शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

मरणानंतरही भोगाव्या लागतात यातना; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 22:41 IST

पेल्हार येथील स्मशानभूमीची दुरवस्था

- मंगेश कराळे नालासोपारा : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मृतदेहांना यातना भोगाव्या लागत असून अंत्यविधीसाठी येणारे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच रहिवाशांना येथे अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते आहे. पेल्हार गावातील वनोठा पाडा येथील स्मशानभूमी शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसते आहे. स्मशानभूमीच्या भिंती तुटलेल्या, बसण्यासाठी जागा नाही, पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब, शेजारी असलेले घाणेरडे पाणी, दिवाबत्तीची सोयही नाही, स्मशानभूमीत कोणीही सरकारी कर्मचारी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना स्वत: लाकडे रचावी लागतात, अशा अनेक समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहेत. स्मशानभूमीच्या भिंतीच्या प्लास्टरमधील गंजलेल्या लोखंडी सळ्या, खाली पडत असलेले प्लास्टर आणि धोकादायक अवस्थेतील भिंतीमुळे एखादी जीवघेणी दुर्घटनाही येथे घडू शकते.या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गडग्याचा पाडा, इंदिरा वसाहत, वाकणपाडा, पेल्हार, वनोठा पाडा, वसई फाटा, अवधूत आश्रम, डोंगरीपाडा या भागातील नागरिक येतात. वॉर्ड नंबर १ आणि वॉर्ड नंबर ४३ या दोन्ही वॉर्डच्या सीमेवर ही स्मशानभूमी असल्याने दोन्ही नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. परिसरात अंदाजे १० ते ११ हजार मतदार असून त्यांना सुविधा मिळत नसल्याने स्मशानभूमीची डागडुजी केली नाही तर आगामी मनपा निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. मंगळवारी किंवा बुधवारी गावकरी आणि साई गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते चंदनसार मनपा कार्यालयात जाऊन याबाबत विचारणा करून सहा. आयुक्तांना निवेदन देणार आहेत. या स्मशानभूमीची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी देणार आहे. तरीही यात सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा पवित्रा घेणार आहे.धोकादायक छताखाली अंत्यसंस्कार...महानगरपालिकेअंतर्गत स्मशानभूमीची अवस्था इतकी खराब आणि धोकादायक झाली आहे की अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना इतकी भीती वाटते.त्याचबरोबर संरक्षक भिंतीना मोठ्या भेगा पडल्या असून आसन व्यवस्था असलेली भिंत कोसळलेली आहे. बाथरूमचे तिन्ही दरवाजे गायब असून त्याच्याही भिंतीना तडे गेले आहेत. वीजेचा खांबही वाकलेला आहे.मेल्यानंतरही लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. अनेक वर्षांपासून हा त्रास असून दोन्ही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. मनपाचा कोणीही कर्मचारी येथे हजर नसतो.- राजू दास (गावकरी)मंगळवारी किंवा बुधवारी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह गावकरी मोठ्या संख्येने चंदनसार कार्यालयात जाऊन निवेदन देणार आहे. तरीही मनपाने डागडुजी केली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. - अंकित तिवारी(गावकरी, अध्यक्ष, साई गणेश मित्र मंडळ, पेल्हार)ही स्मशानभूमी कुठे आहे याची माहिती घेतो आणि तिची दुरवस्था झाली असेल तर तिची लवकरात लवकर डागडुजी करण्यात येईल.- राजेंद्र लाड (सार्वजनिक बांधकाम अभियंता, वसई विरार महानगरपालिका)