा नाही, पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब, शेजारी असलेले घाणेरडे पाणी, दिवाबत्तीची सोयही नाही, स्मशानभूमीत कोणीही सरकारी कर्मचारी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना स्वत: लाकडे रचावी लागतात, अशा अनेक समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहेत. स्मशानभूमीच्या भिंतीच्या प्लास्टरमधील गंजलेल्या लोखंडी सळ्या, खाली पडत असलेले प्लास्टर आणि धोकादायक अवस्थेतील भिंतीमुळे एखादी जीवघेणी दुर्घटनाही येथे घडू शकते.या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गडग्याचा पाडा, इंदिरा वसाहत, वाकणपाडा, पेल्हार, वनोठा पाडा, वसई फाटा, अवधूत आश्रम, डोंगरीपाडा या भागातील नागरिक येतात. वॉर्ड नंबर १ आणि वॉर्ड नंबर ४३ या दोन्ही वॉर्डच्या सीमेवर ही स्मशानभूमी असल्याने दोन्ही नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. परिसरात अंदाजे १० ते ११ हजार मतदार असून त्यांना सुविधा मिळत नसल्याने स्मशानभूमीची डागडुजी केली नाही तर आगामी मनपा निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. मंगळवारी किंवा बुधवारी गावकरी आणि साई गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते चंदनसार मनपा कार्यालयात जाऊन याबाबत विचारणा करून सहा. आयुक्तांना निवेदन देणार आहेत. या स्मशानभूमीची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी देणार आहे. तरीही यात सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा पवित्रा घेणार आहे.धोकादायक छताखाली अंत्यसंस्कार...महानगरपालिकेअंतर्गत स्मशानभूमीची अवस्था इतकी खराब आणि धोकादायक झाली आहे की अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना इतकी भीती वाटते.त्याचबरोबर संरक्षक भिंतीना मोठ्या भेगा पडल्या असून आसन व्यवस्था असलेली भिंत कोसळलेली आहे. बाथरूमचे तिन्ही दरवाजे गायब असून त्याच्याही भिंतीना तडे गेले आहेत. वीजेचा खांबही वाकलेला आहे.मेल्यानंतरही लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. अनेक वर्षांपासून हा त्रास असून दोन्ही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. मनपाचा कोणीही कर्मचारी येथे हजर नसतो.- राजू दास (गावकरी)मंगळवारी किंवा बुधवारी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह गावकरी मोठ्या संख्येने चंदनसार कार्यालयात जाऊन निवेदन देणार आहे. तरीही मनपाने डागडुजी केली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. - अंकित तिवारी(गावकरी, अध्यक्ष, साई गणेश मित्र मंडळ, पेल्हार)ही स्मशानभूमी कुठे आहे याची माहिती घेतो आणि तिची दुरवस्था झाली असेल तर तिची लवकरात लवकर डागडुजी करण्यात येईल.- राजेंद्र लाड (सार्वजनिक बांधकाम अभियंता, वसई विरार महानगरपालिका)