शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

कष्टकरी संघटनेचे हक्कासाठी आंदोलन; उपवन संरक्षण कार्यालयावर हजारोच्या संख्येने मोर्चेकऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:39 IST

नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही.

जव्हार : गेल्या दीड वर्षांपासून जव्हार वन विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्थानिक आदिवासींच्या वन हक्कांचे उल्लंघन करत असल्याचे कारण देत विविध मागण्या घेऊन कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या अध्यक्षतेखाली जुना राजवाडा येथून थेट उपवन संरक्षण कार्यालयात मोर्चेकऱ्यांनी धडक दिली. त्या ठिकाणी निदर्शने करून वन खात्यातील उपवनसंरक्षक मिश्रा व संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत मोर्चाने थेट पोलीस ठाणे गाठले व गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याला घेराव घातला.

नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही. आदिवासी लोक इतक्या शांतपणे मोर्चा करतात हे मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच पाहिले असून मीही आपले आभार मानतो असे त्यांनी सांगितले.कष्टकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुम्ही आदिवासींना शिंदाड करू देत नाहीत.

शिंदाड करणे हे महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४ चे उल्लंघन करते असा तुम्ही आरोप करता; परंतु तुमचे म्हणणे साफ चुकीचे असून शिंदाड व राब करणे हा आमचा पारंपरिक हक्क आहे. हा हक्क आम्हाला वन हक्क कायद्याने निहित करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्र वन नियम २०१४ मध्ये आमचा हा हक्क मान्य करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यासाठी १९३५ मध्ये देऊ करण्यात आलेल्या सवलतींमध्ये राब करण्याचा समावेश आहे. आम्हाला वन पट्ट्यामध्ये विहिरी बांधू देत नाहीत व जमिनीचे सपाटीकरण करू देत नाहीत, अशा तक्रारी या वेळी करण्यात आल्या.

रोजंदारी, कंत्राटी कामगारांना न्याय द्याजव्हार : जव्हारच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रोजंदारीवर काम करणाºया सफाई कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार नाही. या कामगारांना पगारवाढीबरोबरच भविष्यनिर्वाह निधी आणि भत्ते देण्यात यावेत, या मागण्यांसाठी सफाई कामगारांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली रुग्णालयासमोर शनिवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

रोजंदारी, कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. जव्हारच्या ग्रामीण कुटीर रुग्णालयात १४ ते १५ वर्षांपासून (रोजंदारी) कंत्राटीवर काम करीत आहेत. मात्र या कंत्राटी (स्वच्छता सेवा) सफाईगार व शिपाईगार यांना मे. राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था बोईसर यांनी भरती केले आहे, मात्र त्यांनी गेल्या काही वर्षांपासून पगारवाढ होत नाही. इतर भत्ते मिळत नाहीत. म्हणून या कर्मचाºयांनी मे. राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्थेकडे मागणी केली. परंतु या संस्थेने कर्मचाºयांचे कुठलेही म्हणणे न ऐकता उलट त्या कर्मचाºयांना कमी करण्यात आले आहे. रुग्णालयात रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी वैतागले असून त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVasai Virarवसई विरार